शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
2
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
3
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
4
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
5
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
6
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
7
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
8
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
10
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
11
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
12
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
13
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
14
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
15
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
16
सुट्टीसाठी तळमळणाऱ्या मंत्र्यांना ‘डिसेंबर’ हुडहुडी!
17
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
18
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
19
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
20
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

२७ गावांच्या हरकतींवर सुनावणी; कोकण विभागीय आयुक्त कार्यालयात धडकणार ग्रामस्थ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2020 00:17 IST

सर्वपक्षीय संघर्ष समितीने २७ गावांची स्वतंत्र नगरपालिका करण्याची मागणी केली आहे. तिला भाजप आमदार रवींद्र चव्हाण, गणपत गायकवाड व मनसे आमदार राजू पाटील यांचे समर्थन आहे.

कल्याण : केडीएमसीतील २७ गावांची स्वतंत्र नगरपालिका करायची की महापालिकेतच ठेवायची, या संदर्भात सरकारने मागविलेल्या हरकती, सूचनांवर बुधवारी आणि गुरुवारी बेलापूर येथील कोकण विभागीय आयुक्तांकडे सुनावणी होणार आहे. या सुनावणीनंतर २७ गावांचा निर्णय सरकार घेऊ शकते, असे जाणकारांचे म्हणणे आहे.

सर्वपक्षीय संघर्ष समितीने २७ गावांची स्वतंत्र नगरपालिका करण्याची मागणी केली आहे. तिला भाजप आमदार रवींद्र चव्हाण, गणपत गायकवाड व मनसे आमदार राजू पाटील यांचे समर्थन आहे. नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्र्यासोबत या संदर्भात दोनदा मंत्रालयात बैठक घेतली. त्यावेळी सरकारकडून तातडीने निर्णय घेतला जाईल, असे वाटले होते. त्याऐवजी कोकण विभागीय आयुक्तांकडे हरकती, सूचनांवर सुनावणी घेण्यात येणार आहे.

२७ गावे १९८३ पासून महापालिकेत होती. आघाडी सरकारने ही गावे २००२ मध्ये वगळली. या गावांच्या विकासासाठी एमएमआरडीएने विकास आराखडा तयार करण्याची प्रक्रिया सुरू केली. हा आराखडा तयार झाल्यावर ३० डिसेंबर २०१४ ला तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजुरी दिली. तेथे कल्याण ग्रोथ सेंटर उभारण्याची घोषणा केली. एक हजार ८९ कोटी रुपये त्याकरिता मंजूर केले. मात्र, त्याची एकही वीट पाच वर्षांत रचली गेली नाही. ग्रोथ सेंटरमध्ये २७ गावांपैकी १० गावांचा समावेश होता. या गावांसाठी एमएमआरडीए नियोजन प्राधिकरण असेल. नियोजन प्राधिकरणाकडून बांधकाम परवानगी दिल्या गेल्या नाहीत. त्यामुळे २७ गावांत ७९ हजार बेकायदा इमारती उभ्या राहिल्या. स्वतंत्र नगरपालिका करायची असल्यास या बेकायदा बांधकामांना नियमित करण्याचा निर्णयही सरकारला घ्यावा लागेल. गावे समाविष्ट करण्यावर घाईने सरकारने हरकती, सूचना मागविल्या. त्यापैकी बहुतांश हरकती सूचना या गावे वगळण्याच्या आहेत. मात्र गावे महापालिकेत सामाविष्ट करणे योग्य होईल, असा अभिप्राय तत्कालीन कोकण विभागीय आयुक्तांनी दिला. हा अभिप्राय सरकारधार्जीणा असल्याने गावे महापालिकेत सामाविष्ट केली गेली. पुन्हा गावे वगळण्यासाठी ७ सप्टेंबर २०१५ रोजी अधिसूचना काढली. मात्र, ती वगळली गेलेली नाहीत.सुनावणी केवळ फार्स तर नाही ना?२७ गावे वगळण्याबाबत हजारोंच्या संख्येत हरकती, सूचना नोंदवण्यात आल्या आहेत. त्यामुळे अवघ्या दोन दिवसांत त्यांची सुनावणी कशी पार पडेल, असा प्रश्न आहे. त्यामुळे सुनावणीचा केवळ फार्स नाही ना, अशी शंका पुन्हा उपस्थित केली जात आहे.स्वतंत्र नगरपालिकेची मागणी करणाऱ्यांची संख्या जास्त असली तरी स्वतंत्र नगरपालिकेस विरोध करणारे काही नगरसेवक आहेत. सुनावणी दरम्यान त्यांचा विरोध नोंदविला जाऊ शकतो. सुनावणीसाठी नागरिकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहता यावे, यासाठी आमदार पाटील यांनी बसची व्यवस्था केली आहे.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिकाMNSमनसे