शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
2
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
3
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
4
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
5
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
6
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
7
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
8
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
9
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
10
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
11
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
12
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
13
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
14
Garud Puran: मृत्यूनंतर मोक्ष मिळेल का माहीत नाही, पण जिवंतपणी 'या' उपायांनी मिळू शकेल!
15
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
16
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
17
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
18
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
19
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
20
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...

धुवाधार पावसाने घोडबंदर-ठाणे बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2018 04:00 IST

सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे काजूपाडा येथे भरपूर पाणी साचून ठाणे-घोडबंदर मार्गावरील वाहतूक बंद पडली. काशिमीरा भागातील मुंबई- अहमदाबाद महामार्गावरही वाहनांच्या लांबचलांब रांगा लागून वाहतूक ठप्प झाली.

मीरा रोड : सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे काजूपाडा येथे भरपूर पाणी साचून ठाणे-घोडबंदर मार्गावरील वाहतूक बंद पडली. काशिमीरा भागातील मुंबई- अहमदाबाद महामार्गावरही वाहनांच्या लांबचलांब रांगा लागून वाहतूक ठप्प झाली. शिवाय, मीरा-भार्इंदर शहरांतदेखील जागोजागी पाणी साचले असून दुपारी पाणी ओसरल्यानंतर वाहतूक सुरू झाली.

