शहरं
Join us  
Trending Stories
1
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
2
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
3
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
4
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
5
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
6
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
7
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
8
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
9
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
10
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
11
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
12
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
13
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
14
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
15
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
16
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
17
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
18
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
19
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
20
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 

सोशल मीडियामुळे दुभंगणारे संसार जोडणार, महापालिका करणार नऊ लाखांचा खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2018 04:55 IST

सध्या सोशल मीडियामुळे जग हायटेक बनू पाहतेय. परंतु, याच सोशल मीडियाचे वाईट परिणामही दिसून आले आहेत. यामुळे पतीपत्नीमध्ये विसंवाद होऊन प्रकरणे काडीमोडपर्यंत येऊन पोहोचली असून याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.

ठाणे - सध्या सोशल मीडियामुळे जग हायटेक बनू पाहतेय. परंतु, याच सोशल मीडियाचे वाईट परिणामही दिसून आले आहेत. यामुळे पतीपत्नीमध्ये विसंवाद होऊन प्रकरणे काडीमोडपर्यंत येऊन पोहोचली असून याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. किंबहुना, पतीपत्नीमध्ये भांडण होणे हेदेखील नित्याचेच होऊ लागले आहे. त्यामुळेच ठाणे महापालिकेने पतीपत्नीमधील ही भांडणे सोडवण्यासाठी ठाणे महापालिकेने कुटुंबसौख्य ही योजना पुढे आणली आहे.सध्या घटस्फोटांचे प्रमाण हे नवीन जोडप्यांमध्ये अधिक प्रमाणात दिसून आले आहे. त्यामध्ये सोशल मीडियामुळे होणाऱ्या घटस्फोटांचे प्रमाण अधिक आहे. याच सोशल मीडियाच्या अधिकच्या वापरामुळे पतीपत्नीमधील संवादही कमी होऊ लागले आहेत. त्यांचे संभाषणदेखील आता याच माध्यमातून होताना दिसत आहे. परंतु, याचे दुष्परिणामही दिसून आले आहेत.या भांडणातून ९० टक्के जोडपी जरी पुन्हा एक होत असली तरीदेखील १० टक्के जोडप्यांमध्ये भांडणाचे परिणाम घटस्फोटापर्यंत जाताना दिसतात. दोघे जण एकमेकांमधील चुकाच काढण्यात धन्यता मानत असतात. त्यामुळे त्यांना काउन्सिलिंग करण्याचे काम पालिकेने हाती घेण्याचे निश्चित केले आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाने यासाठी ‘कुटुंबसौख्य’ ही योजना पुढे आणली आहे. तिच्या माध्यमातून दाम्पत्यामधील तंटा सोडवण्याचे काम काउन्सिलिंगच्या माध्यमातून केले जाणार आहे.एका जोडप्याचे साधारणपणे सहा वेळा काउन्सिलिंग केले जाणार आहे, अशी योजना राबवणारी ठाणे ही देशातील पहिली महापालिका ठरणार असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. प्रत्येक काउन्सिलिंगसाठी साधारणपणे ५०० रुपयांचा खर्च अपेक्षित धरला असून वर्षाला ३०० जोडप्यांचे काउन्सिलिंग करण्याचा निर्धार पालिकेने केला आहे.

टॅग्स :marriageलग्नnewsबातम्याSocial Mediaसोशल मीडिया