शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

धोकादायक इमारती आणखी किती बळी घेणार ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 23:56 IST

समूह पुनर्विकासाचा मुद्दा पुन्हा चर्चेत : महापालिकेची कारवाई नाममात्र

मुंबई : डोंगरी येथील केसरबाई इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत १३ जणांचा बळी गेला असून, पुन्हा एकदा मुंबई शहर आणि उपनगरातील धोकादायक, अतिधोकादायक अशा नादुरुस्त इमारतींच्या पुनर्विकासासह समूह विकासाच्या मुद्दा ऐरणीवर आला आहे. महत्त्वाचे म्हणजे, अशी धोकादायक बांधकामे आणखी किती जणांचा बळी घेणार? हा प्रश्न अनुत्तरितच आहे. डोंगरीसारख्या दुर्घटना घडल्यानंतर महापालिका केवळ नाममात्र कारवाई करत असल्याने, पुन्हा धोकादायक बांधकामांचे इमले मुंबापुरीत उभे राहत असून, दिवसेंदिवस धोकादायक इमारतींचे बळी वाढतच आहेत.

मुंबई शहराचा विचार करता, दक्षिण मुंबईतील डोंगरी, मशीद बंदर परिसरातील धोकादायक, अतिधोकादायक इमारतींची संख्या अधिक आहे. गिरगाव परिसरातही धोकादायक इमारती असून, त्यानंतर सायन आणि कुर्ला परिसरात धोकादायक इमारतींची संख्या अधिक आहे. वांद्रे परिसरासह माहिम आणि माटुंग्यासह दादर परिसरातही धोकादायक इमारतींची संख्या अधिक असून, येथील बहुतांश वस्त्या या दाटीवाटीने वसल्या आहेत. बहुतांशी इमारतींचा पुनर्विकास हा एफएसआय किंवा अंतर्गत वादामुळे मार्गी लागत नसून, इमारत आणखी जर्जर होत आहेत. परिणामी, धोका आणखी वाढून ढासळलेल्या इमारतींमुळे निष्पाप नागरिकांचे बळी जात आहेत.मुंबई महापालिका, म्हाडा आणि एसआरए या तिन्ही प्राधिकरणांनी इमारतीच्या पुनर्विकासाबाबत व्यवस्थित धोरण आखणे गरजेचे आहे. मात्र, या तिन्ही प्राधिकरणांत समन्वय नाही. परिणामी, पुनर्विकासाची प्रक्रिया रेंगाळते. ही प्रक्रिया सुरू असतानाच इमारतीमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर येतात आणि पुनर्विकासाला खीळ बसते. परिणामी, धोकादायक इमारत अतिधोकादायक होते आणि एक दिवस मुसळधार पावसात इमारतीला धोका निर्माण होऊन इमारत जमीनदोस्त होते. निष्पाप नागरिकांचे बळी जातात. दुर्घटना घडल्यानंतर महापालिका नाममात्र कारवाई करत सारवासारव करण्याचा प्रयत्न करते. या सगळ्यात इमारतीचा पुनर्विकास मात्र दूरच राहतो.९४ हजार तक्रारींपैकी पाच हजार बांधकामांवर कारवाईच्अनधिकृत बांधकाम निष्कासित करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने आॅनलाइन तक्रार प्रणालीवर १ मार्च, २०१६ पासून ८ जुलै, २०१९ पर्यंत एकूण ९४ हजार ८५१ तक्रारींऐवजी फक्त ५ हजार ४६१ अनधिकृत बांधकामावर कारवाई केली आहे.च्सर्वात जास्त ९ हजार १९२ इतक्या तक्रारींची नोंद एल विभागात म्हणजे कुर्ल्यात झाली आहे, तर कारवाई केवळ ३२३ अनधिकृत बांधकामावर झाली आहे.च्मुंबई महापालिका इमारत व कारखाना विभाग आणि पोलीस बंदोबस्त, तसेच इतर साधनांवर प्रत्येक वर्षी सुमारे २० कोटी खर्च करते, परंतु बेकायदेशीर बांधकामावर कारवाई नीट केली जात नाही.च्अनधिकृत बांधकाम प्रकरणी दरवर्षी १५ हजारांपेक्षा अधिक नोटीस बजावल्या जातात. मात्र, १० ते २० टक्के अनधिकृत बांधकामांवर कारवाई केली जाते.च्मूळ मालक, भाडेकरू आणि प्रशासनातील वादात इमारतीचा पुनर्विकास रेंगाळतो.च्नोटीस बजावल्यानंतरही रहिवासी इमारत खाली करीत नाहीत.च्चाळींसह इमारतींमधील भाडेकरू घर रिकामे करण्याचे नाव घेत नाहीत.च्घर रिकामे केल्यानंतर संक्रमण शिबिराची व्यवस्था झाली नाही, तर अडचण येते.च्संक्रमण शिबिराची व्यवस्था झाली, तरी ती स्थानिक परिसरात होत नाही.च्दाटीवाटीचा परिसर आणि चिंचोळ्या गल्ल्यांमुळे इमारतीचा पुनर्विकास होत नाही.च्समूह विकास करायचा झाल्यास सर्वांनी एकत्र येणे गरजेचे असते.सहा वर्षांत मुंबईत तब्बल ३ हजार ३२३ इमारतींचा भाग कोसळून २४९ लोकांचा बळी गेला असून, ९१९ जण जखमी झाले आहेत. २०१३ ते २०१८ दरम्यानचा हा आकडा आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते शकील अहमद शेख यांना माहिती अधिकाराखाली प्राप्त कागदपत्रातून ही माहिती उघड झाली आहे.रहिवासी संक्रमण शिबिरात गेले की, पुनर्विकसित इमारतीत परत कधी येणार याची शाश्वती नसते. २ ते ३ वर्षांत पुनर्रचित इमारतीत घरे देण्याबाबत प्रयत्न होणे गरजेचे आहे.- रमेश प्रभू, गृहनिर्माणतज्ज्ञ 

टॅग्स :Building Collapseडोंगरी इमारत दुर्घटना