शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

'हरघर जल, हरघर नळ' योजनेतून महिलांची पाण्यासाठीची वणवण संपणार!

By नितीन पंडित | Updated: February 25, 2023 16:40 IST

केंद्रीय पंचायतीराज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी व्यक्त केला विश्वास

नितीन पंडित, लोकमत न्यूज नेटवर्क, भिवंडी: देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून हरघर जल,हरघर नळ योजनेमधून जलजीवन मिशन अंतर्गत भिवंडी तालुक्याच्या ग्रामीण भागातील महिलांची पाण्यासाठी होणारी वणवण थांबणार असून, या माध्यमातून महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरविण्याचे मोठे कार्य होणार आहे अशी प्रतिक्रिया केंद्रीय पंचायतीराज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी शनिवारी केले आहे.पाटील अंबाडी येथे अंबाडी व परिसरातील एकूण ४८ गावांमधील पाणीपुरवठा योजनेच्या भूमिपूजन प्रसंगी बोलत होते. या कार्यक्रमाप्रसंगी आमदार शांताराम मोरे, जिल्हा परिषद माजी सदस्य देवेश पाटील,कैलास जाधव,किशोर जाधव,पंचायत समिती माजी सभापती रविना रवींद्र जाधव, जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अर्जुन गोळे,यांसह अनेक मान्यवर ग्रामस्थ नागरीक उपस्थित होते.

जलजीवन मिशन अंतर्गत राज्य व केंद्र सरकारच्या सहभागातून या योजना होत असून तालुक्यातील १९६ गावांच्या पाणीपुरवठा योजनेसाठी २२० कोटी रुपये मंजूर झाले आहेत.त्याचा फायदा संपूर्ण ग्रामीण भागाला होणार आहे.अंबाडी परिसरातील ४८ गावांच्या योजनांसाठी १४३ कोटी खर्च केले जात आहेत त्यांचा भूमिपूजन एकाच दिवशी करण्याचे भाग्य आम्हाला लाभले असे शेवटी कपिल पाटील यांनी स्पष्ट केले.

जलजीवन मिशन अंतर्गत भिवंडी तालुक्यातील १२ ग्रामपंचायतींच्या नळ पाणीपूरवठा योजनेचा भूमिपूजन सोहळा केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या शुभहस्ते केवणी दिवे, कोपर, वडूनवघर, टेंभिवली, जूनांदुर्खी, कांबे, खोणी, कवाड, अनगाव, आवळे, अंबाडी, झिडके गावातील योजनांचा भूमिपूजन केवणी येथून सुरू झाला तो सायंकाळपर्यंत सुरू होता. केवणी येथील शुभारंभ कार्यक्रमास जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक मनुज जिंदाल,जिल्हा परिषद सदस्या सपना भोईर यांसह मान्यवर उपस्थित होते.

टॅग्स :Kapil Patilकपिल मोरेश्वर पाटीलbhiwandiभिवंडी