शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

राष्ट्रवादीकडून ठाण्यात महागाईविराेधात ‘श्री राम, जय राम’चे होर्डिंग्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2022 11:48 IST

"प्रभू रामाच्या नावाखाली धार्मिक विद्वेष पसरवून जनतेचे महागाईवरील लक्ष विचलित केले जात आहे."

ठाणे  :  मनसेने ठाण्याच्या विविध भागांत ‘चलो अयोध्या’चे बॅनर लावले असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसने शहरात ‘श्री राम, जय राम, जय जय राम’चे हाेर्डिंग लावून जीवघेण्या महागाईकडे लक्ष वेधले आहे. प्रभू रामाच्या नावाखाली धार्मिक विद्वेष पसरवून जनतेचे महागाईवरील लक्ष विचलित केले जात आहे. त्यामुळे मोठमोठ्या सभा घेणाऱ्यांनी आपल्या सभेतून याबाबत जाब विचारण्याचे धैर्य दाखवावे, असे आव्हान राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी दिले आहे.

राष्ट्रवादीने शहरभर इंधनाचे तुलनात्मक दर दर्शवणारे फलक लावले आहेत. २०१४ मध्ये पेट्रोलचा दर ७१   रुपये होता, तर आता ताे १२१ रुपयांच्या घरात आहे. २०१४ मध्ये डिझेल ५६ रुपये होते. आता तो दर १०५ रुपये झाला आहे. २०१४ मध्ये ४१० रुपयांत मिळणारा गॅस सिलिंडर आता ९५० रुपये झाला आहे. या महागाईमुळे आता जनतेला ‘श्री राम, जय राम, जय जय राम’ म्हणण्याची वेळ आली आहे, अशा आशयाचे फलक सध्या ठाणेकरांचे लक्ष वेधून घेत आहेत. भाजप कार्यालयाच्या समोरच असा होर्डिंग्ज लावून भाजपच्या येथील नेत्यांनी पंतप्रधान मोदींपर्यंत जनतेचा आक्राेश पोहाेचवावा,  असे आवाहन राष्ट्रवादीने केले आहे.

दरम्यान,  महागाईने गोरगरीब जनतेचे कंबरडे मोडले आहे. त्याची फिकीर कोणालाही नाही. इंधन दरवाढीविरोधात आंदोलने करून सत्तेवर आलेल्या भाजपला आपल्या सत्ताकाळात हे वाढलेले दर दिसत नाहीत, यासारखे दुर्दैव कोणते असणार? मोदी या महागाईबाबत कोणतेही भाष्य करीत नाहीत, तर राज्यात मोठ्या सभा घेणारे काही नेते धार्मिक उन्माद माजवण्याचा प्रयत्न करीत आहेत. ‘राज तिलक की करो तयारी, आ रहा है भगवाधारी’, असे म्हणत महागाईवर जनतेचे लक्ष जाऊ नये, यासाठी धार्मिक विद्वेष पसरविण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आराेप परांजपे यांनी केला. 

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसMNSमनसेthaneठाणेInflationमहागाई