शहरं
Join us  
Trending Stories
1
Leh Protest: लेहमध्ये आंदोलनाला हिंसक वळण, भाजप कार्यालय पेटवले, सोनम वांगचुक १५ दिवसांपासून उपोषणावर
2
"योगी स्वतःला पीएम मोदींचा उत्तराधिकारी समजतात...!"; CWC च्या बैठकीत खर्गेंचा मोठा हल्ला, नीतीश कुमारांसाठी असा शब्द वापरला
3
पुण्यातील रविवार पेठेत शुकशुकाट; ऐन नवरात्रीत घागरा, ड्रेस घ्यायला महिलावर्ग येईना..., व्यापाऱ्यांत कुजबुज...
4
Maharashtra Rain Update: पुढील चार दिवस विदर्भात वारे, विजांसह मुसळधार पावसाचा इशारा; बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा
5
GST कपातीचा फायदा मिळत नाहीये? टोल-फ्री नंबर किंवा व्हॉट्सअॅपवर करू शकता थेट तक्रार
6
Mumbai Crime: हाताच्या नसा कापल्या गेल्या अन्... पोलिसाच्या मृत्युचे कोडे उलगडले; पत्नी, मुलाला अटक
7
३.७ कोटी देऊन बॉयफ्रेंडच्या पत्नीसोबत केली तडजोड, पण नंतर घडलं असं काही, पैसेही गेले आणि... 
8
Gold Silver Price 24 September: नवरात्रीत सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण, आता खरेदी करावं की आणखी स्वस्त होण्याची वाट पाहावी?
9
जगातील सर्वात मोठ्या मुस्लीम देशाच्या राष्ट्रपतीनं UN महासभेत म्हटलं, "ॐ  शांति ओम..." 
10
कोणतेही अधिकचे निकष न लावता दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत करणार, मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा
11
भलीमोठी स्क्रीन, अल्ट्रा एचडी डिस्प्ले; सोनी कंपनीच्या टीव्हीवर थेट ५० हजारांची सूट!
12
नवरात्र विनायक चतुर्थी २०२५: ५ मिनिटांत होणारे गणेश स्तोत्र म्हणा, शाश्वत कृपा-लाभ मिळवा!
13
IND vs BAN: अर्शदीप सिंगला आज संधी मिळणार? कोणाचा पत्ता कट होणार? अशी असू शकते Playing XI
14
Video: बँकाँकमध्ये भूमिगत रेल्वे स्टेशनचे काम सुरु होते; अचानक रस्त्यावर भगदाड पडले, सगळे...
15
नवरात्र विनायक चतुर्थी २०२५: व्रत पूजन कसे कराल? पाहा, सोपी पद्धत, शुभ मुहूर्त अन् मान्यता
16
Asia Cup 2025: तिलक वर्मा नवा विक्रम रचण्याच्या उंबरठ्यावर; शिखर धवनला मागे टाकण्याची संधी
17
३ दिवस धन-महालक्ष्मी योग: ९ राशींना नवरात्र लकी, अपूर्व लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा, वैभव-भरभराट!
18
GPS लोकेशनमुळे तुमच्या फोनची बॅटरी लवकर संपते का? नेमकं कारण तरी काय? जाणून घ्या
19
मुख्यमंत्र्यांचं उद्योगपती अजीम प्रेमजी यांना पत्र; उधारीत का मागितला एक रस्ता?

तानसा अभयारण्यातील २१ हरणांचा कळप गायब, वन्यजीव विभाग अनभिज्ञ असल्याने आश्चर्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 23:47 IST

वणव्यात वेली, झाडे, झुडपांसह अन्न जळून खाक झाल्याने निवाऱ्यासह अन्नपाण्याची गंभीर समस्या भेडसावणाऱ्या पशुपक्ष्यांना स्थलांतरित व्हावे लागत आहे.

शेणवा :  शहापूर तालुक्यातील वन्यजीव विभागाच्या तानसा अभयारण्यातून चितळ प्रजातीच्या २१ हरणांचा कळप दिसेनासे झाला आहे. अचानक गायब झालेला हा हरणांचा कळप नेमका गेला कुणीकडे, याबाबत वन्यजीव विभागाला थांगपत्ताही लागत नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. ही हरणे इतरत्र स्थलांतरित झाली? त्यांची शिकार झाली, की अन्न पाण्याविना मृत पावली, हा संशोधनाचा विषय ठरला आहे.वणव्यात वेली, झाडे, झुडपांसह अन्न जळून खाक झाल्याने निवाऱ्यासह अन्नपाण्याची गंभीर समस्या भेडसावणाऱ्या पशुपक्ष्यांना स्थलांतरित व्हावे लागत आहे. लोकवस्तीकडे येणाऱ्या पशुपक्ष्यांना जीव गमवावा लागण्याच्या घटना ताज्या असतानाच तानसा अभयारण्यातून अचानक गायब झालेल्या हरणांच्या कळपाबाबत तर्कवितर्क लढविले जात आहेत. उरण येथील एका नेव्ही कॅम्पमध्ये बंदिस्त असलेल्या चितळ प्रजातीच्या २१ हरणांच्या कळपाला मुक्त संचार करता यावा, या उद्देशाने वन्यजीव विभागाने आठ वर्षांपूर्वी तानसा, वैतरणा, खर्डी, वाडा, परळी, सूर्यमाल अशा ३२० चौरस किमी विस्तीर्ण क्षेत्र असलेल्या तानसा अभयारण्यात सोडले होते. तानसा वनपरिक्षेत्रातील क्वारीपाडा जंगलात सोडण्यात आलेला पाणथळीच्या जागी दिसणारा हरणांचा कळप आता एक ते दीड वर्षापासून दिसेनासा झाल्याची माहिती वनकर्मचाऱ्याने नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर दिली. 

सुरक्षेचा प्रश्न गंभीरहरणांचा हा कळप इतरत्र स्थलांतरित झाला आहे का, असेल तर कोणत्या ठिकाणी सुरक्षित आहे ? आता न दिसणाऱ्या हरणांची शिकार झाली? की अन्न पाण्याविना मृत पावली, याबाबत शोध घेणे आवश्यक असून, या हरणांच्या सुरक्षेसह जंगलातील इतर पशुपक्ष्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. 

टॅग्स :shahapurशहापूर