शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
2
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
3
Devendra Fadnavis: "बोल बच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तरे देत नाही" फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
4
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
5
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
6
बिझनेसमन संजय कपूर यांना मैदानावरच देण्यात आलेला CPR, शेवटचा Video समोर
7
आता विका जिकडे विकायचंय.., पाकिस्तान 'याचा' जगातील सर्वात मोठा उत्पादक, भारतानं नाकारलं आता अन्य देशांचे दरवाजे ठोठावतोय
8
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
9
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
10
FD पेक्षा अधिक रिटर्न, रिस्कही कमी! 'याला' म्युच्युअल फंडाचं सेफ झोन म्हणतात, तुमच्यासाठी योग्य आहे का?
11
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
12
अक्षय कोठारीला मिळालं बालपणीचं प्रेम, 'लक्ष्मीच्या पावलांनी' फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात
13
Air India च्या भाड्यात १५% पर्यंतची घसरण; अहमदाबाद विमान अपघातानंतर बुकिंग मोठ्या प्रमाणात घटलं
14
Air India Plane Crash: ‘त्या’ विमानात कोणताही बिघाड नव्हता, एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांची ग्वाही
15
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
16
Navi Mumbai: मुलीवरून चिडवल्याने मित्राचा कापला गळा, नवी मुबईतील घटनेने खळबळ!
17
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
18
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
19
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
20
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!

गळफास घेऊन मुलीची आत्महत्या; संशयास्पद मृत्यू असल्याचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2019 03:21 IST

उमराळे गावातील शारदा शिशू निकेतनचे शोभा ज्योती केंद्राचे मुलींचे वसतिगृह आहे.

नालासोपारा : उमराळे गावातील वसतिगृहात राहणाऱ्या १७ वर्षीय मुलीने गुरु वारी पहाटे गळफास घेऊन आत्महत्या केली. तिचा मृत्यू संशयास्पद असल्याचा आरोप तिच्या नातेवाईकांनी केला आहे. या प्रकरणी नालासोपारा पोलिसांनी आत्महत्येची नोंद केली असून मृतदेह शवविच्छेदनासाठी मुंबईच्या जे.जे. रुग्णालयात पाठवला आहे.उमराळे गावातील शारदा शिशू निकेतनचे शोभा ज्योती केंद्राचे मुलींचे वसतिगृह आहे. तेथे सध्या सहा मुली राहतात. तेथे राहणाºया १७ वर्षांच्या मुलीने गुरूवारी पहाटे पाचच्या सुमारास खोलीतच गळफास घेऊन आत्महत्या केली.या घटनेची माहिती नालासोपारा पोलिसांना न देता वसतीगृहाच्या संचालिका, अधीक्षक, केअर टेकर आणि इतर महिला स्टाफने तिचा मृतदेह उतरवला आणि तो तिच्या घरी घेऊन गेले. नंतर या मुलीचे नातेवाईक आणि वसतिगृहाच्या महिला स्टाफने तिला विजयनगर येथील वसई - विरार पालिकेच्या रुग्णालयात नेला. तेथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले होते.संचालिका आणि केअरटेकरवर गुन्हा दाखलकेअर टेकर, संचालिका पद्मा पालित आणि दोन संचालकांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नालासोपारा पोलिसांनी शुक्रवारी दाखल केला. आमची मुलगी आत्महत्या करूच शकत नाही. तिच्यासोबत काही वेडेवाकडे घडले असून, तिने विरोध केल्यावर तिची हत्या केल्याचा आरोप घरच्यांनी केला. या संपूर्ण प्रकरणाचा पोलिसांनी योग्य तो तपास करून आरोपींना कडक शिक्षा करावी, अशी मागणीही केली आहे.मुलीच्या आत्महत्येची माहिती वसतिगृहातील केअरटेकर, संचालिका आणि महिला स्टाफने पोलिसांना दिली नाही. तिचा मृतदेह उतरवून तिच्या घरी नेला. पोलिसांपासून ही बाब लपविल्याने संस्थेच्या संचालिकांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. मुलीचा मृतदेह शवविच्छेदनसाठी जे.जे.ला पाठविला असून, तो अहवाल आल्यावर पुढील कारवाई करणार आहे.- वसंत लब्दे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, नालासोपारा पोलीस ठाणे

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी