शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
4
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
5
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
6
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
7
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
8
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
9
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
10
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
11
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
12
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
13
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
14
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
15
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
16
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
17
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
18
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
19
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
20
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी

शेतकऱ्यांच्या तोंडाला सरकारने पुसली पाने, नुकसानभरपाई मिळाली नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2019 01:12 IST

शहापूर तालुक्यात मागीलवर्षी पाऊसच लवकर गेल्याने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करूनही शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळाली नाही.

भातसानगर - शहापूर तालुक्यात मागीलवर्षी पाऊसच लवकर गेल्याने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करूनही शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळाली नाही. शेतक-यांच्या तोंडाला सरकारने पाने पुसल्याची माहिती समोर आली आहे. तर यावर्षीची तुटपुंजी मदत कृषी विभागाकडे जमा झाली आहे.काही महिन्यांपूर्वी शेतकºयांच्या खात्यात नुकसानभरपाईची रक्कम जमा झाली. ही रक्कम मागीलवर्षीची होती असा शेतक-यांचा समज झाला. मात्र चौकशीअंती ही २०१७ च्या आॅक्टोबर ची पावसामुळे झालेल्या नुकसानीची मदत असल्याचे स्पष्ट झाले.मागीलवर्षी आॅगस्टमध्येच पाऊस गेल्याने माळरानातील भातशेती पार होरळून गेली होती. या नुकसानीचे पंचनामे होण्याच्या मागणीसाठी माजी आमदार पांडुरंग बरोरा यांनी तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण केल्या नंतर कृषी विभाग यांच्यामार्फत नुकसानीचे पंचनामेही केले होते. ५० टक्के नुकसान झाल्याचेही तहसीलदार यांनी जाहीरही केले. मात्र सरकारदरबारी याची कोणत्याच प्रकारची दखल घेतली न गेल्याने तालुक्यातील शेतकºयांना एक दमडीही मंजूर करण्यात आली नसल्याचे स्पष्ट झाले.मागीलवर्षी २१९ गावांमध्ये १५ हजार ७२३ हेक्टर पिकाखाली होते. २७ हजार ४४२ शेतकºयांना याचा फटका बसला होता. ३३ टक्क्यापेक्षा अधिक नुकसान शेतकºयांचे झाले होते.मात्र पंचनामे होऊनही शेतकºयांच्या तोंडाला पाने पुसली. २०१७ च्या आॅक्टोबरमध्ये पावसामुळे झालेल्या नुकसानभरपाईची रक्कम २ कोटी ३८ लाखांचे काही महिन्यांपूर्वी वाटप करण्यात आले. यामध्ये २६ हजार ७१८ शेतकºयांना ती वाटप करण्यात आली. मात्र मागीलवर्षीची नुकसानभरपाई मंजूर झाली नसल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत.यावर्षी ३३ टक्के नुकसानीचा अहवाल देण्यात आला असून पिकाखाली क्षेत्र १७ हजार २९.१२ तर नुकसानग्रस्त क्षेत्र ११ हजार ७७६.६७ हेक्टर इतके असून २४ हजार १९० शेतकºयांना त्याचा फटका बसला आहे. यासाठी हेक्टरी ८ हजार इतकी तुटपुंजी मदत सरकारने जाहीर केल्याने शेतकरी निराश झाला आहे.मागीलवर्षी झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले. मात्र कोणत्याही प्रकारची नुकसान भरपाई शेतकºयांना सरकारकडून देण्यात आली नाही.- जे. एस.जायभाय, प्रभारी तालुका कृषी अधिकारी

टॅग्स :Farmerशेतकरीthaneठाणे