शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
2
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली
3
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
4
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
5
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
6
Air India Plane Crash: एअर होस्टेस रोशनीच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार!
7
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
8
आमिर खानसोबत फोटोसाठी पोझ देत होती जिनिलीया, बाजूला उभा राहून बघत होता रितेश, अन् मग...
9
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
10
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
11
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
12
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
13
रॅपिडो, उबर बाइक टॅक्सीविरुद्ध गुन्हा, नेमकं प्रकरण काय?
14
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
15
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
16
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
17
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!
18
ऐरोली, घणसोलीत होणार खारफुटी उद्याने; वनविभागाकडून वास्तुविशारदांची नियुक्ती
19
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
20
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे

अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या लसीकरणात डॉक्टरांसह आरोग्य कर्मचारी पिछाडीवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2021 00:51 IST

सर्वाधिक महानगरपालिकांचे शहर म्हणून ठाणे जिल्ह्याची देशपातळीवर ओळख आहे. या जिल्ह्यातील सहा महापालिका, दोन नगर परिषदा आणि या शहरांना लागून असलेल्या ग्रामपंचायतींचे कार्यक्षेत्र बृहन्मुंबईत कार्यरत असलेल्यांच्या निवासस्थानांचा भार सांभाळत आहे.

सुरेश लोखंडे

ठाणे : जिल्ह्यातील पोलीस अधिकारी, कर्मचारी या पहिल्या फळीतील म्हणजे फ्रंटलाइन वर्कर्सच्या तुलनेत हेल्थ वर्कर्स म्हणजे आरोग्य यंत्रणेचे स्वतः डॉक्टर, परिचारिका कोरोना लसीकरणात मागे पडल्याचे वास्तव जिल्ह्यात आहे. आतापर्यंत त्यांचे पहिल्या डोसचे ९० टक्के व दुसऱ्या डोसचे फक्त ५८ टक्के लसीकरण झाले आहे. त्यामुळे यादरम्यान काही डॉक्टरांसह  कर्मचारी कोरोनाच्या या चक्रव्यूहात  अडकले.

सर्वाधिक महानगरपालिकांचे शहर म्हणून ठाणे जिल्ह्याची देशपातळीवर ओळख आहे. या जिल्ह्यातील सहा महापालिका, दोन नगर परिषदा आणि या शहरांना लागून असलेल्या ग्रामपंचायतींचे कार्यक्षेत्र बृहन्मुंबईत कार्यरत असलेल्यांच्या निवासस्थानांचा भार सांभाळत आहे. दाटीवाटीने राहत असलेल्या रहिवाशांच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या डॉक्टर्स, परिचारिकांचे लसीकरण पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, जिल्ह्यातील एक लाख दोन हजार ३३७ फ्रंटलाइन वर्कर्स, डॉक्टरांपैकी आतापर्यंत फक्त ९१ हजार ९८९ (९० टक्के) जणांनी पहिला डोस घेतला आहे. लसीकरण झालेल्यांपैकी ५८ टक्के म्हणजे ५३ हजार ५० डॉक्टरांसह परिचारिका, वाॅर्डबॉय आदींनी लसीकरणाचा दुसरा डोस घेतला आहे. या महामारीत डॉक्टरांसह परिचारिका, आरोग्य सेवकांना कोरोना प्रतिबंधात्मक लस प्रारंभापासून देण्यास सुरुवात केली आहे. मात्र, जिल्ह्याच्या आरोग्याची काळजी घेणारे डॉक्टर्स, परिचारिका आदींनी लसीकरण करून घेण्याचे गांभीर्याने घेतलेले दिसून येत नाही.

