शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

ठाणे जिल्ह्यात संततधार पाऊस; २६ घरे पडली!

By सुरेश लोखंडे | Updated: August 18, 2022 11:54 IST

ठाणे जिल्ह्यात संततधार सुरू असलेल्या पावसामुळे भिवंडी, मुरबाड, शहापूर या तालुक्यांतील गावांमधील तब्बल २६ घरे पडली आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे: जिल्ह्यात संततधार सुरू असलेल्या पावसामुळे भिवंडी, मुरबाड, शहापूर या तालुक्यांतील गावांमधील तब्बल २६ घरे पडली आहेत. यामध्ये २३ घरे पक्की असून तीन घरे पक्की आहेत. तर दोन गाईगुरांचे गोठे आहेत.

जिल्ह्यात कालपासून जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व महामार्गांवर वाहतूक कोंडीने नागरिक हैराण आहे. तर ठाणे उपनगरीय प्रवास वाहतुकीचे वेळापत्रक कोलमडल्याने चाकरमान्यांचे हाल होत आहेत. शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनाही वाहतूक कोंडीचा फटका बसत आहे. ठाण्याचा घोडबंदर रोड, मुंबई-नाशिक महामार्ग, एक्स्प्रेस वेळ आली महामार्गांवर तासनतास वाहतूक खोळंबली आहे. जिल्ह्यात गेल्या २४ तासात सरासरी ७३.९ मिमी. पाऊस पडला. सर्वाधिक पाऊस भिवंडी तालुक्यात सरासरी ९२.३ मिमी. पडल्याची नोंद सकाळी घेण्यात आली आहे.

जिल्ह्यातील सर्व नद्यांपैक टिटवाळा येथून वाहत जाणारी काळू नदी लवकरच इशारा व धोक्याची पातळी ओलांडण्याची स्थिती आहे. जिल्ह्यातील पाणी पुरवठा करणारे धरणे आधीच भरलेली असल्यामुळे दरवाजे उघडून त्यातील पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. जिल्ह्यात खाड्यांना सकाळी ५ वाजता भरती आली आहे. तर सायंकाळी ४.४९ वा. ही भरती पुन्हा येणार आहे. या दरम्यान ३.६८ मीटर लाटा उसळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मुरबाड तालुक्यातील पवाळे, तळेगाव तर भिवंडीतील वेव्हळ येथील पक्के घरे पडली. तर शहापूर तालुक्यात १९ घरे पडली असून त्यात  सायगाव, खूटळ, लाखेवाडी, खरीवली, चेरपोली, साईनगर येथील घरांचा समावेश आहे.

टॅग्स :thaneठाणेRainपाऊस