शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
2
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
3
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
4
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
5
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
6
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
7
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
8
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
9
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
10
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
11
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
12
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
13
"मी शाहरुख खान, कृपया मला कॉल कर...", राधिकाला आलेला किंग खानचा मेसेज; म्हणाली...
14
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
15
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
16
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
17
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
18
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
19
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
20
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे जिल्ह्यातील शेकडो एकर भात पिकांवर बगळ्या, करप्या, खोडकीडा रोगांचा मोठा प्रादुर्भाव; शेतकरी चिंतेत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2025 18:13 IST

शहापूरच्या किन्हवली, चरीव, अदिवली, आष्टे, बेडीजगाव, सोगाव, खरीवली तसेच डोळखांब भागातील शेतकऱ्यांच्या पिकांवर बगळ्या रोगाने पाने पिवळी पडणे, वाढ खुंटणे अशा गंभीर लक्षणांनी बाधित झाल्याचे निदर्शनास आले आहे.

सुरेश लोखंडे -ठाणे : जिल्ह्यात प्रथमपासून पावससाचा जाेर कायम आहे. त्यात उन्हाचा अभाव असून खरीपाचे भात पीकही डाेलत आहे. मात्र सध्याच्या या जादा पावसामुळे कल्याण, अंबरनाथ, मुरबाड, शहापूर आदी तालुक्यांत यंदाच्या खरीप हंगामात शेकडो एकर भात पिकांवर बगळ्या, करप्या आणि खोडकीडा या रोगांचा मोठा प्रादुर्भाव दिसून येत आहे. विशेषतः शहापूरच्या किन्हवली परिसरातील शेतकरी या रोगांमुळे चिंतेत आहेत कारण पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे. या प्रादुर्भावास अनुसरून पहाणी सुरू असल्याचे कृषी विभागाकडून ऐकवले जात आहे.शहापूरच्या किन्हवली, चरीव, अदिवली, आष्टे, बेडीजगाव, सोगाव, खरीवली तसेच डोळखांब भागातील शेतकऱ्यांच्या पिकांवर बगळ्या रोगाने पाने पिवळी पडणे, वाढ खुंटणे अशा गंभीर लक्षणांनी बाधित झाल्याचे निदर्शनास आले आहे. परिणामी, उत्पादनात मोठी घट होण्याचा धोका वाढल्याने शेतकरी हताश आहेत. शहापूरमधील प्रकाश भागरथ, विहिगावच्या प्रगतिशील शेतकरी साकारु वाघ यांसह अनेकांनी त्यांच्या पिकांवर रोगांचा गंभीर प्रादुर्भाव असल्याचे सांगितले आहे.

याचबरोबर मुरबाड तालुक्याच्या न्हावे-सासणे परिसरात करप्या आणि खोडकीडा रोगाने देखील पिकांचे नुकसान सुरू आहे. रमेश यशवंत हिंदुराव व काशिनाय तुकाराम हिंदुराव यांच्यासह उमेश केदार यांनी या रोगांचे शेतातील भात पिकांवर प्रादुर्भाव असून शेतकरी काळजीत असल्याची माहिती दिली आहे. तसेच विनायक ठाकरे (म्हाडास), रमाकांत केदार, शांताराम भोईर, भास्कर बांगर, काशिनाथ घागस, शंकर भोईर आणि चंद्रकांत केदार यांच्या शेतांतही या रोगांचे उच्च प्रमाणात आढळले आहे.शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, सतत चालणाऱ्या पावसामुळे आणि अनियमित हवामानामुळे बगळ्या तसेच करप्या, खोडकीडा रोगांसाठी वातावरण पोषक झाले आहे ज्यामुळे रोगांचा प्रादुर्भाव अधिक वाढेल. त्यामुळे कृषी विभागाने तातडीने उपाययोजना करून शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन व आवश्यक औषधे उपलब्ध करून देणे अत्यंत आवश्यक आहे.पावसाच्या अनियमित लहरीपणामुळे आधीच मोठे नुकसान सहन करीत असलेल्या शेतकऱ्यांसाठी हे रोग आणखी एक मोठे संकट बनले असून, शेतकरी संघटनाही या समस्येकडे लक्ष देत शासनास गंभीरपणे हस्तक्षेप करण्याची मागणी करत आहेत. कृषी विभागाने बगळ्या, करप्या आणि खोडकीडा रोगांवर नियंत्रण ठेवण्यासाठी त्वरीत औषधोपचार, तांत्रिक मदत व तज्ञांचे मार्गदर्शन सुरू करावे, अन्यथा उत्पादनात मोठा घसरण होऊ शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

जिल्ह्यात क्राॅप सॅप म्हणजे भात पिकावरील कीड राेग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्प या याेजनेअंतर्गत सतत पाहाणी व सर्वेक्षण सुरू आहे. कृषी विद्यापिठाचे शास्त्रज्ञांनीही शहापूर तालुक्यास या आधी भेट देऊन पहाणी करून उपाययाेजना सुवलेल्या आहेत.- विशाल माने - डीएसएओ, कृषी विभाग, ठाणे 

 

टॅग्स :Farmerशेतकरीthaneठाणे