शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
3
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
4
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
5
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
6
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
7
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
8
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
9
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
10
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
11
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
12
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
13
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
14
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
15
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
16
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
17
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
18
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
19
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
20
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी

भिवंडी एमआयडीसी परिसरात कपिल रेयॉन इंडिया कंपनीला भीषण आग

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2021 14:22 IST

या आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन दलाच्या सहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून कल्याण ,ठाणे व एमआयडीसीच्या अग्निशामक दलाच्या गाड्यांची मदत देखील मागवण्यात आली आहे

- नितिन पंडीत

भिवंडी: भिवंडीतआगी लागण्याचे सत्र सुरुच असून तालुक्यातील सरवली एमआयडीसी परीसरात असलेल्या कपिल रेयॉन इंडिया प्रा लि या डाईंग कंपनीस गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास भीषण आग लागली आहे. दोन मजली असलेली ही संपूर्ण कंपनी आगीच्या भक्ष्यस्थानी गेली आहे. या कंपनीत कच्च्या कपड्याचा व पक्क्या कपड्याचा मोठ्या प्रमाणावर साठा करण्यात आला होता तसेच मोठ्या प्रमाणात धागा देखील साठवून ठेवण्यात आला होता.

या आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन दलाच्या सहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून कल्याण, ठाणे व एमआयडीसीच्या अग्निशामक दलाच्या गाड्यांची मदत देखील मागवण्यात आली आहे. कंपनीला लागलेल्या या आगीमुळे परिसरात सर्वत्र मोठ्या प्रमाणावर धुराचे लोट उडत असून अजूनही आगीवर नियंत्रण मिळाले नसल्याने हि आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.  

दरम्यान मध्यरात्रीच्या सुमारास या कंपनीत आग लागली त्या वेळी या कंपनीत सुमारे ३० ते ४० होते. मात्र कामगारांनी वेळीच बाहेर पळ काढल्याने मोठा अनर्थ टळला आहे. एकीकडे आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान शर्थीचे प्रयत्न करीत आहेत मात्र याठिकाणी पाण्याची कमतरता भासत असल्याने अग्निशमन दलाला पाण्याच्या कमतरतेमुळे आग विझवतांना मोठी अडचण निर्माण होत आहे. दुसरीकडे कंपनीच्या दोन्ही मजल्यावर आग लागल्याने या आगीत कंपनी पूर्णतः जळून खाक झाली आहे . त्यामुळे कोट्यावधींचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत असून या आगीचे नेमकी कारण अजून समजले नाही. 

मात्र वर्षाअखेर व मार्च महिना अखेर भिवंडीत डाइंग , सायजिंग , यंत्रमाग कारखाने , गोदाम , तसेच केमिकल गोदाम यांना आगी लागण्याचे सत्र नेहमीच सुरु होते. त्यामुळे या आगी लागतात की लावल्या जातात याचा अजूनही तपास पोलीस यंत्रणेला लागलेला पाहायला मिळत नाही. मात्र वारंवार लागत असलेल्या या आगिंमुळे भविष्यात भिवंडीत भोपाळ सारखी घटना घडू नये यासाठी यंत्रणांनी सतर्क राहणे गरजेचे असल्याचे मत सुज्ञ नागरिक व्यक्त करीत आहेत. 

टॅग्स :bhiwandiभिवंडीfireआग