शहरं
Join us  
Trending Stories
1
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-रादजवर खोचक टीका
2
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
3
कुणी फुकट खाऊ घालत नाही...! आसिम मुनीर-डोनाल्ड ट्रम्प 'लन्च पॉलिटिक्स'नं पाकिस्तानचंच टेन्शन वाढवलं
4
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेवेळी एका टिफिनवाल्याने वाचवला ८० डॉक्टरांचा जीव
5
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
6
Pandharpur Wari 2025: आता स्वस्तात करा विठ्ठलाचे दर्शन; एसटी महामंडळाची खास ऑफर!
7
१ जुलैपासून बदलणार बँकिंगचे नियम, क्रेडिट कार्ड बिल पेमेंटमध्येही होणार बदल; जाणून घ्या माहिती
8
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
9
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
10
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”
11
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
12
पंढरपुरात मोठी घटना! मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू
13
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
14
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
15
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
16
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
17
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
18
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
19
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव
20
Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण

Video: ठाणे शहराला पावसाने झोडपले; अनेक भागात पाणी साचले तर रेल्वे सेवाही विस्कळीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2019 12:53 IST

सकाळपासूनच पडणाऱ्या पावसाने ठाणेकरांचे जनजीवन विस्कळीत झालेला आहे ,तसेच मध्य रेल्वे सेवादेखील विस्कळीत झालेली आहे

विशाल हळदे  

ठाणे - सतत तीन दिवस पडणाऱ्या पावसाने ठाण्यात पुन्हा आपली हजेरी लावली आहे. सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. ढगाळ वातावरण झाले असून वाहने देखील धीम्यागतीने धावत आहे. तर ठाण्याच्या वंदना बस स्टॉप वर आणि काही सखोल भागात पाणी साचले चित्र दिसून येत आहे. गेल्या तासाभरात 26 मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून एकूण दिवसभरात अडीचशे मिलिमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झालेली आहे.

सकाळपासूनच पडणाऱ्या पावसाने ठाणेकरांचे जनजीवन विस्कळीत झालेला आहे ,तसेच मध्य रेल्वे सेवादेखील विस्कळीत झालेली आहे ठाणे ते सीएसटीकडे जाणाऱ्या गाड्या बंद झाले आहेत रेल्वे पटरी वरती पाणी साचल्यामुळे ठाणे ते कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या गाड्या धावत आहे पावसाचा जोर कायम राहिला तर नक्कीच अनेक सखोल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचण्याची शक्यता आहे. 

मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या सर्व गाड्या ठप्प झालेल्या आहेत. गेल्या अडीच ते तीन तासापासून फलाट क्रमांक चार वरती लोकल ट्रेन उभी आहे. याचा फटका मोठ्या प्रमाणात रेल्वे प्रवाशांना बसला आहे ,तर पाहू शकतात महिला डब्यात गेल्या अडीच-तीन तासापासून महिला जागीच बसूनच आहे. रेल्वे कडुन सूचना जरी दिले असले तरी उपायोजना काहीच नसल्याचं रेल्वे प्रवाशी महिला सांगत आहे. रेल्वे रुळावर पाणी साचल्यामुळे मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या गाड्या ठाणे स्थानकातच उभे आहेत. तर मुंबईवरून काही प्रमाणातच गाड्या कल्याणच्या दिशेने येत आहे .जस जसा पाण्याचा निचरा होईल त्यानंतरच रेल्वेसेवा सुरळीत होईल असे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. पुन्हा आज देखील रेल्वेचा फटका रेल्वे प्रवाशांना बसलेला आहे.

कळवा ते मुंब्रा जाणाऱ्या रस्त्यावर  मोठ्या प्रमाणात पाणी साचलेला आहे. दोन ते तीन फूट पाणी साचल्यामुळे वाहनधारकांना वाहन चालवण्यास नाहक त्रास सहन करावा लागत आहे. सदर ठिकाणी पोलीस या रस्त्याने न जाण्यासाठी मज्जाव घालत आहे रस्त्यालगत नाला असल्याकारणाने नाल्याचे पाणी स्त्यावर आले आहे, त्यामुळे आजूबाजूचा इमारतीत देखील हेच पाणी शिरल्यामुळे इमारतीतील राहणाऱ्या नागरिकांना त्याचा फटका बसला आहे .

टॅग्स :Rainपाऊसrailwayरेल्वेfloodपूर