शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
4
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
5
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
6
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
7
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
8
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
9
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
10
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
11
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
12
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
13
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
16
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
17
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
18
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
19
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
20
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?

घोडबंदरला मिळणार वाढीव ५ दशलक्ष लीटर पाणी, महापालिकेने केला स्टेमकडे पत्रव्यवहार

By अजित मांडके | Updated: February 2, 2024 16:07 IST

ठाणे महापालिका क्षेत्रात चार स्त्रोतांमार्फत दररोज ५८५ दशलक्षलीटर इतका पाणी पुरवठा करण्यात येतो.

ठाणे :  घोडबंदरच्या पाण्याच्या मुद्यावरुन मागील काही दिवसापासून पुन्हा एकदा रान पेटले आहे. येथील नागरीकांना पाण्याच्या समस्या मांडल्यानंतर भाजप आणि शिवसेनेच्या आमदारांनी देखील वाढीव पाण्याची मागणी केली होती. अखेर ठाणे महापालिकेने घोडबंदरला वाढीव ५ दशलक्ष लीटर पाणी मिळावे यासाठी स्टेम प्राधिकरणाकडे पत्रव्यवहार केला आहे. हे वाढीव पाणी मिळण्यास एक महिन्यांचा कालावधी जाणार असल्याचे पालिकेच्या सुत्रांनी सांगितले. परंतु हे वाढीव पाच दशलक्ष लीटर पाणी घोडबंदरला पुरेसे ठरणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

ठाणे महापालिका क्षेत्रात चार स्त्रोतांमार्फत दररोज ५८५ दशलक्षलीटर इतका पाणी पुरवठा करण्यात येतो. त्यात महापालिकेच्या स्वत:च्या योजनेतून २५० दशलक्षलीटर, स्टेम प्राधिकरणाकडून ११५ दशलक्षलीटर, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून १३५ दशलक्षलीटर आणि मुंबई महापालिकेकडून ८५ दशलक्षलीटर इतका पाणी पुरवठा करण्यात येतो. परंतु असे असले तरी आजही ठाण्यातील अनेक भागांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यात घोडबंदर भागाला तर याची झळ अधिक बसत आहे. या भागाला कमी पाणी पुरवठा होत असल्याने त्याचा फायदा टँकर माफीया घेत आहेत. त्यामुळे अनेक सोसायटींना टँकरचेच बिल महिनाकाठी ४ ते ५ लाख जात आहे. त्यामुळेच महापालिका आयुक्तांनी घेतलेल्या पाण्या संदर्भातील पहिल्या बैठकीत घोडबंदरचा पाणी प्रश्न चांगलाच पेटल्याचे दिसून आले. घोडबंदरला पाणी वाढविण्याची मागणी येथील नागरीकांनी केली आहे. तर भाजपचे आमदार संजय केळकर यांनी घोडबंदरला वाढीव १० दशलक्ष लीटर पाणी पुरवठा वाढवून मिळावा अशी मागणी केली आहे. तर स्थानिक आमदार प्रताप सरनाईक यांनी या भागाला १०० एमएलडी पाणी दिले तरी कमी पडणार असल्याची भुमिका विषद केली आहे. त्यात आता माजी खासदार संजीव नाईक यांनी याच मुद्यावरुन महापालिका आयुक्तांची भेट घेत वाढीव पाण्याची मागणी केली आहे.

घोडबंदर भागाची लोकसंख्या सद्यस्थितीला ५ ते ७ लाखांच्या वर गेली आहे. या भागाला सध्या प्रतीदिन ११० दशलक्ष लीटर पाणी पुरवठा केला जात आहे. परंतु तो देखील अपुरा पडत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता महापालिकेने या भागाला वाढीव ५ दशलक्ष लीटर मिळावे यासाठी स्टेम प्राधिकरणाकडे पत्रव्यवहार केला आहे. यापूर्वी देखील महापालिकेने वाढीव पाण्यासाठी पत्रव्यवहार केला होता. परंतु त्याला फारसा यश आलेले दिसून आले नाही. परंतु आता महिनाभरात घोडबंदरला वाढीव ५ दशलक्ष लीटर पाणी मिळेल असे दावा पालिकेने केला आहे. परंतु पुढील महिन्यापासून उन्हाळा उजाडणार असल्याने पाणी टंचाईचे ढग आणखी तीव्र होणार आहेत. त्यामुळे हा वाढीव पाणी पुरवठा घोडबंदरकरांना मिळाला नाही तर मात्र त्यांचे आणखी हाल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाthaneठाणे