शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३१ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
3
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
4
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
5
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
6
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
7
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
8
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
9
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
10
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
11
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
12
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
13
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
14
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
15
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
16
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
17
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
18
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
19
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
20
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'

ठाणे जिल्ह्यातील भूजल विकासाची स्थिती फक्त १९ टक्के

By सुरेश लोखंडे | Updated: June 26, 2023 20:12 IST

केंद्रीय भूमीजल बोर्डाकडून जिल्हा प्रशासनाला भूजल व्यवस्थापन आराखडा सुपूर्द.

ठाणे : जिल्ह्यातील पाणी पातळी अतिशय उथळ आहे. तर जिल्ह्याच्या पाणी पातळीत घट आढळून येत आहे. त्यामुळे भूजल विकासाची स्थिती फक्त १९ टक्के आहे. त्यामुळे केंद्रीय भूमीजल बोडार्ने पाणी वाचविण्यासाठी भूजलाची मागणी व्यवस्थापन करण्यासाठी ठिबक सिंचन पद्धती अवलंबिण्याच्या सूचनेसह ठिबकचा वापर केल्यास वार्षिक ४.३७ दशलक्ष घनमीटर (दशलघमी) पाण्याची बचत जिल्ह्यात होईल, अशा सुचना व मार्गदर्शक अहवाला आज निवासी उपजिल्हाधिकारी सुदाम परदेशी यांच्याकडे सुपूर्द केला आहे. त्यात भूजल पातळीविषयी सखोल मार्गदर्शन व सुचना करण्यात आल्या आहे.

जलशक्ती मंत्रालयाच्याअंतर्गत असलेल्या केंद्रीय भूजल मंडळाच्या शास्त्रज्ञांनी ठाणे जिल्ह्यातील भौगोलिक स्थिती, जमिनीखालील खडक, भूजलाची स्थिती, जलधर नकाशा व भूजल पातळी वाढविण्यासाठी आवश्यक उपाययोजनांची समावेश असलेला अहवाल तयार केला आहे. हा अहवाल परदेशी यांच्याकडे आज सोपविला आहे. त्यानुसार भूजल व्यवस्थापनाशी संबंधित जलसंपदा, पाटबंधारे, जलसंधारण, कृषि आदी विभागांना हा अहवाल उपलब्ध करून या अहवालात सुचविलेल्या उपाययोजनांवर काम करण्याची सूचना परदेशी यांनी यावेळी केली. यावेळी केंद्रीय भूज बोडार्चे वैज्ञानिक व प्रभारी अधिकारी डॉ.जे. दाविथुराज, वैज्ञानिक संदीप वाघमारे, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेचे ठाणे येथील वरिष्ठ वैज्ञानिक मृणालिनी लोखंडे आदी उपस्थित होते.

केंद्रीय बोर्डे भूजल पातळीवरील हा अहवाल जिल्हा प्रशासनाला सुपूर्द केला आहे. त्याव्दारे जिल्हह्यातील विविध वैशिष्ट्ये निदर्शनात आणून देत सूचनाही करण्यात आल्या आहे. यामध्य जिल्ह्यातील चार हजार ९१ वर्ग किलोमीटर भौगोलिक क्षेत्रापैकी दोन हजार १०६ वर्ग किलोमीटर क्षेत्र हे पहाडी क्षेत्र आणि बसाल्ट खडकाने व्यापलेले आहे. झिज झालेल्या खडकांची जाडी ही ५ ते १८ मीटर आढळून आली. जिल्ह्यात भूजल विकासाची स्थिती सरासरी ही १९ टक्के असून कमी जल उत्पादकात असलेले जलधर आढळून येत आहेत. जिल्ह्याच्या पाणी पातळीत घट आढळून येत आहे आदी वैशिष्ट्य व सूचनांचा उहापोह या अहवालात करण्यात आला आहे.

या व्यवस्थापन अहवालाव्दारे भूजलाची मागणी व पुरवठ्याचा आराखडा तयार केला आहे. त्यामध्ये पाणी पातळी अतिशय उथळ असल्याने आणि भूजल विकासाची स्थिती फक्त १९ टक्के असल्यामुळे पुरवठा व्यवस्थापन सुचविण्यात आले नाही. मात्र, पाणी वाचविण्यासाठी भूजलाची मागणी व्यवस्थापन करण्यासाठी ठिबक सिंचन पद्धती अवलंबिण्याची सूचना केली आहे. ठिबकचा वापर केल्यास वार्षिक ४.३७ दशलघमी पाण्याची बचत जिल्ह्यात होईल. यामुळे जिल्ह्यातील ११ हजार ३० हेक्टर क्षेत्र शाश्वत भूजल सिंचनाखाली येईल. - हे क्षेत्र ओलिताखाली आणण्यासाठी चार हजार ३०४ विहिरी व ७१९ विंधन विहिरी अहवालात सुचविण्यात आल्या आहेत.            

जेथे पाण्याची पातळी खोलावर गेली आहे अशा क्षेत्रासाठी समतल बांध नाला बंडिंग, गल्ली प्लगिंग यासारख्या कामे सुचविण्यात आली आहेत. लाभक्षेत्रामध्ये भूपृष्ठ जल व भूजलाचे  नियोजन करणे आवश्यक आहे. शहापूर व मुरबाडमध्ये भूजल पातळी वाढविण्यासाठी योग्य व्यवस्थापनाची आवश्यकता असल्याचे अहवालात नमूद आहे.  केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाने जलधर नकाशे तयार करण्याचा महत्वकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. याअंतर्गत ठाणे जिल्ह्यातील भूजल पातळी, भूस्तराची स्थिती आदींचा अभ्यास यामध्ये करण्यात आला आहे. सन २०२२-२३च्या या अहवालमध्ये जिल्ह्याच्या सात तालुक्याचा समावेश जलधर नकाशामध्ये करण्यात आला आहे. भूजल व्यवस्थापनासाठी संस्थात्मक आराखडा तयार करून तो जिल्ह्यात राबविण्याची सूचना यामध्ये करण्यात आली आहे. त्यासाठी भूजल व्यवस्थापन आराखडाही सुचविण्यात आला आहे.

या भूजल व्यवस्थापन आराखड्यात उपाय योजना केंद्रीय भूजल बोडार्ने सूचवल्या आहेत. या आराखड्यामध्ये पर्जन्यमान, जलधर प्रणालीचे प्रकार व वैशिष्ट्ये, सिंचन व नकदी पिकासाठी भूजल उपशाचा भूजलावर येणार ताण, मयार्दीत भूजल उपलब्धता, भूजल पातळीतली चढउतार, भूजल गुणवत्ता, जिल्ह्यातील भूगर्भस्थिती, माती व जमिनीचा वापर यांचा अभ्यास करून अहवालामध्ये समावेश करण्यात आला आहे. या अहवालात सुचविलेला आराखडा राबवित असताना भूजलावर आधारित वैज्ञानिक दृष्टिकोन लक्षात घेणे गरजेचे आहे. जेणेकरून जिल्ह्याचा भूजलावर आधारित शाश्वत विकास साधता येईल, असे या अहवालात नमूद केले आहे. 

टॅग्स :thaneठाणेWaterपाणी