लसीकरण करणे गरजेचे जिल्ह्यातील पहिल्या फळीतील  ८९ हजार ९२० या पोलीस यंत्रणेचा लसीकरणाचा पहिला डोस १०० टक्के पूर्ण झाला आहे, तर दुसरा डोस ३९ हजार ८४ जणांनी (४७ टक्के) पूर्ण केला आहे. यावरून लसीकरणाचे महत्त्व पटवून देणाऱ्या प्रशासकीय अधिकारी,‌ कर्मचाऱ्यांचे लसीकरण आतापर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. प्रशासनाने यासाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांवर खासगी व्यवस्थापनाप्रमाणे सक्ती न‌ केल्यामुळे आरोग्य व पोलीस यंत्रणेचे आतापर्यंत १०० टक्के लसीकरण झाले नसल्याचे दिसून येत आहे.

मुरबाडकरांच्या कोरोना लसीवर ठाणे, मुंबईकरांनी मारला डल्ला

मुरबाड : मागील कित्येक दिवस तालुक्यातील लसींवर शेजारच्या तालुक्यांबरोबर ठाणे, मुंबईकरांनीही डल्ला मारल्याने मुरबाडकरांना लस कमी पडली आहे. आता १८ वर्षांपासून सर्वांना लस दिली जाणार असल्याने लसीकरण केंद्रांवर गर्दी होत असल्याने सामाजिक अंतराचा फज्जा उडत आहे. त्यामुळे स्थानिक नागरिक हे वंचित राहत असल्याने काँग्रेसचे चेतनसिंह पवार, शिवसेनेचे राम दुधाळे व मनसेचे नरेश देसले हे आक्रमक झाले असून त्यांनी तहसीलदार व पोलिसांना शिवनेरी विश्रामगृहावर धारेवर धरत संताप व्यक्त केला.

टोकावडे परिसरातील आदिवासी वाड्यावस्त्यांमधील नागरिकांमध्ये लस घेण्याविषयी संभ्रम व निरुत्साह असल्याने लसीकरणाची टक्केवारी कमी आहे. त्याचबरोबर मुरबाड तालुक्यातील ४५ वर्षांपुढील नागरिकांमधील मोबाइल निरक्षरता, वीज व इंटरनेटच्या लपंडावामुळे कित्येकांना लस घेण्यापासून वंचित राहावे लागले आहे. ऑनलाइन नोंदणी केल्यानंतर कुठेही लस मिळत असल्याने मुंबईकरांनी व शेजारच्या तालुक्यांतील नागरिकांनी मुरबाडमध्ये लस घेतली आहे. त्यामुळे प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत असलेल्या गावांतील ४५ वर्षांच्या पुढील नागरिकांची संख्या आशा कार्यकर्त्यांच्या सर्व्हेनुसार निश्चित असतानाही लसीचा तुटवडा आहे.

प्राथमिक आरोग्य केंद्राचे लाभार्थी व लक्षांश याबाबत योग्य नियोजन नसल्याने तालुक्यातील नागरिकांना लस कमी पडत आहे. वाढत्या कोरोनाकाळातही नागरिकांना लसीकरणासाठी ताटकळत बसावे लागत आहे. प्रत्येक केंद्रांवर सामाजिक अंतराचा फज्जा तर उडत आहेच, शिवाय कोरोनाची लागण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सध्या ऑनलाइन नोंदणी झाल्याशिवाय लस मिळणार नाही, असे आरोग्य अधिकारी सांगत असले, तरी कोणत्या संकेतस्थळावर, ॲपवरून नोंदणी करायची आहे, याचे मार्गदर्शन नसल्याने मुरबाडकर लसीपासून वंचित आहेत.तालुक्यातील कोणत्याच केंद्रावर लस उपलब्ध नसल्याने केंद्र बंद होते. लस उपलब्ध झाल्यानंतर सर्वप्रथम तालुकाबाह्य व प्राथमिक आरोग्य केंद्रांव्यतिरिक्त नागरिकांना लस देण्यास प्रतिबंध करावा, अशी मागणी मुरबाडकर करीत आहेत. 

टॅग्स :thaneठाणेCorona vaccineकोरोनाची लस