शहरं
Join us  
Trending Stories
1
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
2
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
3
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
4
सेकंड हँड कारच्या किंमती धडाधड घसरल्या...; स्पिनी, कार्स २४ सारखे २ लाखांपर्यंत डिस्काऊंट देऊ लागले...
5
वादग्रस्त विधानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाराज; आ. गोपीचंद पडळकरांना केला फोन, म्हणाले...
6
सर्वच नावं परप्रांतीय कशे? राजुऱ्यातील ६,८५३ मतदारांच्या वोट चोरीच्या आरोपांवर आयोगाकडून थंड प्रतिसाद
7
"पाकिस्तान, बांगलादेशमध्ये घरात असल्यासारखं वाटतं’’, काँग्रेसच्या सॅम पित्रोदा यांचं विधान, Gen-Z ला केलं असं आवाहन    
8
IPO असावा तर असा! ७४% प्रीमिअमवर बंपर लिस्टिंग; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल
9
सर्वपित्री अमावास्या २०२५: सर्वपित्री अमावस्येला सूर्यग्रहण; त्यादिवशी श्राद्धविधी करावे की नाही?
10
E 20 पेट्रोलमुळे करोडोंची फेरारी खराब झाली; युजरने विचारले, गडकरी घेणार का जबाबदारी?  
11
Video:"...तर मंत्रिपदाची खुर्ची सोडावी लागेल"; DCM अजित पवारांनी पक्षातील नेत्यांचे कान टोचले
12
आयफोन १६ खरेदी करण्याची योग्य वेळ; २७ हजारांहून अधिक रुपये वाचतील, कुठे सुरू आहे ऑफर?
13
अतिशय गुप्तपणे अमेरिकेचे सैन्य बांगलादेशात पोहचलं; १२० जवान दाखल, काही तरी मोठं घडतंय?
14
‘मला एकटे पाडण्यासाठी मोठा राजकीय डाव शिजतोय’; मनोज जरांगे यांचा खळबळजनक दावा
15
कमाल झाली राव! वजन कमी होईल अन् चेहऱ्यावर ग्लो येईल; रोज 'हे' फळ खाल्ल्याचे 'जादुई' फायदे
16
India vs Oman सामन्याआधीच्या सराव सत्रात ६ खेळाडू गैरहजर? टीम इंडियात नेमकं काय घडतंय...
17
आर्यनची केस लढण्यास मुकुल रोहतगींनी दिलेला नकार, शाहरुख खान थेट त्यांच्या पत्नीशीच बोलला
18
राज ठाकरे यांनी अंबरनाथमध्ये कार्यकर्त्यांना दिला असा कानमंत्र, पितृपक्षाबाबत म्हणाले... 
19
एका क्लिकमध्ये मिळणार PF ची पूर्ण हिस्ट्री; EPFO नं बदलली पासबुक पाहण्याची सुविधा
20
Tanya Mittal : "नवऱ्याला राजासारखं ठेवेन", बेरोजगाराशी लग्न करण्यास तयार आहे तान्या मित्तल, म्हणाली...

मराठा आरक्षणाचा जटील प्रश्न सोडविण्यासाठी ओबीसी आरक्षणाचे उप वर्गीकरण करणे आवश्यक

By अजित मांडके | Updated: January 2, 2024 12:53 IST

माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी दिला मराठा आरक्षणाचा नवा फॉर्मुला

अजित मांडके, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : ओबीसी आणि मराठा  यांच्यात निर्माण करण्यात आलेला राजकीय वाद संपवण्यासाठी  ओबीसी आरक्षणाची  फेरवाटणी करून ३८% आरक्षणामध्ये सोबत सुचविल्याप्रमाणे आरक्षणाचे उपवर्गीकरण (वाटप) करावे, जेणेकरून मराठा आरक्षणाचा जटिल प्रश्न कायमचा सुटेल, त्याचप्रमाणे बारा बलुत्तेदार आणि अलुतेदार यांनाही सामाजिक न्याय देता येईल, सर्वोच्च न्यायालयाच्या इंद्रा सहानी विरुद्ध भारत सरकार या न्याय निवाड्यामध्ये ९ न्यायाधीशांच्या खंडपिठाने अधोरिखित केले आहे कि, ९२/अ प्रमाणे एखादया राज्य सरकारने ओबीसी आरक्षणाचे Sub Categorisation उप वर्गीकरण (विभाजन) करून ३८% आरक्षणाचे फेर वाटप केल्यास ते वैद्य राहील, न्यायोचीत राहील, २०१७ मध्ये केंद्र सरकारने या बाबतीत जस्टीस रोहिणी आयोग नेमले होते, या आयोगाचा उद्देश सुद्धा ओबीसींचे विभाजन करण्याचाच होता, असा नवा फॉर्मुला ओबीसी नेते माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी मांडला आहे. 

मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून राज्यात सध्या रणकंदन माजले आहे. त्या पार्शवभूमीवर हरिभाऊ राठोड यांनी आज ठाण्यात पत्रकार परिषद घेऊन आपला फॉर्मुला मांडला. राठोड म्हणाले कि, राज्यामध्ये मराठा आरक्षणाची मागणी तीव्रतेने होत आहे. गेले दशकभर लाखांचे मोर्चे अनेक आंदोलने, उपोषण, निदर्शने होत असताना जरांगे पाटील यांच्या उपोषण नंतर मराठा समाजातील आरक्षणाची मागणी अधिकच तीव्रतेने जाणवत आहे. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. सन २०१६ व २०१८ मध्ये दोनदा राज्यात कायदा करून मराठा समाजाला आरक्षण देण्याचा प्रयत्न झाला, परंतु सर्वोच्य न्यायालयात या आरक्षणाला मान्यता मिळालेली नाही, आणि दोन्ही वेळेस दोन्ही कायदे अवैद्य ठरवण्यात आले. ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता संविधानिकरित्या आणि टिकाऊ आरक्षण देण्यात यावे. दरम्यानच्या काळात बारा बलुत्तेदार समाजाने सुद्धा ओबीसी आरक्षणातून स्वतंत्र आरक्षण द्यावे, अशी मागणी सुरु केली आहे. अलीकडे केंद्र सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बारा-बलूत्तेदार समाजाला 'विश्वकर्मा' असे नाव दिले आहे. या मध्ये १३ जातींचा समावेश होतो. हा समाज परंपरागत व्यवसाय करणारा समाज म्हणून ओळखला जातो, राज्यातील अलुतेदार समाजापैकी तेली, माळी, भंडारी, आणि आगरी या समाजाची सुद्धा मागणी पुढे आली, असून मराठा समाजाला जर वेगळे आरक्षण सरकार देणार असेल, तर त्यांचाही या प्रवर्गाला वेगळे आरक्षणाची मागणी पुढे येत आहे. राज्यातील एसबीसी (SBC) या प्रवर्गाला २% आरक्षण राज्य सरकारने दिले आहे, परंतु हे देत असताना ५०% च्या वर आरक्षण त्यांना दिले असल्यामुळे त्यांची सुद्धा मागणी ५०% च्या आतील संविधानिक आरक्षण देण्याबाबतची आहे, त्याच प्रमाणे त्यांचे २% आरक्षणाला एका व्यक्तीने आव्हान दिले असून मुंबई उच्च न्यायालयात ते प्रकरण विचाराधीन आहे, ते कुठल्याही क्षणी हे आरक्षण असंविधानिक ठरून अवैध घोषित करण्याची शक्यता आहे. हरिभाऊ राठोड यांनी दिलेला फार्म्युला

विमुक्त जाती (DT) यांना ४%; भटक्या जाती (NT) ३%; धनगर ४%; वंजारी 3% ;  एस बी सी २%; बारा बलुत्तेदार ३%तेली, माळी, आगरी, भंडारी काछी, कुशवाह, शाक्य, मोर्य, मुराई आणि सैनी या जातींना  ४% ; इतर मागासवर्गीय ५%; कुणबी, कुणबी मराठा, मराठा कुणबी, मराठा, लेवा पाटीदार आणि राजपूत १०%; अनुसूचित जाती (SC) १३% ; अनुसूचित जमाती (ST) ७% अशा पद्धतीने सुमारे 58% मध्ये आरक्षणाचे विभाजन करून तेढ संपवता येईल, असे राठोड यांनी सांगितले.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षण