शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
3
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
4
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
5
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
6
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
7
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
8
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
9
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
10
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
11
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
12
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
13
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
14
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
15
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
16
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
17
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
18
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
19
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
20
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!

मराठा आरक्षणाचा जटील प्रश्न सोडविण्यासाठी ओबीसी आरक्षणाचे उप वर्गीकरण करणे आवश्यक

By अजित मांडके | Updated: January 2, 2024 12:53 IST

माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी दिला मराठा आरक्षणाचा नवा फॉर्मुला

अजित मांडके, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : ओबीसी आणि मराठा  यांच्यात निर्माण करण्यात आलेला राजकीय वाद संपवण्यासाठी  ओबीसी आरक्षणाची  फेरवाटणी करून ३८% आरक्षणामध्ये सोबत सुचविल्याप्रमाणे आरक्षणाचे उपवर्गीकरण (वाटप) करावे, जेणेकरून मराठा आरक्षणाचा जटिल प्रश्न कायमचा सुटेल, त्याचप्रमाणे बारा बलुत्तेदार आणि अलुतेदार यांनाही सामाजिक न्याय देता येईल, सर्वोच्च न्यायालयाच्या इंद्रा सहानी विरुद्ध भारत सरकार या न्याय निवाड्यामध्ये ९ न्यायाधीशांच्या खंडपिठाने अधोरिखित केले आहे कि, ९२/अ प्रमाणे एखादया राज्य सरकारने ओबीसी आरक्षणाचे Sub Categorisation उप वर्गीकरण (विभाजन) करून ३८% आरक्षणाचे फेर वाटप केल्यास ते वैद्य राहील, न्यायोचीत राहील, २०१७ मध्ये केंद्र सरकारने या बाबतीत जस्टीस रोहिणी आयोग नेमले होते, या आयोगाचा उद्देश सुद्धा ओबीसींचे विभाजन करण्याचाच होता, असा नवा फॉर्मुला ओबीसी नेते माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी मांडला आहे. 

मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून राज्यात सध्या रणकंदन माजले आहे. त्या पार्शवभूमीवर हरिभाऊ राठोड यांनी आज ठाण्यात पत्रकार परिषद घेऊन आपला फॉर्मुला मांडला. राठोड म्हणाले कि, राज्यामध्ये मराठा आरक्षणाची मागणी तीव्रतेने होत आहे. गेले दशकभर लाखांचे मोर्चे अनेक आंदोलने, उपोषण, निदर्शने होत असताना जरांगे पाटील यांच्या उपोषण नंतर मराठा समाजातील आरक्षणाची मागणी अधिकच तीव्रतेने जाणवत आहे. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. सन २०१६ व २०१८ मध्ये दोनदा राज्यात कायदा करून मराठा समाजाला आरक्षण देण्याचा प्रयत्न झाला, परंतु सर्वोच्य न्यायालयात या आरक्षणाला मान्यता मिळालेली नाही, आणि दोन्ही वेळेस दोन्ही कायदे अवैद्य ठरवण्यात आले. ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता संविधानिकरित्या आणि टिकाऊ आरक्षण देण्यात यावे. दरम्यानच्या काळात बारा बलुत्तेदार समाजाने सुद्धा ओबीसी आरक्षणातून स्वतंत्र आरक्षण द्यावे, अशी मागणी सुरु केली आहे. अलीकडे केंद्र सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बारा-बलूत्तेदार समाजाला 'विश्वकर्मा' असे नाव दिले आहे. या मध्ये १३ जातींचा समावेश होतो. हा समाज परंपरागत व्यवसाय करणारा समाज म्हणून ओळखला जातो, राज्यातील अलुतेदार समाजापैकी तेली, माळी, भंडारी, आणि आगरी या समाजाची सुद्धा मागणी पुढे आली, असून मराठा समाजाला जर वेगळे आरक्षण सरकार देणार असेल, तर त्यांचाही या प्रवर्गाला वेगळे आरक्षणाची मागणी पुढे येत आहे. राज्यातील एसबीसी (SBC) या प्रवर्गाला २% आरक्षण राज्य सरकारने दिले आहे, परंतु हे देत असताना ५०% च्या वर आरक्षण त्यांना दिले असल्यामुळे त्यांची सुद्धा मागणी ५०% च्या आतील संविधानिक आरक्षण देण्याबाबतची आहे, त्याच प्रमाणे त्यांचे २% आरक्षणाला एका व्यक्तीने आव्हान दिले असून मुंबई उच्च न्यायालयात ते प्रकरण विचाराधीन आहे, ते कुठल्याही क्षणी हे आरक्षण असंविधानिक ठरून अवैध घोषित करण्याची शक्यता आहे. हरिभाऊ राठोड यांनी दिलेला फार्म्युला

विमुक्त जाती (DT) यांना ४%; भटक्या जाती (NT) ३%; धनगर ४%; वंजारी 3% ;  एस बी सी २%; बारा बलुत्तेदार ३%तेली, माळी, आगरी, भंडारी काछी, कुशवाह, शाक्य, मोर्य, मुराई आणि सैनी या जातींना  ४% ; इतर मागासवर्गीय ५%; कुणबी, कुणबी मराठा, मराठा कुणबी, मराठा, लेवा पाटीदार आणि राजपूत १०%; अनुसूचित जाती (SC) १३% ; अनुसूचित जमाती (ST) ७% अशा पद्धतीने सुमारे 58% मध्ये आरक्षणाचे विभाजन करून तेढ संपवता येईल, असे राठोड यांनी सांगितले.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षण