शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
3
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
4
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
5
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
6
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
7
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
8
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
9
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
10
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
11
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
12
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
13
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
14
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
15
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
16
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
17
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
18
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
19
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
20
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर

जोरदार पाऊस होऊनही कल्याणमध्ये टंचाई कशी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2018 23:52 IST

सदस्यांचा सवाल; स्थायी समितीच्या सभेत मुद्दा गाजला

कल्याण : यंदा जोरदार पाऊस होऊनही कल्याण शहराला मुबलक पाणीपुरवठा केला जात नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी टंचाई जाणवत असून त्याला जबाबदार कोण, असा संतप्त सवाल गुरुवारी स्थायी समितीच्या सभेत सदस्यांनी केला.शिवसेना सदस्या माधुरी काळे म्हणाल्या की, माझ्या प्रभागात पाणीपुरवठा केला जात नाही. त्यामुळे काही नागरिकांनी संतप्त होऊन सोशल मीडियावर पाणीटंचाईचे व्हिडीओ टाकले आहे. ते माझ्याविरोधात आहेत. पाणीटंचाईमुळे आम्हाला नागरिकांना तोंड द्यावे लागते. त्याचे खरे कारण अधिकारी सांगत नाहीत.भाजपा सदस्य मनोज राय म्हणाले, कैलासनगर व आमराई या भागात पाणी येत नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये रोष आहे. शिवसेना सदस्या छाया वाघमारे यांनीही त्यांच्या प्रभागात पाण्याची समस्या भेडसावत असल्याचे सांगितले. अर्जुन भोईर यांनीही त्याला दुजोरा दिला. ते म्हणाले, यंदा पाऊस जोरदार पडला असतानाही विविध प्रभागांतील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. महापालिकेचे अधिकारी करतात काय? उद्या शुक्रवारी पुन्हा शटडाउन घेतले आहे. त्यामुळे दुसऱ्या दिवशीही कमी दाबाने पाणीपुरवठा होतो, याकडेही सदस्यांनी लक्ष वेधले. सदस्या रूपाली म्हात्रे व अपक्ष सदस्य कुणाल पाटील म्हणाले, ग्रामीण भागात पाणीपुरवठा बाधित झाला आहे. उन्हाळा संपल्यावर पावसाळ्यात तरी पाणी योग्य दाबाने पुरवले जाईल, अशी अपेक्षा होती. मात्र, ती फोल ठरली आहे.पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता राजीव पाठक म्हणाले, मोहने बंधाºयाला १८ वर्षे पूर्ण झाली आहे. या बंधाºयाची देखभाल दुरुस्ती केलेली नव्हती. त्यामुळे शहराच्या पूर्व व पश्चिम भागात पाण्याची समस्या उद्भवली होती. आता देखभाल दुरुस्तीची निविदा काढली आहे. हे काम सुरू केले असून ते चार महिन्यांत पूर्ण केले जाणार आहे. पावसाळ्यात पाणी पुरेसे असले, तरी वीजपुरवठा सातत्याने खंडित झाला. त्याचा परिणाम पाणीपुरवठ्यावर झाला. याबाबत ‘महावितरण’शी नुकतीच एक बैठक झाली आहे.जोरदार पावसामुळे मोहिली जलशुद्धीकरणात पाणी शिरले. त्यामुळे तेथील पंप बंद होते. त्यामुळेही मधल्या काळात पाणीपुरवठ्यावर त्याचा परिमाण झाला. २७ गावांत वितरण व्यवस्थेची काही कामे हाती घेण्यात आली आहे.प्रसाधनगृहांची होणार दुरुस्ती७७ प्रभागांतील प्रसाधनगृहांच्या देखभाल दुरुस्तीचे प्रस्ताव मागील बैठकीत मंजुरीसाठी ठेवण्यात आले होते. त्याची सविस्तर माहिती अधिकारीवर्गाकडे नसल्याने हे प्रस्ताव स्थगित ठेवले होते. संपूर्ण माहितीनिशी कार्यकारी अभियंता चंद्रकांत कोलते यांनी हे प्रस्ताव गुरुवारी सभेत मंजुरीसाठी ठेवले असता त्याला मंजुरी देण्यात आली. अन्य ४५ प्रभागांतील प्रसाधनगृहांच्या दुरुस्तीचेही प्रस्ताव घेण्याचा मुद्दा सदस्यांनी उपस्थित केला. परंतु, ७७ प्रभागांतील दुरुस्तीचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले.

टॅग्स :Waterपाणीwater scarcityपाणी टंचाईkalyanकल्याण