शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

पावसाने दाणादाण, अनेक भाग जलमय, वाहतुकीचा खोळंबा; ठाणे जिल्ह्यात दीड हजार लोकांचे स्थलांतर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2024 05:36 IST

‘मोडकसागर’चे दोन दरवाजे उघडले

लाेकमत न्यूज नेटवर्क, ठाणे :ठाणे जिल्ह्यात गुरुवारी दिवसभरात १३८ मि.मी. पाऊस पडला. अनेक वस्त्यांमध्ये पाणी शिरल्याने एक हजार ४०८ नागरिकांचे स्थलांतर केले. मुंबई, ठाणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणीसाठ्यात माेठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. तानसा धरणापाठाेपाठ गुरुवारी माेडकसागर धरण भरल्याने दाेन दरवाजे उघडले. भातसा धरणातील पाण्याचा काेणत्याही क्षणी विसर्ग होण्याची शक्यता आहे. त्यामुळे धरणांखालील गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. 

धरणातील पाणीसाठा 

भातसा धरणात सध्या ७२.६७ टक्के पाणीसाठा आहे. खबरदारीची उपाययाेजना म्हणून धरणातील पाण्याचा विसर्ग करावा लागणार आहे. माेडकसागर भरल्यामुळे दाेन दरवाजे उघडले. याप्रमाणेच आंध्रा धरणात ५६.८२ टक्के पाणीसाठा असून,  आज १३४ मिमी पाऊस पडला. मध्य वैतरणात ५३.३२ टक्के पाणीसाठा असून, गुरुवारी १६५ मिमी पाऊस पडला. बारवी धरणात ७६.६२ टक्के पाणीसाठा तयार झाला. १५४ मिमी पाऊस झालेल्या बारवी धरणाच्या कान्हाेळ, ठाकूरवाडी, पाटगाव आणि कान्हवरे या पाणलाेट क्षेत्रात जाेरदार पाऊस झाला.जिल्ह्यात सरासरी १३८.१ मिमी पाऊस 

जिल्ह्यात सरासरी १३८.१ मिमी. पाऊस झाला. सर्वाधिक पाऊस मुरबाडला २१२ मिमी. तर, सर्वांत कमी भिवंडीला ११२.७ मिमी पाऊस झाला. हवामान खात्याने शुक्रवारी जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट दिला आहे. पुढील तीन दिवस यलाे अलर्ट असल्यामुळे पावसाची संततधार सुरू राहील. 

‘एनडीआरएफ’ तैनात 

पावसामुळे जिल्ह्यातील सहा पक्क्या व कच्च्या घरांचे नुकसान झाले. कल्याण तालुक्यातील मोहने, वरप, वालधुनी, कल्याण, आणे, भिसोळ, रायते, आपटी, दहागाव, मांजर्ली ही गावे बाधित होण्याची शक्यता लक्षात घेत पाेलिसांसह ‘एनडीआरएफ’चे पथकही तैनात केले आहे.  

चिखली पूल पाण्याखाली; शहापूर, मुरबाड तालुक्यांचा संपर्क तुटला 

अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने ३५५ कुटुंबांमधील एक हजार ४०८ जणांना स्थलांतरित केले आहे. उल्हास नदीवरील रायते व रुंदे पूल पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे कल्याण-मुरबाड महामार्ग बंद आहे. रायते व रुंदे गावातील ९६ कुटुंबांना सुरक्षितस्थळी हलवले आहे.  मुरबाड तालुक्यातील चिखली पूल पाण्याखाली गेल्यामुळे शहापूर व मुरबाड तालुक्यांचा संपर्क तुटला. घाेरला पूलही पाण्याखाली गेला आहे. खबरदारीची उपाययाेजना म्हणून कल्याण आणि अंबरनाथ येथील १०७ कुटुंबांचे स्थलांतर केले आहे. कल्याण येथील ४० कुटुंबांतील १५६ व्यक्तींनी त्यांच्या नातेवाइकांच्या घरी आसरा घेतला. अंबरनाथ येथील ६७ कुटुंबांतील २०० जणांचे बीएसयूपी इमारतीत तात्पुरते स्थलांतर केले. बदलापूरजवळील कासगाव वृद्धाश्रमातील १२ जणांना स्थलांतरित केले.   

टॅग्स :thaneठाणेRainपाऊसmonsoonमोसमी पाऊस