शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

लोकलमधून प्रवासबंदी असताना अंध माता मुलासह वांगणी स्थानकात गेलीच कशी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2021 16:47 IST

कोरोना आपत्कालीन यंत्रणा कार्यान्वित नव्हती का? जीआरपी, आरपीएफ पोलीस होते कुठे? 

ठळक मुद्देमयूर शेळके हा पॉइंट्समन जर तेथे नसता, प्रसंगावधान राखून त्याने त्या बालकाचा जीव वाचवला नसता तर होत्याचे नव्हते झाले असते याची गंभीर नोंद रेल्वे प्रशासन घेईल का? असा सवाल संघटनेचे संस्थापक अध्यक्ष वांगणीचे रहिवासी मनोहर शेलार यांनी केला आहे

डोंबिवली : वांगणी रेल्वे स्थानकात अंध माता मुलासह गेली, आणि तेवढ्यात होणारा अपघात अनर्थ सुदैवाने आणि मयूर शेळके या पाँईंटमनच्या धाडसी कामगिरीने टळला. परंतु कोरोना काळातील आपत्कालीन परिस्थितीत सामान्य प्रवाशांना लोकल प्रवासाचे निर्बंध असताना ते मायलेक स्थानकात गेले कसे काय? पोलीस यंत्रणा काय करत होती? असा सवाल उपनगरीय रेल्वे प्रवासी एकता संस्थेने केला आहे. 

मयूर शेळके हा पॉइंट्समन जर तेथे नसता, प्रसंगावधान राखून त्याने त्या बालकाचा जीव वाचवला नसता तर होत्याचे नव्हते झाले असते याची गंभीर नोंद रेल्वे प्रशासन घेईल का? असा सवाल संघटनेचे संस्थापक अध्यक्ष वांगणीचे रहिवासी मनोहर शेलार यांनी केला आहे. शेळके यांचे कौतुक करायला हवेच, महासंघ, वांगणी रेल्वे प्रवासी संघटनेने ते केलेच. परंतु, दुसऱ्या मुद्याकडे लक्ष द्यायला हवे, की ते आत फलाटमध्ये आलेच कसे? त्यांना कोणी अडवले नाही का? आरपीएफ, जीआरपी पोलीस यंत्रणा काय करत होती? कार्यरत होती की नव्हती? असेल तर कोण होते, त्यावेळी ते फलाटात काय करत होते याची चौकशी, कार्यवाही होणे गरजेचे असल्याचे मत शेलार यांनी व्यक्त केले. 

दरम्यान रेल्वेच्या प्रत्येक स्थानकात शेळके यांच्यासारखे सतर्क कामगार असतीलच असे नाही, त्यामुळे धोरणात्मक कार्यपद्धतीनुसार या अपघाताचा केवळ सत्कार करण्यापर्यन्त आनंद व्यक्त न करता, हे नेमके घडलेच कसे यांच्या मुळापर्यत जायला हवे असेही मत त्यांनी व्यक्त केले.  

टॅग्स :railwayरेल्वेthaneठाणेcorona virusकोरोना वायरस बातम्या