शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

धर्मनिरपेक्षता टिकवण्याची जबाबदारी आता हिंदूंची- संजय मंगला गोपाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2020 01:05 IST

‘टॉक शो’मध्ये मांडले मत

ठाणे : देश स्वतंत्र झाला, त्यावेळी फाळणीला आणि धर्माधिष्ठित पाकिस्तानात जाण्यास नकार देऊन भारतीय मुसलमानांनी धर्मनिरपेक्षता सिद्ध केली. सद्य:स्थितीत नागरिकता दुरु स्ती कायदा आणि त्यानंतर अपेक्षित जनसंख्या आणि नागरिक नोंदणीतून या देशाला धर्माधिष्ठित राष्ट्र बनू न देणे, ही हिंदू नागरिकांची जबाबदारी आहे, अशा शब्दांत संजय मंगला गोपाळ यांनी मत मांडले.

महात्मा गांधी स्मृती दिनानिमित्त संविधान, नागरिकता आणि युवकांचे हक्क या विषयावर समता विचार प्रसारक संस्था आणि म्यूज फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच आयोजित टॉक शोच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. संजय मंगला गोपाळ होते. यावेळी कायद्याने वागा चळवळीचे राज असरोंडकर म्हणाले की, विविध धर्म, जाती, संस्कृती, वैविध्यातून देश घडला आहे. संविधानाने सर्वांना एका सूत्रात बांधले आहे. संविधानाने जसे धर्म आणि उपासनेचे स्वातंत्र्य बहाल केले आहे, तसेच विवेकवादी बनण्याची दिशाही अधोरेखित केली आहे.

संविधान, नागरिकता आदी मुद्यांवर संवाद प्रक्रिया सुरू ठेवू या. प्रत्येकाला स्वत:चे मत असायला हवे, त्याबरोबरच दुसऱ्यांचे मत ऐकण्याचे सामर्थ्यही असायला पाहिजे. आपले मत दुरु स्त करण्याची तयारीदेखील असली पाहिजे. लेखक आणि संविधान अभ्यासक सुरेश सावंत म्हणाले, संविधान हा एक संकल्प आहे. एका लांब प्रक्रि येतून संविधानाची निर्मिती झाली आहे. लोकांनी निवडून दिलेल्या ३९९ संविधान सभेतील प्रतिनिधींनी प्रदीर्घ चर्चा आणि वाद यातून संविधान निर्माण केले आहे. नागरिकता कायद्यातील दुरु स्ती हे तत्त्व म्हणून संविधानाच्या भूमिकेविरोधी आहे.

‘ओपिनियन फोरम बनवा’

विद्यार्थ्यांनी या प्रश्नावर पालकांशी संवाद साधला पाहिजे. युवकांच्या जडणघडणीसाठी ‘एक ओपिनियन फोरम’ बनवावा, असा सल्ला लघुपटकार डॉ. संतोष पाठारे यांनी यावेळी दिला.

टॅग्स :HinduismहिंदुइझमthaneठाणेMaharashtraमहाराष्ट्र