शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
2
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
3
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
4
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
5
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
6
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
7
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
8
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
9
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
10
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
11
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश
12
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
13
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो?
14
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
15
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
16
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
17
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
18
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
19
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
20
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही

पाठिंबा मिळाला, पण मते मिळतील?, मनसेकडून प्रचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2019 01:22 IST

लोकसभा निवडणुकीसाठी कल्याण मतदारसंघात राष्ट्रवादीला मनसेची साथ लाभल्याचे चित्र दिसत असले तरी मनसेचे मतदार राष्ट्रवादी उमेदवाराच्या पारड्यात मतांचे दान टाकतील का, याबाबत मात्र साशंकता आहे.

कल्याण : लोकसभा निवडणुकीसाठी कल्याण मतदारसंघात राष्ट्रवादीला मनसेची साथ लाभल्याचे चित्र दिसत असले तरी मनसेचे मतदार राष्ट्रवादी उमेदवाराच्या पारड्यात मतांचे दान टाकतील का, याबाबत मात्र साशंकता आहे. या मतदारसंघात मनसेची सव्वा लाखाच्या आसपास मते आहेत. नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना विरोध म्हणून राष्ट्रवादीसाठी मनसे प्रचारात उतरली असली तरी मतदारांचे मन वळवण्यात मनसेचे पदाधिकारी यशस्वी होतील का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.कल्याण लोकसभा मतदारसंघात २००९ आणि २०१४ च्या दोन्ही निवडणुका मनसेने लढवल्या होत्या. त्यात मनसेला तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली असली तरी या मतदारसंघात सव्वा लाखाच्या आसपास मनसेची मते आहेत. २०१४ च्या निवडणुकीत डोंबिवली आणि कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघांतून अनुक्रमे २६ हजार ५३९ आणि ३१ हजार ४८४ मते मनसेच्या उमेदवाराला मिळाली होती. कल्याण पूर्व आणि अंबरनाथ मतदारसंघातही २१ हजारांच्या आसपास मते मिळाली होती. या मतदारसंघातील प्रमुख शहरी भाग असलेल्या कल्याण आणि डोंबिवलीत मनसेचे १० नगरसेवक आहेत. त्यातील बहुतांश नगरसेवक डोंबिवलीतून निवडून गेले आहेत. त्यामुळे मनसेला मानणारा मतदार डोंबिवलीत आहे, हे नाकारून चालणार नाही. मोदी आणि शहांविरोधात सुरू असलेल्या प्रचारात याच मतदारसंघातील मनसेच्या काही पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीला साथ दिल्याचे सोमवारच्या आघाडीच्या बैठकीतून स्पष्ट झाले आहे. आतापर्यंत आघाडी आणि पाठिंबा देणाºया पक्षांच्या दोन बैठका झाल्या आहेत. मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष तथा डोंबिवली शहराध्यक्ष राजेश कदम मात्र या बैठकांपासून अलिप्त राहिले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीला पाठिंबा देण्यावरून मनसेत दोन गट पडले.

दरम्यान, राष्ट्रवादीला मनसेच्या काही पदाधिकाºयांनी साथ दिली असली तरी उमेदवार बाबाजी पाटील यांना मनसेचे मतदार स्वीकारतील का, याबाबत मात्र प्रश्नचिन्ह आहे. पाटील यांच्या समर्थकांकडून भूमिपुत्राचा नारा दिला जात आहे. त्यात, नुकत्याच पार पडलेल्या आगरी-कोळी भूमिपुत्र महासंघाच्या बैठकीत पाटील यांना पाठिंबा दिला आहे. पुरोगामी विचारसरणी असलेल्या राष्ट्रवादीसारख्या पक्षातच जातीच्या आधारावर मागितला जात असलेला मतांचा जोगवा चर्चेचा विषय ठरला असताना कल्याण-डोंबिवलीतील मनसेचा मतदार राष्ट्रवादीला साथ देतो का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
>मोदी आणि शहा यांना विरोध करा, असे आवाहन राज ठाकरे यांनी केले आहे. हे जर पुन्हा निवडून आले, तर सध्याची निवडणूक ही शेवटची ठरेल. पुढे आपल्याला हुकूमशाहीला सामोरे जावे लागेल. गेल्या पाच वर्षांतील भाजपचा कारभार पाहता नागरिक नाराज असून ठाकरे यांनी केलेल्या आवाहनाला मतदार नक्कीच साथ देतील. त्याचा फायदा राष्ट्रवादीच्या बाबाजी पाटील यांना होईल, यात शंका नाही.- प्रल्हाद म्हात्रे, डोंबिवली शहरसंघटक, मनसे

टॅग्स :MNSमनसेMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019kalyan-pcकल्याण