शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
2
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
4
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
5
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
6
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
7
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
8
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
9
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
10
"काय गं तुला खूप माज आलाय का?", जुई गडकरीला तरुणीकडून धमकी; अभिनेत्री म्हणाली, आता थेट पोलीस…
11
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
12
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
13
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
14
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
15
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
16
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
17
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
18
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
19
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
20
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत

कामगारांच्या फसवेगिरीने यंत्रमागमालक हैराण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2019 12:09 AM

भिवंडीतील प्रकार : आगाऊ रक्कम घेऊन होतात गायब, संपर्कासाठी नंबरही देत नाहीत

भिवंडी : शहरातील यंत्रमागमालक कमी कामगारांमुळे त्रस्त असताना त्यांच्या असाह्यतेचा फायदा उचलत काही यंत्रमाग कामगार मालकांची चांगलीच फसवणूक करत आहेत. यंत्रमागावर काम करण्याची ग्वाही देत कामगार कारखाना मालकांकडून आगाऊ पैसे घेऊन पळून जात असल्याच्या घटना घडत आहेत. मात्र याबाबत यंत्रमाग मालकांनी पोलिसांकडे धाव न घेतल्याने कामगारांचे चांगलेच फावले आहे.

शहर आणि परिसरांत आठ लाख यंत्रमाग असून त्यावर काम करणारे अनेक कामगार हे उत्तर भारत, दक्षिण भारतातून येतात. मुलांच्या शाळेला सुटी पडल्याने व गावाला लग्नसराई असल्याने अनेक कामगार तेथे गेले आहेत. दरम्यान यार्न मार्केट व कापड मार्केटमधील मंदीच्या कारणाने कसेबसे यंत्रमाग चालवत दिवस ढकलत असताना कामगारांची गरज भासू लागली आहे. तर काही कारखान्यांना टाळे लावण्यासारखी स्थिती झाली आहे. कारखाना बंद पडू नये म्हणून यंत्रमागमालक रात्रंदिवस कामगारांच्या शोधात फिरत आहेत.काही ठिकाणी रोजंदारी कामगारांचे अड्डे सुरू झाले असून त्या ठिकाणाहून जास्त मजुरी देऊन मालक वेळ मारून नेत आहेत. तर आलेला कामगार कोठे जाऊ नये म्हणून त्यास लालसेपोटी आगाऊ रक्कम दिली जाते. त्याचा गैरफायदा घेत रोजंदारीचे कामगार आठवड्याचा पगार आगाऊ घेऊन पळू लागले आहेत. हे कामगार मोबाइल नसल्याचे कारण पुढे करतात. पळून गेल्यानंतर त्यांचा कुठेही पत्ता लागत नाही.कामगारांची नोंद होणे गरजेचेकाही वर्षापूर्वी शहरात आलेला यंत्रमाग कामगाराची नोंद कामगार कार्यालयात करून नंतर त्याने कारखान्यात काम करण्यास जावे. त्यामुळे सरकारी कार्यालयात कामगारांची नोंद होऊन कामगार व यंत्रमाग मालकांनाही सुरक्षा मिळणार होती. हा विषय कामगार संघटनांच्या मागणीवरून राज्य सरकारच्या विचाराधीन होता. परंतु कामगारांना सुविधा नाकारणाऱ्या स्थानिक यंत्रमाग मालकांनी यास विरोध केला. परिणामी कारखाना मालकांना हा त्रास होऊ लागला आहे. कामगार व मालकांतील संबंध सुधारावेत यासाठी या सुविधेचा पुनर्विचार करून सरकारने ही योजना अंमलात आणावी,अशी माहिती टेक्सटाईल मजदूर सभेचे सचिव विजय खाने यांनी दिली.

टॅग्स :bhiwandiभिवंडीthaneठाणे