शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

लक्ष्मी नदी पात्र व इकोसेन्सेटेटिव्ह झोनमध्ये झालेला वारेमाप भराव, बांधकामाने बुडतोय घोडबंदर मार्ग 

By धीरज परब | Updated: July 29, 2023 19:43 IST

बेकायदेशीर भराव व बांधकामांमुळे ही पूरस्थिती निर्माण होत आहे . 

लोकमत न्यूज नेटवर्क, मीरारोड - केवळ मुंबई - ठाणे - पालघर जिल्हाच नव्हे तर देशभराला जोडणारा चेणे व वरसावे भागातील घोडबंदर महामार्ग हा गेल्या काही वर्षां पासून दरपावसाळ्यात पाण्यात बुडून वाहतूक बंद होण्याची नामुश्की सरकार व महापालिकेवर ओढवत आहे .  लक्ष्मी नदी पात्रा सह परिसरातील नैसर्गिक ओढे तसेच इकोसेन्सेटिव्ह क्षेत्रात झालेल्या बेकायदेशीर भराव व बांधकामां मुळे हि पूरस्थिती निर्माण होत आहे . 

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील डोंगरांच्या कुशीत वसलेल्या मीरा भाईंदर महापालिका हद्दीतील काजूपाडा , चेणे , वरसावे  हि गावे निसर्गरम्य अशी आहेत . घनदाट हिरवळ व डोंगर परिसरात वसलेल्या ह्या निसर्गरम्य परिसरावर गेल्या काही वर्षात हॉटेल व्यावसायिक , राजकारणी आदींची वक्रदृष्टी पडली आहे . आदिवासी बहुल भाग असून देखील आदिवासींच्या जमिनींवर बेकायदा बांधकामे उभी राहण्या पासून त्यांच्या जमिनी विविध गैरमार्गाने बळकावल्या जात आहेत . 

वरसावे भागात डोंगरांवरून येणारे पाणी हे खालील कांदळवन तसेच पाणथळ क्षेत्रात साचून रहायचे . येथे सरकारी तलाव भरणी करून बुझवला गेला . सीआरझेड आणि इकोसेन्सेटिव्ह क्षेत्र असून देखील या ठिकाणी वारेमाप भराव करून डोंगर फोडले , भरणी करून बांधकामे व भूखंड तयार केले गेले आहेत . नैसर्गिक ओढे नष्ट केले गेले . त्यामुळे पावसाळ्यात डोंगरावरून येणारे पाण्याचे लोंढे सामावून घेण्याचे क्षेत्रच नष्ट झाल्याने पाणी हे फाउंटन ते जुन्या टोलनाका दरम्यानच्या घोडबंदर मार्गावर मोठ्या प्रमाणात तुंबून राहते . 

काजूपाडा , चेणे भागातील परिस्थिती सुद्धा बिकट झाली असून घोडबंदर मार्गावर वाहतूक बंद करावी लागते . येथे देखील इकोसेन्सेटिव्ह व कांदळवन - सीआरझेड क्षेत्रात तसेच लक्ष्मी नदीच्या पात्र - परिसरात प्रचंड प्रमाणात बेकायदा भराव केले गेले आहेत . भराव करून अनेक हॉटेल व बांधकामे, झोपडपट्टी उभारली गेली आहेत . हे सर्व करताना नैसर्गिक ओढे - नाले बुझवले वा अरुंद केले गेले . लक्ष्मी नदी पात्रात भराव प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल होऊन न्यायालयाने देखील कार्यवाही चे आदेश दिले होते . परंतु याचिकाकर्त्याने त्याचे या भागातील जमीन व घर विकून टाकत याची मागे घेतली . 

पावसाळ्यात दरवर्षी घोडबंदर मार्ग पाणी तुंबल्याने वाहतुकीसाठी बंद होऊन लोकांना तासन तास वाहनांत अडकून पडावे लागत आहे . त्यांचे हाल होत आहेत . विशेष म्हणजे कायदे - नियमांसह न्यायालयांच्या आदेशांचे उल्लंघन होऊन बेकायदा भराव आणि बांधकामे होत असताना प्रशासनाच्या संगनमताने ठोस कारवाई होत नसल्याने घोडबंदर सारखा महत्वाचा महामार्ग पाण्याखाली जाऊन वाहतूक बंद करण्याची नामुष्की ओढवत आहे . 

येथील डोंगर फोडणे व झाडे नष्ट करणे, नैसर्गिक तसेच इकोसेन्सेटिव्ह क्षेत्र , लक्ष्मी नदी पात्र , पाणथळ , कांदळवन - सीआरझेड क्षेत्रात झालेल्या भराव व बांधकामां प्रकरणी गुन्हे दाखल करून भराव - बांधकामे काढून घेण्याची मागणी होत आहे . 

टॅग्स :thaneठाणेMira Bhayanderमीरा-भाईंदर