शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

हायकोर्टाच्या आदेशामुळे फेरीवाल्यांचे जेलभरो आंदोलन तूर्तास मागे?, डोंबिवलीत फेरीवाले मोर्चा काढण्यावर ठाम 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2017 11:48 IST

केडीएमसी प्रशासनाच्या फेरीवाला कारवाईविरोधात शहरातील फेरीवाला संघटनांनी 3 नोव्हेंबरला पुकारलेल्या जेलभरो आंदोलनाच्या निर्णयाचा फेरविचार करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.

डोंबिवली - केडीएमसी प्रशासनाच्या फेरीवाला कारवाईविरोधात शहरातील फेरीवाला संघटनांनी 3 नोव्हेंबरला पुकारलेल्या जेलभरो आंदोलनाच्या निर्णयाचा फेरविचार करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. हायकोर्टाच्या आदेशामुळे जेलभरोची भूमिका न घेता केवळ मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्याचा फेरीवाला युनियन विचाराधीन आहे, अशी माहिती फेरीवाला संघटनेचे सल्लागार प्रशांत सरखोत यांनी 'लोकमत'ला दिली.

मोर्चा काढण्यासाठी पोलिसांनी परवानगी दिली आहे, त्यामुळे ठरल्याप्रमाणे शुक्रवारी ( 3 नोव्हेंबर ) मोर्चा निघणार असून शहराच्या पश्चिमेकडील रेती भवन या इमारतीपासून मोर्चाची सुरुवात होणार आहे. दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास मोर्चा निघणार असून पूर्वेला महापालकेच्या ग व फ या प्रभाग कार्यालयाच्या इमारतीपर्यंत मोर्चा असेल असेही स्पष्ट करण्यात आले.  सूत्रांच्या माहितीनुसार,  3 हजार फेरीवाले यावेळी सहभागी होणार आहेत. महापालिका आयुक्त पी.वेलरसु यांनी चर्चा करावी, फेरीवाला धोरणाबाबत तोडगा काढावा, तसेच जोपर्यंत त्याची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत सध्या फेरीवाले जिथे बसत आहेत तिथं त्यांना बसू द्यावे, या प्रमुख मागण्या असल्याचेही सांगण्यात आले. 

पण हायकोर्टाच्या आदेशामुळे जेलभरो करायचे की नाही?, यासंदर्भात पुनर्विचार करण्यात येणार असून त्यासंदर्भात गुरुवारी संध्याकाळी प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात येणार आहे.  सरखोत यांच्या संघटनेच्या कार्यालयात ही बैठक होणार आहे.

रेल्वे स्थानक-पुलालगत फेरीवाल्यांना ‘नो एंट्री’, फेरीवाला क्षेत्रातच व्यवसाय करावा - हायकोर्ट

रेल्वे स्थानक, पादचारी पूल, पदपथ व अन्य सार्वजनिक जागांवर बेकायदा व्यवसाय करणा-या फेरीवाल्यांच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरलेल्या संघटना, कार्यकर्ते व नेत्यांना बुधवारी उच्च न्यायालयाने चांगलाच दणका दिला. महापालिकांनी ठरवलेल्या ‘फेरीवाले क्षेत्रा’शिवाय अन्य कोणत्याही ठिकाणी फेरीवाले व्यवसाय करू शकत नाहीत, असे पुन्हा एकदा उच्च न्यायालयाने स्पष्ट केले. शैक्षणिक संस्था, रुग्णालये व धार्मिक स्थळांपासून १०० मीटरपर्यंत तर रेल्वे स्थानक, पादचारी पूल, उड्डाण पूल व महापालिका बाजाराच्या १५० मीटर परिसरापर्यंत फेरीवाले व्यवसाय करू शकत नाहीत, असेही न्यायालयाने स्पष्ट केले. मात्र मंदिरे व अन्य प्रार्थना स्थळाबाहेर पूजेचे साहित्य विकण्यास न्यायालयाने मुभा दिली आहे. न्यायालयाच्या या आदेशामुळे फेरीवाल्यांसाठी याचिका करणा-या मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांना चांगलाच झटका बसला आहे.

टॅग्स :Mumbai High Courtमुंबई हायकोर्टMNSमनसेkalyanकल्याणdombivaliडोंबिवली