शहरं
Join us  
Trending Stories
1
Sikandar Shaikh Arrested: महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला अटक, पंजाब पोलिसांची कारवाई; प्रकरण काय?
2
"सारखं फुकटात, सारखं फुकटात; सारखं माफ, कसं व्हायचं"; कर्जमाफीवरून अजित पवारांनी शेतकऱ्यांना सुनावलं
3
"रुपाली चाकणकरांनी एका बाईला आमदाराविरोधात व्हिडीओ तयार लावलेला, ती बाई..."; रुपाली ठोंबरेंचा स्फोटक आरोप
4
किंमती वाढल्या, भारतात सोने खरेदी वाढली की कमी झाली? अवाक् करणारी आकडेवारी
5
Babar Azam World Record: धावांसाठी संघर्ष करणाऱ्या बाबर आझमनं मोडला हिटमॅन रोहित शर्माचा विश्वविक्रम
6
"मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देते"; रुपाली ठोंबरे पाटलांचा पोलीस ठाण्यात संताप, माधवी खंडाळकर प्रकरण तापलं
7
वडिलांचे निधन, स्वतः आयसीयूत दाखल... तरीही स्वप्न केले पूर्ण ! राज्यसेवा परीक्षेत नागपूरची प्रगती अनुसूचित जातीतून आली राज्यात पहिली
8
"नाव लक्षात ठेवा!" नेहमी तिखट भाष्य करणाऱ्या इंग्लिश क्रिकेटरचं जेमी संदर्भातील 'ते' ट्विट व्हायरल
9
संजय राऊतांची प्रकृती बिघाड, २ महिने उपचार घेणार; PM नरेंद्र मोदींनी घेतली दखल, म्हणाले...
10
टोयोटा २०३० पर्यंत भारतात १५ नवीन वाहने आणणार, दोन नवीन SUV अन् एक पिकअप ट्रकचा समावेश
11
Smartphones: नवा फोन घेण्याचा विचार करताय? थांबा! बाजारात येतायेत एकापेक्षा एक भारी फोन
12
धक्कादायक! विद्यापीठात महिलेवर लैंगित अत्याचार; बंगळुरू विद्यापीठाच्या प्राध्यापकाला अटक
13
"काहीतरी गडबड आहे!" आरोपी रोहित आर्यवर कसा आला संशय?; प्रत्यक्षदर्शीने सांगितली रेस्क्यू कहाणी
14
मेट्रो ठेकेदार जे. कुमार इन्फ्राला ५ लाखाचा दंड; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर एमएमआरडीएचा दणका
15
Dularchand Yadav: दुलारचंद यादव यांचा मृत्यू गोळी लागल्याने झाला नाही, डॉक्टरांचा मोठा खुलासा!
16
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
17
मोबाईलचे जीपीएस ठरू शकते तुमच्या डिजिटल अरेस्टचे कारण; आयआयटी दिल्लीत महत्त्वाचा रिसर्च
18
बॉर्डर पार करुन एकाचा भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न; BSF जवानांनी पाकिस्तानी नागरिकाला पकडले
19
ICC T20 Rankings : टीम इंडियाचं अव्वलस्थान धोक्यात! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर दुहेरी आव्हान
20
"मी त्याला काही वर्षांपूर्वीही भेटले होते...:, रोहित आर्याबद्दल रुचिता जाधवचा खुलासा, ९ मिनिटं...

कल्याणमध्ये पावसाचा हाहाकार; भातसा, काळू व उल्हास या नद्यांना महापूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2019 12:16 IST

कल्याण तालुक्यातील भातसा, काळू व उल्हास या तीनही नद्यांना महापूर आला आहे. यामुळे नदीकाठच्या गावात पाणी शिरले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. सर्वत्र पाणीच पाणी अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.

उमेश जाधव

टिटवाळा-: खडवली येथील भातसा पूर आल्याने नदीवरील पूल पाण्याखाली गेल्याने खडवली-पडघा वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. तसेच भातयाच्या पुरामुळे खडवली नदीकाठच्या  इंदीरानगर, ज्यु, आदीवासी आश्रम शाळा परीसर, स्वामीसमर्थ मठ परीसर येथील ७० ते ८० घरात पुराचे पाणी शिरले आहे. नागरिकांत भिंतीचे वातावरण निर्माण झाले. पाण्याखाली गेलेल्या घरातील नागरिकांना येथील स्थानिक लोकांकडून बाहेर काढण्यात येत असून त्यांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. येथील स्थानिक नागरिक त्यांच्या मदतीला धावले असून त्यांच्या निवार्‍याची व खाण्या-पिण्याची व्यवस्था देखील करण्यात आली आहे.

दरम्यान रुंदी गावा जवळील  पुल रविवारी सकाळपासूनच पाण्याखाली गेले होता तो आतापर्यंत पाण्याखालीच आहे. यामुळे लगतच्या भागातील  रूंदे, आंबिवली, फळेगांव, मढ, उशिद, भोंगळपाडा, दानबाव, पळसोली, हाल, काकडपाडा आदी गावांतील दहा ते बारा गावांचा संपर्क तुटला आहे. तसेच याच काळू नदीवर वासुंद्री गावा जवळील असणारा पुत्र देखील रविवारी सायंकाळपासून पाण्याखाली गेल्याने येथील सांगोडा, कोंढेरी, मोस, वासुंद्री व निंबवली या पाच ते सहा गावांचा संपर्क तुटलेला आहे. 

कल्याण-मुरबाड महामार्गावर असणाऱ्या रायते गावाजवळ उल्हास नदीवरील पुलावरून देखील पुराचे पाणी गेले आहे. यामुळे या महामार्गावरील कल्याण- मुरबाड- नगर ही वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. या मार्गावर जागोजागी वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत. तसेच या चंद्रहास नदीचे पाणी रायते, कांबा, वरप, आणे व म्हारळ येथील नदीकाठच्या घरात शिरले आहे. या नदीकाठच्या गावातील नागरिकांत भितीचे वातावरण पसरले आहे. प्रशासनाने या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

टिटवाळा रेल्व स्थानक ते गणपती मंदिर या मुख्य रस्त्यावर शिव मंदिरा लगत असणारा साकव या वरून पाच ते सहा फुट काळू नदीच्या पुराचे पाणी शिरले आहे. ह्या कारणास्तव या रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. टिटवाळा मंदिर परिसरातील लोक पलीकडे तर रेल्वे स्थानक परिसरातील लोक अलीकडे अडकून पडली असल्याचे चित्र दिसून येते आहे. अनेक ठिकाणी पावसाचे पाणी तुंबल्याने येथील नारायण नगर रोडवर असणाऱ्या गणेश कृपा चाळीतील २५ घरे पाण्याखाली आहेत. तर सांडोडा रोड येथील २०० रूम पाण्याखाली गेल्याने येथील जनजीवन विस्कळित झाले आहे. रेल्वे ट्रॅक मध्ये पाणी असल्याने रेल्वे वाहतूक देखील ठप्प झाली आहे. सध्या पावसाचा जोर अजूनच वाढला असल्याने आणखीन पूरसदृश्य परिस्थिती  निर्माण होणार असल्याची भीती व्यक्त केली जाते.

टॅग्स :Rainपाऊसfloodपूरriverनदी