शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
3
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
4
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
5
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
6
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
7
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
8
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
9
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
10
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
11
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
12
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
13
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
14
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
15
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
16
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
17
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
18
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
19
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
20
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

पावसाने दाणादाण, अनेक भाग जलमय, वाहतुकीचा खोळंबा; ठाणे जिल्ह्यात दीड हजार लोकांचे स्थलांतर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2024 05:36 IST

‘मोडकसागर’चे दोन दरवाजे उघडले

लाेकमत न्यूज नेटवर्क, ठाणे :ठाणे जिल्ह्यात गुरुवारी दिवसभरात १३८ मि.मी. पाऊस पडला. अनेक वस्त्यांमध्ये पाणी शिरल्याने एक हजार ४०८ नागरिकांचे स्थलांतर केले. मुंबई, ठाणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणीसाठ्यात माेठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. तानसा धरणापाठाेपाठ गुरुवारी माेडकसागर धरण भरल्याने दाेन दरवाजे उघडले. भातसा धरणातील पाण्याचा काेणत्याही क्षणी विसर्ग होण्याची शक्यता आहे. त्यामुळे धरणांखालील गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. 

धरणातील पाणीसाठा 

भातसा धरणात सध्या ७२.६७ टक्के पाणीसाठा आहे. खबरदारीची उपाययाेजना म्हणून धरणातील पाण्याचा विसर्ग करावा लागणार आहे. माेडकसागर भरल्यामुळे दाेन दरवाजे उघडले. याप्रमाणेच आंध्रा धरणात ५६.८२ टक्के पाणीसाठा असून,  आज १३४ मिमी पाऊस पडला. मध्य वैतरणात ५३.३२ टक्के पाणीसाठा असून, गुरुवारी १६५ मिमी पाऊस पडला. बारवी धरणात ७६.६२ टक्के पाणीसाठा तयार झाला. १५४ मिमी पाऊस झालेल्या बारवी धरणाच्या कान्हाेळ, ठाकूरवाडी, पाटगाव आणि कान्हवरे या पाणलाेट क्षेत्रात जाेरदार पाऊस झाला.जिल्ह्यात सरासरी १३८.१ मिमी पाऊस 

जिल्ह्यात सरासरी १३८.१ मिमी. पाऊस झाला. सर्वाधिक पाऊस मुरबाडला २१२ मिमी. तर, सर्वांत कमी भिवंडीला ११२.७ मिमी पाऊस झाला. हवामान खात्याने शुक्रवारी जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट दिला आहे. पुढील तीन दिवस यलाे अलर्ट असल्यामुळे पावसाची संततधार सुरू राहील. 

‘एनडीआरएफ’ तैनात 

पावसामुळे जिल्ह्यातील सहा पक्क्या व कच्च्या घरांचे नुकसान झाले. कल्याण तालुक्यातील मोहने, वरप, वालधुनी, कल्याण, आणे, भिसोळ, रायते, आपटी, दहागाव, मांजर्ली ही गावे बाधित होण्याची शक्यता लक्षात घेत पाेलिसांसह ‘एनडीआरएफ’चे पथकही तैनात केले आहे.  

चिखली पूल पाण्याखाली; शहापूर, मुरबाड तालुक्यांचा संपर्क तुटला 

अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने ३५५ कुटुंबांमधील एक हजार ४०८ जणांना स्थलांतरित केले आहे. उल्हास नदीवरील रायते व रुंदे पूल पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे कल्याण-मुरबाड महामार्ग बंद आहे. रायते व रुंदे गावातील ९६ कुटुंबांना सुरक्षितस्थळी हलवले आहे.  मुरबाड तालुक्यातील चिखली पूल पाण्याखाली गेल्यामुळे शहापूर व मुरबाड तालुक्यांचा संपर्क तुटला. घाेरला पूलही पाण्याखाली गेला आहे. खबरदारीची उपाययाेजना म्हणून कल्याण आणि अंबरनाथ येथील १०७ कुटुंबांचे स्थलांतर केले आहे. कल्याण येथील ४० कुटुंबांतील १५६ व्यक्तींनी त्यांच्या नातेवाइकांच्या घरी आसरा घेतला. अंबरनाथ येथील ६७ कुटुंबांतील २०० जणांचे बीएसयूपी इमारतीत तात्पुरते स्थलांतर केले. बदलापूरजवळील कासगाव वृद्धाश्रमातील १२ जणांना स्थलांतरित केले.   

टॅग्स :thaneठाणेRainपाऊसmonsoonमोसमी पाऊस