शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

धुवाधार पावसाने घोडबंदर-ठाणे बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2018 04:00 IST

सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे काजूपाडा येथे भरपूर पाणी साचून ठाणे-घोडबंदर मार्गावरील वाहतूक बंद पडली. काशिमीरा भागातील मुंबई- अहमदाबाद महामार्गावरही वाहनांच्या लांबचलांब रांगा लागून वाहतूक ठप्प झाली.

मीरा रोड : सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे काजूपाडा येथे भरपूर पाणी साचून ठाणे-घोडबंदर मार्गावरील वाहतूक बंद पडली. काशिमीरा भागातील मुंबई- अहमदाबाद महामार्गावरही वाहनांच्या लांबचलांब रांगा लागून वाहतूक ठप्प झाली. शिवाय, मीरा-भार्इंदर शहरांतदेखील जागोजागी पाणी साचले असून दुपारी पाणी ओसरल्यानंतर वाहतूक सुरू झाली.

ठाणे-घोडबंदर मार्गालगतचे बेकायदा मातीभराव, त्यातच रस्त्याच्या मध्येच बांधलेल्या दुभाजकांमुळे येथे मोठ्या प्रमाणात पाणी साचते. त्यामुळे ठाणे-घोडबंदर रस्ता बंद होऊन असंख्य वाहने अडकली. मात्र महापालिका, जिल्हा प्रशासन, रस्ता ठेकेदार वा आपत्कालीन पथकांपैकी कोणीच येथे न फिरकल्याने पोलिसांनीच जेसीबी मागवून दुभाजक तोडले आणि पाण्याचा मार्ग मोकळा केल्याचे उपस्थितांनी सांगितले. रस्ता बांधताना खालून पाण्याचा निचरा करण्यासाठी आवश्यक असे नालेच बनवले नसल्याचे आढळले. दुपारी १२ च्या सुमारास वाहतूक हळूहळू सुरू करण्यात आली. विशेष म्हणजे ठाण्याहून येणारे मीरा-भार्इंदर महापालिका आयुक्त, उपायुक्त आणि काही अधिकारीदेखील यावेळी अडकून पडले होते.काशिमीरा, मीरा रोडच्या बहुतांश भागाचे पाणी घोडबंदर येथील ज्या उघाडीतून वाहून जाते, त्याच्या दरवाजांमध्ये कचरा अडकल्याने पाण्याचा निचरा वेगाने होत नव्हता. स्थानिक रहिवासी उपमहापौर चंद्रकांत वैती यांच्या ही बाब निदर्शनास आल्यानंतर पालिका अधिकारी आणि स्थानिक तेथे पोहोचले. एका गावकºयास उघाडीत उतरवून दारे उघडल्यानंतर पाण्याचा निचरा वेगाने होऊ लागला. पाण्यातून आलेल्या कचºयामुळेच पाण्याचा निचरा झाला नसल्याचे स्पष्ट झाले.मुंबई - अहमदाबाद मार्गावर रांगाकाजूपाडा रस्ता व वसई हद्दीतील महामार्ग पाण्याखाली आल्याने काशिमीरा भागातून जाणाºया मुंबई-अहमदाबाद मार्गावर वाहनांच्या रांगा लागून वाहतूकही ठप्प झाली. लक्ष्मीबाग, काशी, वरसावे आदी भागांतील महामार्गावरही पाणी साचले. मीरा रोडच्या हटकेश, कृष्णस्थळ, गौरव संकल्प फेज-२, अमीष पार्क, शांती पार्कचे हॅप्पी होम कॉम्प्लेक्स, मीनाक्षीनगर, आरएनए ब्रॉडवे एव्हेन्यू, जयविजयनगर, सिल्व्हर पार्क, शीतलनगर, रामदेव पार्क येथे पाणी साचले. अमीष पार्क व कृष्णस्थळ येथे तर कमरेएवढे पाणी भरले होते....