शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये महायुतीचा उमेदवार ठरला? शांतीगिरी महाराजांच्या अर्जावर शिंदे शिवसेना असा उल्लेख, अर्ज भरला
2
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य
3
“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका
4
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
5
आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच व्यक्त झाली क्षिती जोग, म्हणाली, "मला आनंद झाला..."
6
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
7
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
8
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
9
Shiv Puja: महादेवाला नेहमी बेल आणि पांढरे फुल वाहावे, पण केतकीचे फुल कदापि नाही; वाचा कारण!
10
VIDEO: मुलाने १५ सेकंदात वडिलांना २५ बुक्के मारले; हार्ट अटॅकने जन्मदात्याचा मृत्यू
11
Vastu Tips: जिथे कमळ फुलते तिथे सौभाग्यलक्ष्मी नांदते; पहा चुंबकाप्रमाणे पैसा आकर्षून घेणारी रोपं!
12
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ
13
PM कुणीही असला तरी भारतीय अर्थव्यवस्था..., मोदींनी फुकट बढाया मारू नयेत, चिदंबरम यांचा टोला
14
अखेर इस्रायल-हमास भीषण युद्ध संपणार? तीन देशांच्या प्रयत्नानंतर आज महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता
15
“ते म्हणजे महाराष्ट्र या मानसिकतेतून ठाकरेंनी बाहेर यावे”; देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
16
'देवेंद्र फडणवीसांना खोटं बोलण्यात गोल्ड मेडेल मिळेल'; रोहित पवारांचा खोचक टोला
17
नारायण राणे जिंकले नाहीत तर प्रचार कायमचा सोडणार; कट्टर राणे समर्थकाने घेतली शपथ, केला मताधिक्याचा दावा
18
चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट
19
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
20
T20 World Cup साठी न्यूझीलंडचा संघ जाहीर; अनोख्या पद्धतीने घोषणा, नव्या जर्सीत किवी संघ

उल्हासनगरातील ६ इमारतींमधील शेकडो नागरिक होणार बेघर?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 4:42 AM

सदानंद नाईक लोकमत न्यूज नेटवर्क उल्हासनगर : महापालिकेने धोकादायक घोषित केलेल्या १३३ पैकी ८४ इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट महापालिका संरचनात्मक ...

सदानंद नाईक

लोकमत न्यूज नेटवर्क

उल्हासनगर : महापालिकेने धोकादायक घोषित केलेल्या १३३ पैकी ८४ इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट महापालिका संरचनात्मक अभियंता पॅनलने केले. स्ट्रक्चरल ऑडिट झालेल्या ८४ पैकी ६ इमारती अतिधोकादायक म्हणून घोषित केल्या असून या इमारतींमधील नागरिकांना इमारत खाली करण्याच्या नोटिसा दिल्या आहेत, अशी माहिती सहायक आयुक्त गणेश शिंपी यांनी दिली.

उल्हासनगरात गेल्या महिन्यात इमारतीचे स्लॅब कोसळून १२ जणांचा मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर, महापालिका आयुक्तांनी नागरिकांच्या सुरक्षेचा उपाय म्हणून १० वर्षे जुन्या १५०० इमारतींना नोटीस देऊन स्ट्रक्टरल ऑडिट अहवाल सादर करण्याचे सुचविले. या प्रकाराने शहरात खळबळ उडाली असून आजपर्यंत नोटिसा दिलेल्या इमारतींपैकी एकाही इमारतीचा स्ट्रक्चरल ऑडिटचा अहवाल महापालिकेला सादर झाला नाही, हे उघड झाले. मात्र, महापालिकेने घोषित केलेल्या १३३ पैकी ८४ धोकादायक इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट महापालिकेच्या संरचनात्मक अभियंता पॅनलने केले. स्ट्रक्चरल ऑडिट झालेल्या ८४ पैकी ६ इमारती सरंचनात्मक अभियंता पॅनलने अतिधोकादायक म्हणून घोषित केल्या.

महापालिका संरचनात्मक अभियंता पॅनलने ज्या ६ इमारती अतिधोकादायक म्हणून घोषित केल्या, त्या इमारती खाली करा, अशा नोटिसा नागरिकांना देऊन वीज व पाणीपुरवठा खंडित करण्याचा इशारा दिला. स्ट्रक्चरल ऑडिट झालेल्या धोकादायक इमारतींमधील नागरिकांना, इमारत दुरुस्ती करून इमारतीमध्ये जाण्याचे सांगण्यात आले, अशी माहिती सहायक आयुक्त गणेश शिंपी यांनी दिली. तर, इतर ४९ धोकादायक इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट एका आठवड्यात पूर्ण होणार असल्याचे शिंपी म्हणाले. अतिधोकादायक इमारती घोषित केल्या. त्या इमारतींचा वीज व पाणीपुरवठा खंडित केला जाणार असून इमारतींमधील बेघर होणाऱ्या शेकडो नागरिकांची पर्यायी व्यवस्था करण्याचे संकेत दिले. तसेच १० वर्षे जुन्या इमारतीला नोटिसा देऊन स्ट्रक्चरल ऑडिट अहवाल सादर करण्याचे सांगितले होते. त्यांनी स्ट्रक्चरल ऑडिट महापालिकेला सादर करणे गरजेचे आहे.

----------

शासनाच्या समितीकडे डोळे

शहरातील अनधिकृत व धोकादायक इमारती नियमित करण्यासाठी राज्य शासनाने पुढाकार घेतला. तसेच एक समिती स्थापन केली असून समिती १५ दिवसांत शासनाला अहवाल सादर करणार आहे. यातून सकारात्मक निर्णय येईल, अशी आशा शहरवासीयांना आहे.