ठाणे-घोडबंदर मार्गालगतचे बेकायदा मातीभराव, त्यातच रस्त्याच्या मध्येच बांधलेल्या दुभाजकांमुळे येथे मोठ्या प्रमाणात पाणी साचते. त्यामुळे ठाणे-घोडबंदर रस्ता बंद होऊन असंख्य वाहने अडकली. मात्र महापालिका, जिल्हा प्रशासन, रस्ता ठेकेदार वा आपत्कालीन पथकांपैकी कोणीच येथे न फिरकल्याने पोलिसांनीच जेसीबी मागवून दुभाजक तोडले आणि पाण्याचा मार्ग मोकळा केल्याचे उपस्थितांनी सांगितले. रस्ता बांधताना खालून पाण्याचा निचरा करण्यासाठी आवश्यक असे नालेच बनवले नसल्याचे आढळले. दुपारी १२ च्या सुमारास वाहतूक हळूहळू सुरू करण्यात आली. विशेष म्हणजे ठाण्याहून येणारे मीरा-भार्इंदर महापालिका आयुक्त, उपायुक्त आणि काही अधिकारीदेखील यावेळी अडकून पडले होते.काशिमीरा, मीरा रोडच्या बहुतांश भागाचे पाणी घोडबंदर येथील ज्या उघाडीतून वाहून जाते, त्याच्या दरवाजांमध्ये कचरा अडकल्याने पाण्याचा निचरा वेगाने होत नव्हता. स्थानिक रहिवासी उपमहापौर चंद्रकांत वैती यांच्या ही बाब निदर्शनास आल्यानंतर पालिका अधिकारी आणि स्थानिक तेथे पोहोचले. एका गावकºयास उघाडीत उतरवून दारे उघडल्यानंतर पाण्याचा निचरा वेगाने होऊ लागला. पाण्यातून आलेल्या कचºयामुळेच पाण्याचा निचरा झाला नसल्याचे स्पष्ट झाले.मुंबई - अहमदाबाद मार्गावर रांगाकाजूपाडा रस्ता व वसई हद्दीतील महामार्ग पाण्याखाली आल्याने काशिमीरा भागातून जाणाºया मुंबई-अहमदाबाद मार्गावर वाहनांच्या रांगा लागून वाहतूकही ठप्प झाली. लक्ष्मीबाग, काशी, वरसावे आदी भागांतील महामार्गावरही पाणी साचले. मीरा रोडच्या हटकेश, कृष्णस्थळ, गौरव संकल्प फेज-२, अमीष पार्क, शांती पार्कचे हॅप्पी होम कॉम्प्लेक्स, मीनाक्षीनगर, आरएनए ब्रॉडवे एव्हेन्यू, जयविजयनगर, सिल्व्हर पार्क, शीतलनगर, रामदेव पार्क येथे पाणी साचले. अमीष पार्क व कृष्णस्थळ येथे तर कमरेएवढे पाणी भरले होते....आणि ते बोटीने गेले घरीमीरा रोडच्या सिल्व्हर सरिता भागात कमरेइतके पाणी साचले होते. घरे, दुकानांमध्ये पाणी शिरून लोकांचे नुकसान झाले. अनेकांच्या घरात जेवणही शिजलेनाही. रस्त्यांना तर नदीचे स्वरूप आले होते. त्यामुळे शाळकरी विद्यार्थी, महिला यांची नेआण करण्यासाठी पालिकेला बोटी तैनात कराव्या लागल्या.उल्हासनगरातही जोरदार पाऊस झाला. वालधुनी नदीने धोक्याची पातळी ओलांडली. नदीच्या पुराचे पाणी सम्राट अशोकनगर, रेणुका सोसायटी, हिराघाट, मातोश्री मीनाताई ठाकरे नगर, शांतीनगर येथे शिरले. वडोळगावातील शाळेसह अन्य ठिकाण्ी पाणी आल्याने शाळेला सुट्टी दिली.मीरा-भार्इंदर जलमयभार्इंदरच्या बेकरी गल्लीत मोठ्या प्रमाणात पाणी साचून लोकांच्या घरात शिरले. डॉ. आंबेडकर मार्गनाका, राई मुख्य रस्ता, बाळाराम पाटील मार्ग, काशीनगर, शिवशक्तीनगर, खारीगाव हा भागही पाण्याने भरला. अनेकांच्या घरांत आणि दुकानांत पाणी शिरल्याने नुकसान होऊन त्यांचे हाल झाले. वाहनांमध्ये पाणी शिरून वाहने बंद पडली. शहरातील बहुतांश शाळांना सुट्या देण्यात आल्या. पूरसदृश परिस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. शहरात पाणीउपसा करण्यासाठी पालिकेने लावलेले पंप फारसे उपयोगी ठरले नाहीत. मात्र, नंतर पावसाने विश्रांती घेतल्याने साचलेले पाणी ओसरू लागले.भिवंडी : तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने रविवार रात्रीपासून पुन्हा जोर धरल्याने सोमवार सकाळपर्यंत शहरातील सखल भागात पुन्हा पाणी साचले. वेळीच पाण्याचा निचरा न झाल्याने तीनबत्ती, शिवाजीनगर आणि ठाणगे आळीतील मच्छी आणि भाजी मार्केट पुन्हा पाण्याखाली गेले.या मार्गावर खाडीकडे जाणारा नाला आहे. खाडीत साचलेल्या घाणीमुळे पाण्याचा निचरा होण्यास वेळ लागत असल्याने हे पाणी दोन दिवसांपासून शहरातील मुख्य मार्केट भागात आणि तेथील दुकानात शिरत आहे. पाणी साचल्याने सोमवारीदेखील मार्केट बंद होते.दुपारनंतर पावसाचा जोर कमी झाल्याने पालिका आयुक्त मनोहर हिरे, उपायुक्त (आरोग्य) वंदना गुळवे, उपायुक्त दीपक कुरळेकर आणि इतर अधिकाºयांसमवेत नाल्याची व भाजी मार्केटच्या रस्त्याची पाहणी केली. शहरातील सखल भागातील साचलेले पाणी प्रवाहित झाल्याने शहरातील सर्व दुकाने दुपारनंतर पुन्हा सुरू झाली.दरम्यान, खाडीकिनारी असलेल्या म्हाडा कॉलनीतील कुटुंबांना तात्पुरते पालिका शाळेत हलवण्यात आले असून त्यांना पालिकेमार्फत खाण्याच्या वस्तू देण्यात येत आहेत. तसेच अजमेरनगर येथील डोंगराचा काही भाग रविवारी दुपारनंतर खचल्याने तेथील २६ कुटुंबांना जवळच पालिकेच्या शाळेत हलवले. 

टॅग्स :Rainपाऊसthaneठाणे