शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
3
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
4
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
5
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
6
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
7
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
8
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
9
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
10
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
11
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
12
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
13
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
14
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
15
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
16
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
17
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
18
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
19
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
20
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली

वंचितांच्या रंगमंचाला अधिक बळ देणं, हीच रत्नाकर मतकरींना खरी श्रद्धांजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2020 18:45 IST

वंचितांच्या रंगमंचावर मतकरी याना आदरांजली वाहण्यात आली.

ठळक मुद्देरत्नाकर मतकरी याना वाहिली आदरांजलीडॉ. आनंद नाडकर्णी यांनी व्यक्त केल्या भावना....हीच रत्नाकर मतकरींना खरी श्रद्धांजली

ठाणे : दिवंगत रत्नाकर मतकरी यांनी कोणत्याही विद्यापीठाची मानस शास्त्रातील पदवी संपादन केलेली नव्हती. मात्र माणसातील गंड, विकृती, संवेदना, आकांक्षा, नाते संबंधातील तणाव, अघटितता, आकस्मितता या साऱ्या मनोविकारांचे सखोल भान मतकरींना होते, हे त्यांच्या चतुरस्त्र लिखाणातून जाणवते. अध्यात्मिक मानस शास्त्रापासून ते राजकीय आणि विकासात्मक मानस शास्त्रापर्यन्तच्या विस्तृत कॅनव्हास वर त्यांनी लेखन केले. एका अर्थाने मतकरी मानसशास्त्रात डॉक्टर आणि डॉक्टरेट या पदव्या संपन्न केलेले होते अशा शब्दात ठाण्यातील ज्येष्ठ माणसपोचार तज्ज्ञ आणि साहित्यिक डॉ. आनंद नाडकर्णी यांनी भावना व्यक्त केल्या.              या मानसशास्त्रीय आकलना बरोबरच त्यांचे सामाजिक भान जागरूक होते. त्यामुळेच वंचितांचा रंगमंचसारखी अत्यंत अनोखी आणि क्रांतिकारक संकल्पना त्यांनी मांडली आणि ती लोकवस्तीतल्या मुली - मुलांच्या माध्य्मातून प्रत्यक्ष साकारण्यासाठी, त्यांनी खूप परिश्रमही घेतले. त्यांचे वंचितांच्या रंगमंचाचे स्वप्न आता कुठे बाळसे धरत होते. ते अधिक समृद्धपणे साकार करणे, हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, अशा शब्दात नाडकर्णी यांनी  मतकरी यांना श्रद्धांजली वाहिली. समता विचार प्रसारक संस्था आणि साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने फेसबुक लाईव्ह च्या स्वरूपात आयोजित मतकरींच्या स्मरण यात्रेत ते बोलत होते. ज्येष्ठ अभिनेते उदय सबनीस यांनी मतकरीं सोबत केलेल्या सिरीयल आणि अन्य कलाकृतींच्या आठवणी जागवत, मतकरी खूप स्पष्टवक्ते, परखड आणि तितकेच सुजाण मानवी संबंध जपणारे व्यक्तिमत्व होते, असे सांगितले. वंचितांचा रंगमंच हे मतकरींना पडलेले अत्यंत विशाल स्वप्न होते. ते यापुढील काळात अधिकाधिक विकसित करण्याची जबादारी आपण सर्व रंगकर्मींनी उचलली पाहिजे, असे ते म्हणाले. मतकरींचे कुटुंबिय प्रतिभा व गणेश मतकरी तसेच सुप्रिया विनोद उपस्थित असलेल्या या इ - आदरांजली सभेचे प्रास्ताविक, समता विचार प्रसारक संस्थेचे विश्वस्त आणि वंचितांच्या रंगमंचाचे सूत्रधार डॉ. संजय मंगला गोपाळ यांनी केले. त्यावेळी त्यांनी सांगितले की,  मतकरी कितीही मोठे सेलिब्रेटी साहित्यिक असले तरी ते मुळात एक संवेदनशील माणूस होते. त्यातूनच त्यांनी सामाजिक प्रश्नावर थेट भूमिका घेत अनेक जन आंदोलनांना बळ दिले. नर्मदा बचाव, एनराॅन विरोधी, गिरणी कामगार, निर्भय बनो अशा विविध  आंदोलनात त्यांनी हिरीरीने भाग घेतला आणि सामान्य जनांना धीर मिळवून दिला. वंचितांचा रंगमंच ही संकल्पना साकारण्यासाठी त्यांनी ठाण्यातल्या लोकवस्त्या निवडल्या व आमच्या वंचित एकलव्यांना अभिव्यक्तीच्या माध्यमातून आत्मविश्वास प्रदान केला. त्यांचं व्यक्तिमत्व घडवलं. एका परिने वंचितांचा रंगमंच आता पोरका झाला, असं ते शेवटी म्हणाले. अध्यक्षीय समारोप करतांना साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक ट्रस्टचे कार्याध्यक्ष प्रमोद निगुडकर म्हणाले, सतत नव - निर्मितीचा ध्यास असलेला, कार्यकर्त्यांचा नैतिक आधार आम्ही गमावून बसलो आहोत. नाट्य जल्लोषच्या संयोजक व रंगकर्मी हर्षदा बोरकर यांनी या सभेचे सूत्र संचालन केले. ---------------------------------------------------------------------वंचितांचा सिनेमा हे पुढचे पाऊल टाकणार!

