शहरं
Join us  
Trending Stories
1
'तेव्हा पाकिस्तानशी मैत्री नव्हती, मग सिंधू पाणी करार का केला?', जयशंकर यांनी विरोधकांना घेरले
2
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
3
इन्स्टावर तरुणांना मेसेज पाठवायची, आणखी एका महिलेचे पाकिस्तान कनेक्शन उघड, शमा प्रवीण एटीएसच्या ताब्यात
4
भारताच्या 'या' राज्यात तब्बल २७७९ पुरुषांनी केलेत दोनपेक्षा अधिक विवाह! सरकारी योजनेतून झाला मोठा खुलासा
5
रशियात भीषण भूकंपानंतर महाप्रलय; त्सुनामीमुळे प्रशांत महासागर खवळला, भारताला बसू शकतो फटका?
6
Video: मोठी दुर्घटना टळली! इंडो तिबेटियन पोलीस दलाची बस नदीत कोसळली, शस्त्रे गेली वाहून
7
पत्नी, सासूला संपवण्याचा कट रचला; दगडाने ठेचून हत्या केली अन् मृतदेह बागेत पुरला, मग...
8
IND vs ENG : 'वसाहतवाद' युगात आहात का? इरफान पठाणनं 'इंग्रज' पिच क्युरेटरवर असा काढला राग
9
"लष्कराच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नाही..."; UNSC रिपोर्टनं पाकिस्तानचा बुरखा फाडला 
10
शांत सुरक्षित निवृत्तीची तयारी, लगेचच सुरुवात केलेली बरी...
11
शेतात बसला होता, मोबाईलवर काहीतरी पाहत होता; तितक्यात वीज पडली, स्फोट झाला, अन्... 
12
गृहकर्जासाठी पगार किती हवा? १० लाखांपासून ते १ कोटी रुपयांपर्यंतचं गणित, किती येईल EMI
13
Shravan Recipe: कांदा-लसूण न वापरता करा मसाला स्टफिंग दोडकी; झटपट होते, चटपटीत लागते 
14
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
15
पृथ्वीतलावरचा अस्सल खजिना! अशा ५ अद्भुत गोष्टी ज्या केवळ कंबोडिया देशामध्येच आहेत
16
सर्वात मोठी डील करण्याच्या तयारीत TATA Motors, इटलीची आहे कंपनी; चीननंही यापूर्वी केलेले प्रयत्न
17
प्रेम वाटलं जातं, मग विमा का नाही? एकाच पॉलिसीत पती-पत्नीला ५० लाखांपर्यंत विमा; कमी प्रीमियममध्ये बंपर परतावा!
18
महागड्या गाड्याही पडतील फिक्या! अ‍ॅडवॉन्स फिचर्ससह बाजारात येतोय महिंद्राचा पिकअप ट्रक, पाहा टीझर
19
Surya Grahan: १०० वर्षातले सर्वात मोठे सूर्यग्रहण २ ऑगस्टला; ६ मिनिटांसाठी पसरणार जगभरात काळोख!

'हरघर जल, हरघर नळ' योजनेतून महिलांची पाण्यासाठीची वणवण संपणार!

By नितीन पंडित | Updated: February 25, 2023 16:40 IST

केंद्रीय पंचायतीराज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी व्यक्त केला विश्वास

नितीन पंडित, लोकमत न्यूज नेटवर्क, भिवंडी: देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून हरघर जल,हरघर नळ योजनेमधून जलजीवन मिशन अंतर्गत भिवंडी तालुक्याच्या ग्रामीण भागातील महिलांची पाण्यासाठी होणारी वणवण थांबणार असून, या माध्यमातून महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरविण्याचे मोठे कार्य होणार आहे अशी प्रतिक्रिया केंद्रीय पंचायतीराज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी शनिवारी केले आहे.पाटील अंबाडी येथे अंबाडी व परिसरातील एकूण ४८ गावांमधील पाणीपुरवठा योजनेच्या भूमिपूजन प्रसंगी बोलत होते. या कार्यक्रमाप्रसंगी आमदार शांताराम मोरे, जिल्हा परिषद माजी सदस्य देवेश पाटील,कैलास जाधव,किशोर जाधव,पंचायत समिती माजी सभापती रविना रवींद्र जाधव, जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अर्जुन गोळे,यांसह अनेक मान्यवर ग्रामस्थ नागरीक उपस्थित होते.

जलजीवन मिशन अंतर्गत राज्य व केंद्र सरकारच्या सहभागातून या योजना होत असून तालुक्यातील १९६ गावांच्या पाणीपुरवठा योजनेसाठी २२० कोटी रुपये मंजूर झाले आहेत.त्याचा फायदा संपूर्ण ग्रामीण भागाला होणार आहे.अंबाडी परिसरातील ४८ गावांच्या योजनांसाठी १४३ कोटी खर्च केले जात आहेत त्यांचा भूमिपूजन एकाच दिवशी करण्याचे भाग्य आम्हाला लाभले असे शेवटी कपिल पाटील यांनी स्पष्ट केले.

जलजीवन मिशन अंतर्गत भिवंडी तालुक्यातील १२ ग्रामपंचायतींच्या नळ पाणीपूरवठा योजनेचा भूमिपूजन सोहळा केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या शुभहस्ते केवणी दिवे, कोपर, वडूनवघर, टेंभिवली, जूनांदुर्खी, कांबे, खोणी, कवाड, अनगाव, आवळे, अंबाडी, झिडके गावातील योजनांचा भूमिपूजन केवणी येथून सुरू झाला तो सायंकाळपर्यंत सुरू होता. केवणी येथील शुभारंभ कार्यक्रमास जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक मनुज जिंदाल,जिल्हा परिषद सदस्या सपना भोईर यांसह मान्यवर उपस्थित होते.

टॅग्स :Kapil Patilकपिल मोरेश्वर पाटीलbhiwandiभिवंडी