शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

मुसळधार पाऊस कोसळत असला; तरी विसर्जन मात्र उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2017 01:04 IST

दीड, तीन दिवसांच्या गणेश विसर्जनानंतर मंगळवारी पाच दिवसांच्या बाप्पांना भक्तांनी भावपूर्ण वातावरणात निरोप दिला. शहरात मुसळधार पाऊस कोसळत असला; तरी विसर्जन मात्र उत्साहात पार पडले.

ठाणे : दीड, तीन दिवसांच्या गणेश विसर्जनानंतर मंगळवारी पाच दिवसांच्या बाप्पांना भक्तांनी भावपूर्ण वातावरणात निरोप दिला. शहरात मुसळधार पाऊस कोसळत असला; तरी विसर्जन मात्र उत्साहात पार पडले. ठाणे पोलीस आयुक्तालयांतर्गत २५ हजारांहून अधिक तर ग्रामीण भागांत सात हजारांहून अधिक बाप्पांचे विसर्जन झाले. पावसामुळे मात्र विसर्जनासाठी भाविक एरव्हीपेक्षा उशीरा निघाले होते. दरम्यान, जिल्ह्यात सर्वत्र गौरींचे उत्साहात आगमन झाले.शनिवारी दीड आणि रविवारी तीन दिवसाच्या बाप्पाला निरोप दिल्यानंतर मंगळवारी पाच दिवसांच्या बाप्पाचे विसर्जन झाले. तर दुसरीकडे गौराईचे आगमन झाले. ठाणे पोलीस आयुक्तलयांतर्गत आणि ग्रामीण भागात ३२ हजार ४०७ बाप्पाचे विसर्जन झाले. पावसामुळे भाविक लवकरात लवकर विसर्जन करण्याच्या धावपळीत होते. ठाणे पोलीस आयुक्तालयांतर्गत ६४ सार्वजनिक; तर खाजगी २५ हजार २१६ बाप्पांना निरोप दिला. यात परिमंडळ एकमध्ये सार्वजनिक ९ तर खाजगी ५८९५, परिमंडळ ३ मध्ये सार्वजनिक २४ तर खाजी ७३३५, परिमंडळ ४ मध्ये सार्वजनिक २२ तर खाजगी ६९४०, परिमंडळ ५ मध्ये सार्वजनिक ९ तर खाजगी ५०४६ तसेच, ग्रामीण भागांत सार्वजनिक २२७ तर खाजगी ६९०० बाप्पांचे विसर्जन झाले. वागळे इस्टेट परिसरातील रायलादेवी तलाव, उपवन तलाव, निळकंठ वुडस टिकुजीनी वाडी, बाळकुम रेवाळे व खारेगांव या ठिकाणी कृत्रिम तलावांत विसर्जन झाले. मडवी हाऊस, पोखरण रोड नं. २ येथे वसंतविहार संकुल प्रवेशद्वार, वागळे इस्टेट रोड नं.१६, मासुंदा तलाव, जेल तलाव परिसर, खिडकाळी, उपवन तलाव आदी ठिकाणी उभारलेल्या श्री गणेश मूर्ती स्वीकार केंद्रालादेखील भाविकांनी प्रतिसाद दिला.

टॅग्स :Ganeshotsavगणेशोत्सवPoliceपोलिस