प्रसिद्ध नाट्य दिगदर्शक विजय केंकरे म्हणाले, आम्ही आता ज्येष्ठ या सदरात मोडायला लागलो आहोत. पण आमच्या सारख्या तथाकथीत ज्येष्ठांचीही कान उघाडणी करणारा आता कुणी राहिला नाही. मतकरींना तो हक्क होता. चित्र, कथा, भयकथा, पटकथा, नाट्य अशा साहित्याच्या विविध फॉर्म्स वर मतकरींची हुकूमत होती. त्यामुळे कोणत्या गोष्टीसाठी कोणता फॉर्म प्रभावी ठरेल याचा विचार करून त्यांनी विविध साहित्य निर्माण केले आहे. एकीकडे मंचावर राजकारणी असतील तर मी तिथे नसेन अशी भूमिका घेणारे मतकरी, अन्याय आणि अभावग्रस्तांच्या बाजूने अत्यंत हिरीरीने आणि पोटतिडिकीने उभे राहत. त्यांनी आपल्या उदार स्वभावाने अनेक माणसे घडवली. त्यांचे जीवन समृद्ध केले. साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकाच्या अध्यक्ष आणि साहित्यिक नीरजा म्हणाल्या की, साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक उभारणीत मतकरींनी योगदान दिले. आशयघन अशा अनेक प्रकारच्या साहित्यकृती देणारा हा साहित्यिक तितक्याच आवेगाने सामान्य माणसाच्या न्यायासाठी उभा राहत असे. भूमिका घेत असे, असा माणूस पुन्हा होणे अवघड. स्वतःच्या प्रतिकूलतेशी झुंजत, स्वबळावर आपले वेगळेपण सिद्ध करणारे प्रसिद्ध दिग्दर्शक - निर्माते विजु माने यांनी वंचितांच्या रंगमंचावर मतकरींसोबत केलेल्या कामाच्या आठवणी जागवल्या. मतकरींसारखंच वंचितांसाठी काम करत राहीन. वंचितांच्या रंगमंचामधून पुढे वंचितांचा सिनेमा उभा करिन, असे संकल्प त्यांनी यावेळी जाहीर केले.                  कथा लेखिका मोनिका गजेंद्रगडकर, पत्रकार, लेखक मुकुंद कुळे, रंगकर्मी संतोष वेरुळकर, चित्र समीक्षक डॉ. संतोष पाठारे, उदयोन्मुख कलाकार - नर्तक नकुल घाणेकर, मतकरींसोबत बालनाट्यात काम करीत व्यक्तिमत्व घडलेला आर्किटेक्ट मकरंद तोरस्कर, प्रायोगिक नाट्य दिग्दर्शक मिलिंद अधिकारी आदींनीही यावेळी आपल्या भावना व्यक्त केल्या.

टॅग्स :thaneठाणे