शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
6
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
7
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
8
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
9
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
10
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
11
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
12
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
13
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
14
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
15
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
16
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
17
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
20
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...

सोशल मीडियामुळे दुभंगणारे संसार जोडणार, महापालिका करणार नऊ लाखांचा खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2018 04:55 IST

सध्या सोशल मीडियामुळे जग हायटेक बनू पाहतेय. परंतु, याच सोशल मीडियाचे वाईट परिणामही दिसून आले आहेत. यामुळे पतीपत्नीमध्ये विसंवाद होऊन प्रकरणे काडीमोडपर्यंत येऊन पोहोचली असून याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.

ठाणे - सध्या सोशल मीडियामुळे जग हायटेक बनू पाहतेय. परंतु, याच सोशल मीडियाचे वाईट परिणामही दिसून आले आहेत. यामुळे पतीपत्नीमध्ये विसंवाद होऊन प्रकरणे काडीमोडपर्यंत येऊन पोहोचली असून याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. किंबहुना, पतीपत्नीमध्ये भांडण होणे हेदेखील नित्याचेच होऊ लागले आहे. त्यामुळेच ठाणे महापालिकेने पतीपत्नीमधील ही भांडणे सोडवण्यासाठी ठाणे महापालिकेने कुटुंबसौख्य ही योजना पुढे आणली आहे.सध्या घटस्फोटांचे प्रमाण हे नवीन जोडप्यांमध्ये अधिक प्रमाणात दिसून आले आहे. त्यामध्ये सोशल मीडियामुळे होणाऱ्या घटस्फोटांचे प्रमाण अधिक आहे. याच सोशल मीडियाच्या अधिकच्या वापरामुळे पतीपत्नीमधील संवादही कमी होऊ लागले आहेत. त्यांचे संभाषणदेखील आता याच माध्यमातून होताना दिसत आहे. परंतु, याचे दुष्परिणामही दिसून आले आहेत.या भांडणातून ९० टक्के जोडपी जरी पुन्हा एक होत असली तरीदेखील १० टक्के जोडप्यांमध्ये भांडणाचे परिणाम घटस्फोटापर्यंत जाताना दिसतात. दोघे जण एकमेकांमधील चुकाच काढण्यात धन्यता मानत असतात. त्यामुळे त्यांना काउन्सिलिंग करण्याचे काम पालिकेने हाती घेण्याचे निश्चित केले आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाने यासाठी ‘कुटुंबसौख्य’ ही योजना पुढे आणली आहे. तिच्या माध्यमातून दाम्पत्यामधील तंटा सोडवण्याचे काम काउन्सिलिंगच्या माध्यमातून केले जाणार आहे.एका जोडप्याचे साधारणपणे सहा वेळा काउन्सिलिंग केले जाणार आहे, अशी योजना राबवणारी ठाणे ही देशातील पहिली महापालिका ठरणार असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. प्रत्येक काउन्सिलिंगसाठी साधारणपणे ५०० रुपयांचा खर्च अपेक्षित धरला असून वर्षाला ३०० जोडप्यांचे काउन्सिलिंग करण्याचा निर्धार पालिकेने केला आहे.

टॅग्स :marriageलग्नnewsबातम्याSocial Mediaसोशल मीडिया