शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
3
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
4
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
5
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
6
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
7
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
8
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
9
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
10
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
11
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
12
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
13
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
14
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
15
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
16
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
17
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
18
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
19
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
20
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार

हुतात्मा जवानांच्या कुटुंबासोबत गुढीपाडवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 03, 2019 3:50 AM

श्री कौपिनेश्वर सांस्कृतिक न्यासतर्फे ज्ञानकेंद्र सभागृहात ही बैठक झाली. सीमेवर लढताना वीरगती प्राप्त झालेले हुतात्मे हे कालांतराने विस्मृतीत जातात.

प्रज्ञा म्हात्रेठाणे : हिंदू नववर्षाच्या निमित्ताने काढण्यात येणाऱ्या स्वागतयात्रांदरम्यान ‘एक गुढी हुतात्म्यांच्या कुटुंबीयांसाठी...’ हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. सीमेचे संरक्षण करताना वीरगती प्राप्त झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांमध्ये आनंद वाटण्याचा निर्णय स्वागतयात्रांच्या पूर्वतयारीनिमित्त सोमवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. या उपक्रमांतर्गत स्वागतयात्रा संपल्यानंतर कार्यकर्ते हुतात्मा जवानांच्या घरी जाऊ न गुढी उभारून गुढीपाडवा साजरा करणार आहेत. यावेळी त्यांना मिठाईचेही वाटप केले जाणार आहे.

श्री कौपिनेश्वर सांस्कृतिक न्यासतर्फे ज्ञानकेंद्र सभागृहात ही बैठक झाली. सीमेवर लढताना वीरगती प्राप्त झालेले हुतात्मे हे कालांतराने विस्मृतीत जातात. या हुतात्म्यांच्या कुटुंबीयांसोबत गुढीपाडवा साजरा व्हावा, यासाठी ठाण्यातील हुतात्म्यांची नावे आयोजकांकडे द्यावी, असे आवाहन प्रा. विद्याधर वालावलकर यांनी केले. न्यासाचे पदाधिकारी स्वागतयात्रा संपल्यावर सकाळी ११ वाजता गडकरी रंगायतन येथे गुढी आणि मिठाई घेऊन उभे राहतील. चार ते पाच कार्यकर्त्यांनी हुतात्म्यांच्या घरी जाऊन गुढीपाडवा त्यांच्यासोबत साजरा करावा, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. बैठकीच्या सुरुवातीला विश्वस्त डॉ. अश्विनी बापट यांनी स्वागतयात्रेचा धावता आढावा घेतला. बैठकीला पहिल्यांदाच आलेल्या काही संस्थांनी या स्वागतयात्रेतील आपल्या सहभागाविषयी सांगितले.हिंदू जागृती समितीतर्फे प्रथमोपचार प्रशिक्षणाची प्रात्यक्षिके दाखविली जाणार आहेत. तसेच, महिलांना स्वसंरक्षणाचे धडे दिले जाणार आहेत. इन्शुरन्सच्या माध्यमातून आपत्ती व्यवस्थापन कसे करावे यावर आधारित चित्ररथ असल्याचे कौस्तुभ कुलकर्णी यांनी सांगितले. गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला आणि स्वागतयात्रेत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे स्वयंसेवक पुरविले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. महिला बाइक रॅलीसाठी आतापर्यंत ३०९ महिलांनी नोंदणी केली असल्याचे मीनल परब कारखानीस यांनी सांगितले. या बाईक रॅलीची ‘१०० टक्के मतदान’ अशी थीम ठेवण्यात आल्याने प्रत्येकाने या आशयाचा फलक आपल्या बाइकला लावावा, असे आवाहन यावेळी केले. या बैठकीला निमंत्रक कुमार जयवंत, अरविंद जोशी, संजीव ब्रह्मे उपस्थित होते.बैठकीत मांडण्यात आलेल्या सूचनाच्चित्ररथांवरील संदेश जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. चित्ररथ आदल्यादिवसापासून सेंट जॉन दि बाप्टीस स्कूलजवळ उभे करावे. या चित्ररथांच्या संरक्षणाची काळजी आयोजक घेतील, असे वालावलकर यांनी सांगितले.च्नृत्यामुळे स्वागतयात्रा खोळंबू नये यासाठी संबंधित संस्थांनी शिस्त पाळावी अशी सूचना यावेळी करण्यात आली.च् ज्यांच्या चित्ररथासोबत जास्त लोक असतील त्यांना विशेष पारितोषिक देण्यात येणार आहे.च्स्वागतयात्रेत ‘श्री राम जय राम जय जय राम’ असा रामनामाचा जप व्हावा अशी संकल्पना विश्व हिंदू परिषदेने मांडली. त्यालाही मान्यता देण्यात आली. पालखी येईपर्यंत सर्व चित्ररथांनी एकाच वेळी हा जयघोष करावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

टॅग्स :thaneठाणेGudi Padwa 2018गुढीपाडवा २०१८