शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
3
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
4
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
5
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
6
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
7
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
8
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
9
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
10
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
11
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
12
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
13
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
14
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
15
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
16
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
17
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
18
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
19
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
20
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'

वसतिगृहातील जेवणात अळ्या, कंत्राटदाराला नोटीस, कल्याणमध्ये विद्यार्थ्यांचे अन्नत्याग आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2017 6:10 AM

पश्चिमेकडील बिर्ला कॉलेजनजीक सरकारी आदिवासी विद्यार्थी वसतिगृह आहे. येथील विद्यार्थ्यांना दिल्या जाणाºया जेवणात अळ्या आढळल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी केली आहे. येथे जेवण पुरविणा-या कंत्राटदाराच्या विरोधात कारवाई करण्याच्या

कल्याण : शहराच्या पश्चिमेकडील बिर्ला कॉलेजनजीक सरकारी आदिवासी विद्यार्थी वसतिगृह आहे. येथील विद्यार्थ्यांना दिल्या जाणाºया जेवणात अळ्या आढळल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी केली आहे. येथे जेवण पुरविणा-या कंत्राटदाराच्या विरोधात कारवाई करण्याच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. या प्रकरणी विद्यार्थ्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली आहे. जेवण पुरविणाºया कंत्राटदाराला नोटीस बजावण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.या आदिवासी वसतिगृहात राहून ९६ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांना दोन वेळचे जेवण पुरविण्याचे काम भिवंडीच्या जागृती महिला बचत गटाला दिले आहे. शुक्रवारी या विद्यार्थ्यांना पनीरची भाजी दिली होती. त्या भाजीत अळ्या असल्याचे विद्यार्थ्यांनी उघडकीस आणले आहे. तसेच त्या दिवशी मुलांना दिलेल्या केळ्यांना देखील कीड लागल्याचे दिसले. याविषयी प्रथम महिला बचत गटाकडे विद्यार्थ्यांनी विचारायचा प्रयत्न केला असता, त्यांना दमदाटी करण्यात आल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. एका विद्यार्थ्याच्या जेवणामागे महिन्याला ३ हजार २०० रुपये सरकारकडून महिला बचत गटाला दिले जातात. विद्यार्थ्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. वसतिगृह प्रशासनाकडून यापूर्वीच महिला बचत गटाला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. मात्र आता अळ्या आढळून आल्या त्याचे काय, असा सवाल विद्यार्थ्यांकडून केला जात आहे. प्रकल्प अधिकारी एल. एफ. सलामे यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी आपण गावी आल्याने तेथे जाता आले नाही. पण आम्ही आमच्या दुसºया अधिकाºयाला तेथे पाठविले आहे. दुसºया कंत्राटदाराची व्यवस्था करण्यासही सांगितले असून यापुढे या कंत्राटदाराकडून जेवण घेणार नसल्याचे त्यांनी सांगितले.शिवसेनेचे उपशहरप्रमुख रवी पाटील यांनी रविवारी वसतिगृहाला भेट देऊन पाहणी केली. वसतिगृहाची दुरवस्था झाली असून विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाचे जेवण दिले जाते. त्यात अळ्या सापडतात, ही गंभीर बाब आहे. वसतिगृहाची देखरेख करणारा अधिकारी कल्याणमध्येच राहतो. मात्र वर्ष झाले तरी तो या वसतिगृहाकडे ढुंकूनही पाहत नाही, असा आरोप पाटील यांनी केला आहे.तक्रारी नेहमीच्याचया वसतिगृहात राहणारा विद्यार्थी सागर मुठे याने सांगितले की, दीड महिन्यापूर्वीच या कंत्राटदाराला कंत्राट दिले आहे. तेव्हापासून त्यांच्या काही ना काही तक्रारी दररोज आहेत.सुरुवातीला विद्यार्थ्यांना जेवण कमी पडत असे. त्यासंदर्भात बैठकही घेतली होती. दरम्यानच्या काळात, दिवाळीच्या सुट्टीत मुले घरी गेली. विद्यार्थी परतल्यावर परिस्थितीत सुधारणा होईल, असे वाटत होते.परंतु आजही परिस्थिती जैसे थेच आहे. १२ तारखेला यासंदर्भात आम्ही वॉर्डनला निवेदन दिले होते. पण त्यावर कारवाई झाली नाही.हे आमच्या विरोधातील कारस्थानजागृती महिला बचत गटाचे व्यवस्थापक सुरेश वाडघरे यांनी सांगितले की, आम्ही १५ आॅक्टोबरला या वसतिगृहाचे कंत्राट घेतले. येथे एक मुलगा जेवायला येतो, तेव्हा सहा-सात जणांची ताटे घेऊन जातो. आपल्यासोबत मित्राचे ताट घेऊन गेल्याने अनधिकृत विद्यार्थ्यालाही जेवण मिळते.या वसतिगृहात ३० मुले अनधिकृतरीत्या राहतात. सुरुवातीला आम्ही त्यांनाही जेवण देत होतो, परंतु आता ते आम्ही बंद केले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा आमच्यावर राग आहे. आम्हाला येथून हटविण्यासाठी हे कारस्थान केले जात आहे.आम्ही जेवणात अळ्या का टाकू? डॉक्टरांनी तेल बदलण्यासाठी सांगितले त्या वेळी आम्ही ते लगेचच बदलले. विद्यार्थी खोटे सांगत आहेत. विद्यार्थ्यांना नाश्त्यामध्ये शिरा, उपमा, साबुदाणा खिचडी, फळे आणि दूध दिले जाते. तसेच जेवणातही ५ चपात्या, पोटभर भात, दोन भाज्या, लोणचे यांचा समावेश असतो.

टॅग्स :Studentविद्यार्थीMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार