शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

घोडबंदरला मिळणार वाढीव ५ दशलक्ष लीटर पाणी, महापालिकेने केला स्टेमकडे पत्रव्यवहार

By अजित मांडके | Updated: February 2, 2024 16:07 IST

ठाणे महापालिका क्षेत्रात चार स्त्रोतांमार्फत दररोज ५८५ दशलक्षलीटर इतका पाणी पुरवठा करण्यात येतो.

ठाणे :  घोडबंदरच्या पाण्याच्या मुद्यावरुन मागील काही दिवसापासून पुन्हा एकदा रान पेटले आहे. येथील नागरीकांना पाण्याच्या समस्या मांडल्यानंतर भाजप आणि शिवसेनेच्या आमदारांनी देखील वाढीव पाण्याची मागणी केली होती. अखेर ठाणे महापालिकेने घोडबंदरला वाढीव ५ दशलक्ष लीटर पाणी मिळावे यासाठी स्टेम प्राधिकरणाकडे पत्रव्यवहार केला आहे. हे वाढीव पाणी मिळण्यास एक महिन्यांचा कालावधी जाणार असल्याचे पालिकेच्या सुत्रांनी सांगितले. परंतु हे वाढीव पाच दशलक्ष लीटर पाणी घोडबंदरला पुरेसे ठरणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

ठाणे महापालिका क्षेत्रात चार स्त्रोतांमार्फत दररोज ५८५ दशलक्षलीटर इतका पाणी पुरवठा करण्यात येतो. त्यात महापालिकेच्या स्वत:च्या योजनेतून २५० दशलक्षलीटर, स्टेम प्राधिकरणाकडून ११५ दशलक्षलीटर, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून १३५ दशलक्षलीटर आणि मुंबई महापालिकेकडून ८५ दशलक्षलीटर इतका पाणी पुरवठा करण्यात येतो. परंतु असे असले तरी आजही ठाण्यातील अनेक भागांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यात घोडबंदर भागाला तर याची झळ अधिक बसत आहे. या भागाला कमी पाणी पुरवठा होत असल्याने त्याचा फायदा टँकर माफीया घेत आहेत. त्यामुळे अनेक सोसायटींना टँकरचेच बिल महिनाकाठी ४ ते ५ लाख जात आहे. त्यामुळेच महापालिका आयुक्तांनी घेतलेल्या पाण्या संदर्भातील पहिल्या बैठकीत घोडबंदरचा पाणी प्रश्न चांगलाच पेटल्याचे दिसून आले. घोडबंदरला पाणी वाढविण्याची मागणी येथील नागरीकांनी केली आहे. तर भाजपचे आमदार संजय केळकर यांनी घोडबंदरला वाढीव १० दशलक्ष लीटर पाणी पुरवठा वाढवून मिळावा अशी मागणी केली आहे. तर स्थानिक आमदार प्रताप सरनाईक यांनी या भागाला १०० एमएलडी पाणी दिले तरी कमी पडणार असल्याची भुमिका विषद केली आहे. त्यात आता माजी खासदार संजीव नाईक यांनी याच मुद्यावरुन महापालिका आयुक्तांची भेट घेत वाढीव पाण्याची मागणी केली आहे.

घोडबंदर भागाची लोकसंख्या सद्यस्थितीला ५ ते ७ लाखांच्या वर गेली आहे. या भागाला सध्या प्रतीदिन ११० दशलक्ष लीटर पाणी पुरवठा केला जात आहे. परंतु तो देखील अपुरा पडत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता महापालिकेने या भागाला वाढीव ५ दशलक्ष लीटर मिळावे यासाठी स्टेम प्राधिकरणाकडे पत्रव्यवहार केला आहे. यापूर्वी देखील महापालिकेने वाढीव पाण्यासाठी पत्रव्यवहार केला होता. परंतु त्याला फारसा यश आलेले दिसून आले नाही. परंतु आता महिनाभरात घोडबंदरला वाढीव ५ दशलक्ष लीटर पाणी मिळेल असे दावा पालिकेने केला आहे. परंतु पुढील महिन्यापासून उन्हाळा उजाडणार असल्याने पाणी टंचाईचे ढग आणखी तीव्र होणार आहेत. त्यामुळे हा वाढीव पाणी पुरवठा घोडबंदरकरांना मिळाला नाही तर मात्र त्यांचे आणखी हाल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाthaneठाणे