शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
2
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
3
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
4
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
5
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
6
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
7
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
8
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
9
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
10
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
11
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
12
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
13
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
14
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
15
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
16
Ahmedabad Plane Crash: विमान दुर्घटनेमुळे सलमान खानने घेतला मोठा निर्णय, म्हणाला-
17
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
18
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
19
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
20
आईचे दागिने विकून पत्नीला शिकवलं, सरकारी नोकरी मिळताच तिनं कांड केलं! पतीची पोलिसांत धाव

तानसा अभयारण्यातील २१ हरणांचा कळप गायब, वन्यजीव विभाग अनभिज्ञ असल्याने आश्चर्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 23:47 IST

वणव्यात वेली, झाडे, झुडपांसह अन्न जळून खाक झाल्याने निवाऱ्यासह अन्नपाण्याची गंभीर समस्या भेडसावणाऱ्या पशुपक्ष्यांना स्थलांतरित व्हावे लागत आहे.

शेणवा :  शहापूर तालुक्यातील वन्यजीव विभागाच्या तानसा अभयारण्यातून चितळ प्रजातीच्या २१ हरणांचा कळप दिसेनासे झाला आहे. अचानक गायब झालेला हा हरणांचा कळप नेमका गेला कुणीकडे, याबाबत वन्यजीव विभागाला थांगपत्ताही लागत नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. ही हरणे इतरत्र स्थलांतरित झाली? त्यांची शिकार झाली, की अन्न पाण्याविना मृत पावली, हा संशोधनाचा विषय ठरला आहे.वणव्यात वेली, झाडे, झुडपांसह अन्न जळून खाक झाल्याने निवाऱ्यासह अन्नपाण्याची गंभीर समस्या भेडसावणाऱ्या पशुपक्ष्यांना स्थलांतरित व्हावे लागत आहे. लोकवस्तीकडे येणाऱ्या पशुपक्ष्यांना जीव गमवावा लागण्याच्या घटना ताज्या असतानाच तानसा अभयारण्यातून अचानक गायब झालेल्या हरणांच्या कळपाबाबत तर्कवितर्क लढविले जात आहेत. उरण येथील एका नेव्ही कॅम्पमध्ये बंदिस्त असलेल्या चितळ प्रजातीच्या २१ हरणांच्या कळपाला मुक्त संचार करता यावा, या उद्देशाने वन्यजीव विभागाने आठ वर्षांपूर्वी तानसा, वैतरणा, खर्डी, वाडा, परळी, सूर्यमाल अशा ३२० चौरस किमी विस्तीर्ण क्षेत्र असलेल्या तानसा अभयारण्यात सोडले होते. तानसा वनपरिक्षेत्रातील क्वारीपाडा जंगलात सोडण्यात आलेला पाणथळीच्या जागी दिसणारा हरणांचा कळप आता एक ते दीड वर्षापासून दिसेनासा झाल्याची माहिती वनकर्मचाऱ्याने नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर दिली. 

सुरक्षेचा प्रश्न गंभीरहरणांचा हा कळप इतरत्र स्थलांतरित झाला आहे का, असेल तर कोणत्या ठिकाणी सुरक्षित आहे ? आता न दिसणाऱ्या हरणांची शिकार झाली? की अन्न पाण्याविना मृत पावली, याबाबत शोध घेणे आवश्यक असून, या हरणांच्या सुरक्षेसह जंगलातील इतर पशुपक्ष्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. 

टॅग्स :shahapurशहापूर