शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

लक्ष्मी नदी पात्र व इकोसेन्सेटेटिव्ह झोनमध्ये झालेला वारेमाप भराव, बांधकामाने बुडतोय घोडबंदर मार्ग 

By धीरज परब | Updated: July 29, 2023 19:43 IST

बेकायदेशीर भराव व बांधकामांमुळे ही पूरस्थिती निर्माण होत आहे . 

लोकमत न्यूज नेटवर्क, मीरारोड - केवळ मुंबई - ठाणे - पालघर जिल्हाच नव्हे तर देशभराला जोडणारा चेणे व वरसावे भागातील घोडबंदर महामार्ग हा गेल्या काही वर्षां पासून दरपावसाळ्यात पाण्यात बुडून वाहतूक बंद होण्याची नामुश्की सरकार व महापालिकेवर ओढवत आहे .  लक्ष्मी नदी पात्रा सह परिसरातील नैसर्गिक ओढे तसेच इकोसेन्सेटिव्ह क्षेत्रात झालेल्या बेकायदेशीर भराव व बांधकामां मुळे हि पूरस्थिती निर्माण होत आहे . 

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील डोंगरांच्या कुशीत वसलेल्या मीरा भाईंदर महापालिका हद्दीतील काजूपाडा , चेणे , वरसावे  हि गावे निसर्गरम्य अशी आहेत . घनदाट हिरवळ व डोंगर परिसरात वसलेल्या ह्या निसर्गरम्य परिसरावर गेल्या काही वर्षात हॉटेल व्यावसायिक , राजकारणी आदींची वक्रदृष्टी पडली आहे . आदिवासी बहुल भाग असून देखील आदिवासींच्या जमिनींवर बेकायदा बांधकामे उभी राहण्या पासून त्यांच्या जमिनी विविध गैरमार्गाने बळकावल्या जात आहेत . 

वरसावे भागात डोंगरांवरून येणारे पाणी हे खालील कांदळवन तसेच पाणथळ क्षेत्रात साचून रहायचे . येथे सरकारी तलाव भरणी करून बुझवला गेला . सीआरझेड आणि इकोसेन्सेटिव्ह क्षेत्र असून देखील या ठिकाणी वारेमाप भराव करून डोंगर फोडले , भरणी करून बांधकामे व भूखंड तयार केले गेले आहेत . नैसर्गिक ओढे नष्ट केले गेले . त्यामुळे पावसाळ्यात डोंगरावरून येणारे पाण्याचे लोंढे सामावून घेण्याचे क्षेत्रच नष्ट झाल्याने पाणी हे फाउंटन ते जुन्या टोलनाका दरम्यानच्या घोडबंदर मार्गावर मोठ्या प्रमाणात तुंबून राहते . 

काजूपाडा , चेणे भागातील परिस्थिती सुद्धा बिकट झाली असून घोडबंदर मार्गावर वाहतूक बंद करावी लागते . येथे देखील इकोसेन्सेटिव्ह व कांदळवन - सीआरझेड क्षेत्रात तसेच लक्ष्मी नदीच्या पात्र - परिसरात प्रचंड प्रमाणात बेकायदा भराव केले गेले आहेत . भराव करून अनेक हॉटेल व बांधकामे, झोपडपट्टी उभारली गेली आहेत . हे सर्व करताना नैसर्गिक ओढे - नाले बुझवले वा अरुंद केले गेले . लक्ष्मी नदी पात्रात भराव प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल होऊन न्यायालयाने देखील कार्यवाही चे आदेश दिले होते . परंतु याचिकाकर्त्याने त्याचे या भागातील जमीन व घर विकून टाकत याची मागे घेतली . 

पावसाळ्यात दरवर्षी घोडबंदर मार्ग पाणी तुंबल्याने वाहतुकीसाठी बंद होऊन लोकांना तासन तास वाहनांत अडकून पडावे लागत आहे . त्यांचे हाल होत आहेत . विशेष म्हणजे कायदे - नियमांसह न्यायालयांच्या आदेशांचे उल्लंघन होऊन बेकायदा भराव आणि बांधकामे होत असताना प्रशासनाच्या संगनमताने ठोस कारवाई होत नसल्याने घोडबंदर सारखा महत्वाचा महामार्ग पाण्याखाली जाऊन वाहतूक बंद करण्याची नामुष्की ओढवत आहे . 

येथील डोंगर फोडणे व झाडे नष्ट करणे, नैसर्गिक तसेच इकोसेन्सेटिव्ह क्षेत्र , लक्ष्मी नदी पात्र , पाणथळ , कांदळवन - सीआरझेड क्षेत्रात झालेल्या भराव व बांधकामां प्रकरणी गुन्हे दाखल करून भराव - बांधकामे काढून घेण्याची मागणी होत आहे . 

टॅग्स :thaneठाणेMira Bhayanderमीरा-भाईंदर