शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
2
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
3
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
4
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
5
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!
6
३०, ४० आणि ५० व्या वर्षी 'कोट्यधीश' व्हायचेय? तुमच्या वयानुसार निवडा गुंतवणुकीची योग्य स्ट्रॅटेजी!
7
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
8
ICC Rankings : हातात विश्वचषकाचा 'दागिना'; पण जाता जाता लॉरानं 'वनडे क्वीन’ स्मृतीचा मुकूट हिसकावला!
9
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
10
सलग चौथ्या दिवशी बाजारात घसरण! गुंतवणूकदारांचे २.६ लाख कोटी पाण्यात; 'ही' आहेत ५ कारणे
11
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
12
मंदिराच्या गर्भगृहाची दुरुस्ती करताना सापडलं घबाड, कलशात होती सोन्याची एवढी नाणी...  
13
माणुसकीचा जमानाच राहीला नाही! ओला रायडरची मदत केली अन् तो तरुणीसोबत 'असा' वागला
14
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदेंना धक्का, रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेशी आघाडी
15
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
16
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
17
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
18
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
19
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
20
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?

शासनाच्या मैदानाचा होतोय राजकीय आखाडा, दोनही राष्ट्रवादीकडून आरोप प्रत्यारोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2024 16:42 IST

खारेगाव येथील खारलॅन्ड वरील मैदानाला जिल्हाधिकारी कार्यालयाकडून टाळे ठोकण्यात आल्यानंतर त्याचा जाब आव्हांनी रविवारी पत्रकार परिषद घेऊन विचारला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच या मैदानाला टाळे ठोकण्यास सांगितल्याचेही ते म्हणाले.

अजित मांडके -

ठाणे : कळवा येथील खारेगाव भागात असलेल्या शासनाच्या खारलॅन्डच्या जागेवरुन दोनही राष्ट्रवादीमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैºया उडत आहेत. आव्हाडांनी या मैदानाला लावण्यात आलेल्या टाळ्याच्या मुद्यावरुन थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टिका केल्यानंतर आता राष्ट्रवादी अजित पवार गटाने देखील आव्हाडांना प्रतिउत्तर देत खेळाच्या मैदानासाठी लहान मुलांचा वापर करुन आव्हाड राजकारण खेळत असल्याचा आरोप नजीब मुल्ला आणि आनंद परांजपे यांनी केला आहे. त्यातही शासनाच्या या मैदानाच्या जागेतून लाखोंची लुट केली जात असून शासनाला एकही पैसा भरला जात नसल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. त्यामुळे आता हे मैदाना राजकीय आखाडा झाल्याचेच दिसत आहे.

खारेगाव येथील खारलॅन्ड वरील मैदानाला जिल्हाधिकारी कार्यालयाकडून टाळे ठोकण्यात आल्यानंतर त्याचा जाब आव्हांनी रविवारी पत्रकार परिषद घेऊन विचारला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच या मैदानाला टाळे ठोकण्यास सांगितल्याचेही ते म्हणाले. त्यामुळे तुम्ही छोट्या राजकारणात पडू नका असा सल्लाही त्यांनी दिला होता. त्यानंतर आता राष्ट्रवादी (अजित पवार ) गटाने पत्रकार परिषद घेऊन आव्हाडांना प्रतिउत्तर दिले आहे. हे मैदान शासकीय मालकीचे आहे, ते कार्यक्रमाला घेतले त्यावेळेस आम्ही ३४ हजार मोजले होते. परंतु मैदानाची पाहणी करण्यासाठी गेलो असता, आव्हाडांच्या गुंडांनी अडविल्याचा दावाही परांजपे यांनी केला. परंतु मागील ८ वर्षापासून या मैदानाचा वापर सुरु असून त्यातून लाखोंचा मलिदा लाटला जात आहे. मात्र शासनाला एक दमडीली दिली जात नसल्याचा आरोप त्यांनी केला. त्यात येथील क्रिकेट बंद करणे ही आमची भावना नसून  येथील सर्वच मुलांना या मैदानाचा वापर करण्यास मिळावा अशी आमची अपेक्षा असल्याचेही ते म्हणाले. त्यातही या मैदानाच्या ठिकाणी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स व्हावे अशी इच्छा आव्हाडांचीच होती. परंतु त्याची अंमलबजावणी त्यांनीच केली नसल्याचा दावा नजीब मुल्ला यांनी केला. येथील अनिरुध्द अ‍ॅकेडमी पैसे घेते का नाही? ते आव्हाडांनी आधी स्पष्ट करावे असे आव्हानही त्यांनी दिले. सहानभुती मिळविण्याची अ‍ॅक्टींग बंद करा, आता जनता तुमच्या अ‍ॅक्टींगला बळी पडणार नसल्याचेही ते म्हणाले. त्यातही या मैदानात राजकीय, सांस्कृतिक कार्यक्रम करुन दिले जात नसून शासकीय मैदान हडपण्याचा डाव असल्याचा आरोपही त्यांनी केला.

सामाजिक न्याय विभागाच्या जागेवर कार्यालयखारेगाव, कावेरी सेतू येथे उभारण्यात आलेले राष्ट्रवादीचे पक्ष कार्यालय हे सामाजिक न्याय विभागाच्या जागेवर असून त्याच्या बाजूला ७५ लाख रुपये खर्चुन उभारण्यात आलेले वाचनालय देखील अनाधिकृत असल्याचा दावा परांजपे आणि मुल्ला यांनी केला आहे. तसेच कळवा रेल्वे स्टेशनच्या बाहेर पार्कींगच्या नावाखाली बेकायदा वसुली केली जात असून त्यांच्याच पक्षाच्या माजी नगरेसवकाकडून ही वसुली सुरु असून या सर्वांची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यातही राष्ट्रवादीचे ते कार्यालय अनाधिकृत नसल्याचे आव्हाड यांनी पुढील २४ तासात जाहीर करावे तसेच ती जागा कोणाच्या मालकीची आहे ते सुध्दा जाहीर करावे असे आव्हानही परांजपे यांनी दिले.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवारSharad Pawarशरद पवार