शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक आयोग गायब नव्हता; लोकसभा निकालापूर्वी पत्रकार परिषद घेत आयुक्तांनी सुनावले
2
BREAKING Lipi Rastogi: आयएएस अधिकारी विकास रस्तोगींच्या मुलीची आत्महत्या, मंत्रालयासमोरच्या इमारतीत घडला प्रकार
3
महाराष्ट्रात आम्ही ३५ पेक्षा जास्त जागा जिंकणार; निकालाआधी विजय वडेट्टीवार यांचा मोठा दावा
4
अरुणाचल प्रदेशमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला मोठे यश; अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
5
बहिणीला प्रियकरासोबत पाहताच संतापला भाऊ; वडिलांसह मिळून केली मुलाची निर्घृण हत्या
6
चर्चेतील 'या' हाॅट सीट्सवर बाजी मारणार तरी काेण ? कुठे लागू शकतात धक्कादायक निकाल?
7
भाजपाकडून विधान परिषदेसाठी तीन उमेदवार जाहीर, कोकण पदवीधरमध्ये निरंजन डावखरे तर...
8
सत्ताधाऱ्यांकडून मतमोजणीत फेरफार केला जाण्याची शक्यता, सतर्क राहा, जयंत पाटील यांचं कार्यकर्त्यांना पत्र
9
अमूलपाठोपाठ मदर डेअरीनेही दिला महागाईचा झटका; दुधाच्या दरात केली वाढ
10
पश्चिम रेल्वेपाठोपाठ मध्य रेल्वेचीही वाहतूक विस्कळीत, सीएसएमटी स्थानकात तांत्रिक बिघाड
11
एक्झिट पोलवर सोनिया गांधी यांची पहिली प्रतिक्रिया! जाणून घ्या, काय म्हणाल्या?
12
PHOTOS : शुबमन आणि रिद्धिमा लग्न करणार? अभिनेत्रीनं सोडलं मौन, तिचं धक्कादायक उत्तर
13
“अब की बार फिर मोदी सरकार”; भारतातील लोकसभा निवडणुकीच्या Exit Poll वर चीनची प्रतिक्रिया
14
PM Modi PSU Stocks : कोणी १०% वाढला... तर कोणी केला रकॉर्ड; PM Modiनी सांगितलेले शेअर्स बनले रॉकेट
15
महफिल फिरसे जमेगी! 'लाहोर नाही आता मुंबईत...' नेटफ्लिक्सने केली 'हीरामंडी 2' ची घोषणा
16
T20 World Cup 2024: क्रिकेटला पुन्हा ग्लॅमरचा तडका! आंतरराष्ट्रीय स्तरावर झळकली 'महाराष्ट्राची लेक'
17
एक्झिट पोलसारखेच वातावरण राहिले तर महाराष्ट्र विधानसभेला काय होणार? ठाकरेंची चारही बोटे तुपात...
18
Mumbai Local: मुंबईकरांची आठवड्याची सुरुवात लेटमार्कने! पश्चिम रेल्वे विस्कळीत, बोरीवलीत तांत्रिक बिघाड
19
शहाजीबापू पाटील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात; CM एकनाथ शिंदेंनी घेतली भेट, केली तब्येतीची विचारपूस
20
Fact Check : राहुल गांधी पुढचे पंतप्रधान होतील असा दावा करणारी शाहरुख खानची 'ती' पोस्ट खोटी

जन्म, स्मृतिप्रीत्यर्थ वृक्षलागवड करून हरित महाराष्ट्रचा संकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2018 12:45 AM

‘वृक्षांची जोपासना हीच खरी निसर्गाची उपासना’ या सूत्राद्वारे महाराष्ट्राचे वनक्षेत्र २० टक्क्यांवरून ३३ टक्के करून हरित महाराष्ट्र ही संकल्पना राबविण्यासाठी राज्यातील प्रत्येक गाव वृक्षवेलींनी सजविण्याचा निर्णय ग्रामविकास विभागाने घेतला आहे.

- नारायण जाधवठाणे : ‘वृक्षांची जोपासना हीच खरी निसर्गाची उपासना’ या सूत्राद्वारे महाराष्ट्राचे वनक्षेत्र २० टक्क्यांवरून ३३ टक्के करून हरित महाराष्ट्र ही संकल्पना राबविण्यासाठी राज्यातील प्रत्येक गाव वृक्षवेलींनी सजविण्याचा निर्णय ग्रामविकास विभागाने घेतला आहे. यासाठी प्रत्येक गावातील प्रत्येक घरांत मुल जन्माला येणे असो वा मंगलकार्यांचा आनंद साजरा करणे ते कुणाचे निधन झाल्यावर त्या मृतांच्या स्मृती जपण्यासाठी वृक्षलागवड करून त्याचे संवर्धन करण्यासाठी ग्रामपंचायतींच्या मदतीने पंचसूत्री कार्यक्रम हाती घेतला आहे.पर्यावरण समतोल राखण्यासाठी पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील रानमळा या गावाने लोकसहभागातून गावात कुणाचा जन्म, विवाह वा देवाज्ञा झाल्यास आठवण म्हणून वृक्षलागवड करून गाव हिरवेगार केले. हे उदाहरण लक्षात घेता ग्रामविकास विभागाने हा हरित महाराष्ट्र कार्यक्रम हाती घेतला आहे.अशी करणार रोपांची उपलब्धतासंबधित ग्रामपंचायतील दानशूर व्यक्ती, सीआरर फंड किंवा सामाजिक वनीकरण विभागाच्या वनमहोत्सवातून सवलतीच्या दरात रोपे उपलब्ध करून द्यावीत. यासाठीचा निधी आपल्या उत्पन्न स्त्रोतांतून भागवावा.वृक्षलागवडीसाठी १ जुलै ते ३० जून हा कालावधी गृहीत धरला असून या कालावधीत गावात किती रोपे लागतील, याचा अंदाज ग्रामपंचायतीने घ्यायचा आहे. मात्र, रोपांचे वाटप १ जुलै या दिवशी एकदाच करावे. नंतर संबधित व्यक्तीने त्या रोपाचे वाटप १ ते ७ जुलै रोजी या काळात करून तशी नोंद ग्रामपंचायतींच्या रजिस्टरमध्ये करून त्याचे संवर्धन करायचे आहे.असा आहे पंचसूत्री कार्यक्रम१ शुभेच्छा वृक्ष : वर्षभरात गावात जन्माला येणाऱ्या प्रत्येक बाळाचे स्वागत संबधित कुटुंबाला फळझाडांची रोपे देऊन करावे. अशी कुटुंबे त्या झाडाचे लागवड करून संवर्धन करतील.२ शुभमंगल वृक्ष : गावात ज्यांचे विवाह होतील, त्यांना फळझाडांची रोपे देऊन शुभआशिर्वाद द्यावेत.३ आनंदवृक्ष : वर्षभरात जी मुले दहावी,बारावी उत्तीर्ण होतील, गावातील ज्या तरूण-तरुणींना नोकरी लागेल वा जे निवडून येतील त्यांना अशा आनंदाच्या क्षणी फळझाडांची रोपे देऊन त्यांचे स्वागत करावे.४ माहेरची झाडी : गावातील ज्या कन्यांचे विवाह होतील, त्यांना सासरी जाऊन झाडांची रोपे देणे अवघड असते. या विवाहित कन्येच्या माहेरच्या लोकांना झाडांचे रोप देऊन स्वागत करावे. संबधित कुटुंब रोपांचे लेकीप्रमाणे जोपासना करतील, अशी अपेक्षा आहे.५ स्मृती वृक्ष : एखाद्या गावात ज्या व्यक्तीचे निधन होते, त्या कुटुंबाला झाडांचे रोप देऊन श्रद्धांजली अर्पण करावी. अशा रोपाची लागगड करून आपल्या प्रिय व्यक्तीच्या स्मृती संबधित कुटुंब जपतील, असा विश्वास ग्राम विकास विभागाने व्यक्त केला आहे.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र