आणि ते बोटीने गेले घरीमीरा रोडच्या सिल्व्हर सरिता भागात कमरेइतके पाणी साचले होते. घरे, दुकानांमध्ये पाणी शिरून लोकांचे नुकसान झाले. अनेकांच्या घरात जेवणही शिजलेनाही. रस्त्यांना तर नदीचे स्वरूप आले होते. त्यामुळे शाळकरी विद्यार्थी, महिला यांची नेआण करण्यासाठी पालिकेला बोटी तैनात कराव्या लागल्या.उल्हासनगरातही जोरदार पाऊस झाला. वालधुनी नदीने धोक्याची पातळी ओलांडली. नदीच्या पुराचे पाणी सम्राट अशोकनगर, रेणुका सोसायटी, हिराघाट, मातोश्री मीनाताई ठाकरे नगर, शांतीनगर येथे शिरले. वडोळगावातील शाळेसह अन्य ठिकाण्ी पाणी आल्याने शाळेला सुट्टी दिली.मीरा-भार्इंदर जलमयभार्इंदरच्या बेकरी गल्लीत मोठ्या प्रमाणात पाणी साचून लोकांच्या घरात शिरले. डॉ. आंबेडकर मार्गनाका, राई मुख्य रस्ता, बाळाराम पाटील मार्ग, काशीनगर, शिवशक्तीनगर, खारीगाव हा भागही पाण्याने भरला. अनेकांच्या घरांत आणि दुकानांत पाणी शिरल्याने नुकसान होऊन त्यांचे हाल झाले. वाहनांमध्ये पाणी शिरून वाहने बंद पडली. शहरातील बहुतांश शाळांना सुट्या देण्यात आल्या. पूरसदृश परिस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. शहरात पाणीउपसा करण्यासाठी पालिकेने लावलेले पंप फारसे उपयोगी ठरले नाहीत. मात्र, नंतर पावसाने विश्रांती घेतल्याने साचलेले पाणी ओसरू लागले.भिवंडी : तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने रविवार रात्रीपासून पुन्हा जोर धरल्याने सोमवार सकाळपर्यंत शहरातील सखल भागात पुन्हा पाणी साचले. वेळीच पाण्याचा निचरा न झाल्याने तीनबत्ती, शिवाजीनगर आणि ठाणगे आळीतील मच्छी आणि भाजी मार्केट पुन्हा पाण्याखाली गेले.या मार्गावर खाडीकडे जाणारा नाला आहे. खाडीत साचलेल्या घाणीमुळे पाण्याचा निचरा होण्यास वेळ लागत असल्याने हे पाणी दोन दिवसांपासून शहरातील मुख्य मार्केट भागात आणि तेथील दुकानात शिरत आहे. पाणी साचल्याने सोमवारीदेखील मार्केट बंद होते.दुपारनंतर पावसाचा जोर कमी झाल्याने पालिका आयुक्त मनोहर हिरे, उपायुक्त (आरोग्य) वंदना गुळवे, उपायुक्त दीपक कुरळेकर आणि इतर अधिकाºयांसमवेत नाल्याची व भाजी मार्केटच्या रस्त्याची पाहणी केली. शहरातील सखल भागातील साचलेले पाणी प्रवाहित झाल्याने शहरातील सर्व दुकाने दुपारनंतर पुन्हा सुरू झाली.दरम्यान, खाडीकिनारी असलेल्या म्हाडा कॉलनीतील कुटुंबांना तात्पुरते पालिका शाळेत हलवण्यात आले असून त्यांना पालिकेमार्फत खाण्याच्या वस्तू देण्यात येत आहेत. तसेच अजमेरनगर येथील डोंगराचा काही भाग रविवारी दुपारनंतर खचल्याने तेथील २६ कुटुंबांना जवळच पालिकेच्या शाळेत हलवले. 

टॅग्स :Rainपाऊसthaneठाणे