शहरं
Join us  
Trending Stories
1
"तर मी फडणवीसांना या जन्मी माफ करणार नाही", अंजली दमानियांची पोस्ट, 'तो' फोटोही केला शेअर
2
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
3
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
4
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
5
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
6
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
7
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
8
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
9
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
10
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
11
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
12
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
13
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
14
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
15
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
16
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
17
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
18
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
19
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
20
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
Daily Top 2Weekly Top 5

जोरदार पाऊस होऊनही कल्याणमध्ये टंचाई कशी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2018 23:52 IST

सदस्यांचा सवाल; स्थायी समितीच्या सभेत मुद्दा गाजला

कल्याण : यंदा जोरदार पाऊस होऊनही कल्याण शहराला मुबलक पाणीपुरवठा केला जात नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी टंचाई जाणवत असून त्याला जबाबदार कोण, असा संतप्त सवाल गुरुवारी स्थायी समितीच्या सभेत सदस्यांनी केला.शिवसेना सदस्या माधुरी काळे म्हणाल्या की, माझ्या प्रभागात पाणीपुरवठा केला जात नाही. त्यामुळे काही नागरिकांनी संतप्त होऊन सोशल मीडियावर पाणीटंचाईचे व्हिडीओ टाकले आहे. ते माझ्याविरोधात आहेत. पाणीटंचाईमुळे आम्हाला नागरिकांना तोंड द्यावे लागते. त्याचे खरे कारण अधिकारी सांगत नाहीत.भाजपा सदस्य मनोज राय म्हणाले, कैलासनगर व आमराई या भागात पाणी येत नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये रोष आहे. शिवसेना सदस्या छाया वाघमारे यांनीही त्यांच्या प्रभागात पाण्याची समस्या भेडसावत असल्याचे सांगितले. अर्जुन भोईर यांनीही त्याला दुजोरा दिला. ते म्हणाले, यंदा पाऊस जोरदार पडला असतानाही विविध प्रभागांतील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. महापालिकेचे अधिकारी करतात काय? उद्या शुक्रवारी पुन्हा शटडाउन घेतले आहे. त्यामुळे दुसऱ्या दिवशीही कमी दाबाने पाणीपुरवठा होतो, याकडेही सदस्यांनी लक्ष वेधले. सदस्या रूपाली म्हात्रे व अपक्ष सदस्य कुणाल पाटील म्हणाले, ग्रामीण भागात पाणीपुरवठा बाधित झाला आहे. उन्हाळा संपल्यावर पावसाळ्यात तरी पाणी योग्य दाबाने पुरवले जाईल, अशी अपेक्षा होती. मात्र, ती फोल ठरली आहे.पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता राजीव पाठक म्हणाले, मोहने बंधाºयाला १८ वर्षे पूर्ण झाली आहे. या बंधाºयाची देखभाल दुरुस्ती केलेली नव्हती. त्यामुळे शहराच्या पूर्व व पश्चिम भागात पाण्याची समस्या उद्भवली होती. आता देखभाल दुरुस्तीची निविदा काढली आहे. हे काम सुरू केले असून ते चार महिन्यांत पूर्ण केले जाणार आहे. पावसाळ्यात पाणी पुरेसे असले, तरी वीजपुरवठा सातत्याने खंडित झाला. त्याचा परिणाम पाणीपुरवठ्यावर झाला. याबाबत ‘महावितरण’शी नुकतीच एक बैठक झाली आहे.जोरदार पावसामुळे मोहिली जलशुद्धीकरणात पाणी शिरले. त्यामुळे तेथील पंप बंद होते. त्यामुळेही मधल्या काळात पाणीपुरवठ्यावर त्याचा परिमाण झाला. २७ गावांत वितरण व्यवस्थेची काही कामे हाती घेण्यात आली आहे.प्रसाधनगृहांची होणार दुरुस्ती७७ प्रभागांतील प्रसाधनगृहांच्या देखभाल दुरुस्तीचे प्रस्ताव मागील बैठकीत मंजुरीसाठी ठेवण्यात आले होते. त्याची सविस्तर माहिती अधिकारीवर्गाकडे नसल्याने हे प्रस्ताव स्थगित ठेवले होते. संपूर्ण माहितीनिशी कार्यकारी अभियंता चंद्रकांत कोलते यांनी हे प्रस्ताव गुरुवारी सभेत मंजुरीसाठी ठेवले असता त्याला मंजुरी देण्यात आली. अन्य ४५ प्रभागांतील प्रसाधनगृहांच्या दुरुस्तीचेही प्रस्ताव घेण्याचा मुद्दा सदस्यांनी उपस्थित केला. परंतु, ७७ प्रभागांतील दुरुस्तीचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले.

टॅग्स :Waterपाणीwater scarcityपाणी टंचाईkalyanकल्याण