शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

सोशल मीडियामुळे दुभंगणारे संसार जोडणार, महापालिका करणार नऊ लाखांचा खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2018 04:55 IST

सध्या सोशल मीडियामुळे जग हायटेक बनू पाहतेय. परंतु, याच सोशल मीडियाचे वाईट परिणामही दिसून आले आहेत. यामुळे पतीपत्नीमध्ये विसंवाद होऊन प्रकरणे काडीमोडपर्यंत येऊन पोहोचली असून याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.

ठाणे - सध्या सोशल मीडियामुळे जग हायटेक बनू पाहतेय. परंतु, याच सोशल मीडियाचे वाईट परिणामही दिसून आले आहेत. यामुळे पतीपत्नीमध्ये विसंवाद होऊन प्रकरणे काडीमोडपर्यंत येऊन पोहोचली असून याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. किंबहुना, पतीपत्नीमध्ये भांडण होणे हेदेखील नित्याचेच होऊ लागले आहे. त्यामुळेच ठाणे महापालिकेने पतीपत्नीमधील ही भांडणे सोडवण्यासाठी ठाणे महापालिकेने कुटुंबसौख्य ही योजना पुढे आणली आहे.सध्या घटस्फोटांचे प्रमाण हे नवीन जोडप्यांमध्ये अधिक प्रमाणात दिसून आले आहे. त्यामध्ये सोशल मीडियामुळे होणाऱ्या घटस्फोटांचे प्रमाण अधिक आहे. याच सोशल मीडियाच्या अधिकच्या वापरामुळे पतीपत्नीमधील संवादही कमी होऊ लागले आहेत. त्यांचे संभाषणदेखील आता याच माध्यमातून होताना दिसत आहे. परंतु, याचे दुष्परिणामही दिसून आले आहेत.या भांडणातून ९० टक्के जोडपी जरी पुन्हा एक होत असली तरीदेखील १० टक्के जोडप्यांमध्ये भांडणाचे परिणाम घटस्फोटापर्यंत जाताना दिसतात. दोघे जण एकमेकांमधील चुकाच काढण्यात धन्यता मानत असतात. त्यामुळे त्यांना काउन्सिलिंग करण्याचे काम पालिकेने हाती घेण्याचे निश्चित केले आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाने यासाठी ‘कुटुंबसौख्य’ ही योजना पुढे आणली आहे. तिच्या माध्यमातून दाम्पत्यामधील तंटा सोडवण्याचे काम काउन्सिलिंगच्या माध्यमातून केले जाणार आहे.एका जोडप्याचे साधारणपणे सहा वेळा काउन्सिलिंग केले जाणार आहे, अशी योजना राबवणारी ठाणे ही देशातील पहिली महापालिका ठरणार असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. प्रत्येक काउन्सिलिंगसाठी साधारणपणे ५०० रुपयांचा खर्च अपेक्षित धरला असून वर्षाला ३०० जोडप्यांचे काउन्सिलिंग करण्याचा निर्धार पालिकेने केला आहे.

टॅग्स :marriageलग्नnewsबातम्याSocial Mediaसोशल मीडिया