शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

लक्ष्मी नदी पात्र व इकोसेन्सेटेटिव्ह झोनमध्ये झालेला वारेमाप भराव, बांधकामाने बुडतोय घोडबंदर मार्ग 

By धीरज परब | Updated: July 29, 2023 19:43 IST

बेकायदेशीर भराव व बांधकामांमुळे ही पूरस्थिती निर्माण होत आहे . 

लोकमत न्यूज नेटवर्क, मीरारोड - केवळ मुंबई - ठाणे - पालघर जिल्हाच नव्हे तर देशभराला जोडणारा चेणे व वरसावे भागातील घोडबंदर महामार्ग हा गेल्या काही वर्षां पासून दरपावसाळ्यात पाण्यात बुडून वाहतूक बंद होण्याची नामुश्की सरकार व महापालिकेवर ओढवत आहे .  लक्ष्मी नदी पात्रा सह परिसरातील नैसर्गिक ओढे तसेच इकोसेन्सेटिव्ह क्षेत्रात झालेल्या बेकायदेशीर भराव व बांधकामां मुळे हि पूरस्थिती निर्माण होत आहे . 

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील डोंगरांच्या कुशीत वसलेल्या मीरा भाईंदर महापालिका हद्दीतील काजूपाडा , चेणे , वरसावे  हि गावे निसर्गरम्य अशी आहेत . घनदाट हिरवळ व डोंगर परिसरात वसलेल्या ह्या निसर्गरम्य परिसरावर गेल्या काही वर्षात हॉटेल व्यावसायिक , राजकारणी आदींची वक्रदृष्टी पडली आहे . आदिवासी बहुल भाग असून देखील आदिवासींच्या जमिनींवर बेकायदा बांधकामे उभी राहण्या पासून त्यांच्या जमिनी विविध गैरमार्गाने बळकावल्या जात आहेत . 

वरसावे भागात डोंगरांवरून येणारे पाणी हे खालील कांदळवन तसेच पाणथळ क्षेत्रात साचून रहायचे . येथे सरकारी तलाव भरणी करून बुझवला गेला . सीआरझेड आणि इकोसेन्सेटिव्ह क्षेत्र असून देखील या ठिकाणी वारेमाप भराव करून डोंगर फोडले , भरणी करून बांधकामे व भूखंड तयार केले गेले आहेत . नैसर्गिक ओढे नष्ट केले गेले . त्यामुळे पावसाळ्यात डोंगरावरून येणारे पाण्याचे लोंढे सामावून घेण्याचे क्षेत्रच नष्ट झाल्याने पाणी हे फाउंटन ते जुन्या टोलनाका दरम्यानच्या घोडबंदर मार्गावर मोठ्या प्रमाणात तुंबून राहते . 

काजूपाडा , चेणे भागातील परिस्थिती सुद्धा बिकट झाली असून घोडबंदर मार्गावर वाहतूक बंद करावी लागते . येथे देखील इकोसेन्सेटिव्ह व कांदळवन - सीआरझेड क्षेत्रात तसेच लक्ष्मी नदीच्या पात्र - परिसरात प्रचंड प्रमाणात बेकायदा भराव केले गेले आहेत . भराव करून अनेक हॉटेल व बांधकामे, झोपडपट्टी उभारली गेली आहेत . हे सर्व करताना नैसर्गिक ओढे - नाले बुझवले वा अरुंद केले गेले . लक्ष्मी नदी पात्रात भराव प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल होऊन न्यायालयाने देखील कार्यवाही चे आदेश दिले होते . परंतु याचिकाकर्त्याने त्याचे या भागातील जमीन व घर विकून टाकत याची मागे घेतली . 

पावसाळ्यात दरवर्षी घोडबंदर मार्ग पाणी तुंबल्याने वाहतुकीसाठी बंद होऊन लोकांना तासन तास वाहनांत अडकून पडावे लागत आहे . त्यांचे हाल होत आहेत . विशेष म्हणजे कायदे - नियमांसह न्यायालयांच्या आदेशांचे उल्लंघन होऊन बेकायदा भराव आणि बांधकामे होत असताना प्रशासनाच्या संगनमताने ठोस कारवाई होत नसल्याने घोडबंदर सारखा महत्वाचा महामार्ग पाण्याखाली जाऊन वाहतूक बंद करण्याची नामुष्की ओढवत आहे . 

येथील डोंगर फोडणे व झाडे नष्ट करणे, नैसर्गिक तसेच इकोसेन्सेटिव्ह क्षेत्र , लक्ष्मी नदी पात्र , पाणथळ , कांदळवन - सीआरझेड क्षेत्रात झालेल्या भराव व बांधकामां प्रकरणी गुन्हे दाखल करून भराव - बांधकामे काढून घेण्याची मागणी होत आहे . 

टॅग्स :thaneठाणेMira Bhayanderमीरा-भाईंदर