शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

पाठिंबा मिळाला, पण मते मिळतील?, मनसेकडून प्रचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2019 01:22 IST

लोकसभा निवडणुकीसाठी कल्याण मतदारसंघात राष्ट्रवादीला मनसेची साथ लाभल्याचे चित्र दिसत असले तरी मनसेचे मतदार राष्ट्रवादी उमेदवाराच्या पारड्यात मतांचे दान टाकतील का, याबाबत मात्र साशंकता आहे.

कल्याण : लोकसभा निवडणुकीसाठी कल्याण मतदारसंघात राष्ट्रवादीला मनसेची साथ लाभल्याचे चित्र दिसत असले तरी मनसेचे मतदार राष्ट्रवादी उमेदवाराच्या पारड्यात मतांचे दान टाकतील का, याबाबत मात्र साशंकता आहे. या मतदारसंघात मनसेची सव्वा लाखाच्या आसपास मते आहेत. नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना विरोध म्हणून राष्ट्रवादीसाठी मनसे प्रचारात उतरली असली तरी मतदारांचे मन वळवण्यात मनसेचे पदाधिकारी यशस्वी होतील का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.कल्याण लोकसभा मतदारसंघात २००९ आणि २०१४ च्या दोन्ही निवडणुका मनसेने लढवल्या होत्या. त्यात मनसेला तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली असली तरी या मतदारसंघात सव्वा लाखाच्या आसपास मनसेची मते आहेत. २०१४ च्या निवडणुकीत डोंबिवली आणि कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघांतून अनुक्रमे २६ हजार ५३९ आणि ३१ हजार ४८४ मते मनसेच्या उमेदवाराला मिळाली होती. कल्याण पूर्व आणि अंबरनाथ मतदारसंघातही २१ हजारांच्या आसपास मते मिळाली होती. या मतदारसंघातील प्रमुख शहरी भाग असलेल्या कल्याण आणि डोंबिवलीत मनसेचे १० नगरसेवक आहेत. त्यातील बहुतांश नगरसेवक डोंबिवलीतून निवडून गेले आहेत. त्यामुळे मनसेला मानणारा मतदार डोंबिवलीत आहे, हे नाकारून चालणार नाही. मोदी आणि शहांविरोधात सुरू असलेल्या प्रचारात याच मतदारसंघातील मनसेच्या काही पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीला साथ दिल्याचे सोमवारच्या आघाडीच्या बैठकीतून स्पष्ट झाले आहे. आतापर्यंत आघाडी आणि पाठिंबा देणाºया पक्षांच्या दोन बैठका झाल्या आहेत. मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष तथा डोंबिवली शहराध्यक्ष राजेश कदम मात्र या बैठकांपासून अलिप्त राहिले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीला पाठिंबा देण्यावरून मनसेत दोन गट पडले.

दरम्यान, राष्ट्रवादीला मनसेच्या काही पदाधिकाºयांनी साथ दिली असली तरी उमेदवार बाबाजी पाटील यांना मनसेचे मतदार स्वीकारतील का, याबाबत मात्र प्रश्नचिन्ह आहे. पाटील यांच्या समर्थकांकडून भूमिपुत्राचा नारा दिला जात आहे. त्यात, नुकत्याच पार पडलेल्या आगरी-कोळी भूमिपुत्र महासंघाच्या बैठकीत पाटील यांना पाठिंबा दिला आहे. पुरोगामी विचारसरणी असलेल्या राष्ट्रवादीसारख्या पक्षातच जातीच्या आधारावर मागितला जात असलेला मतांचा जोगवा चर्चेचा विषय ठरला असताना कल्याण-डोंबिवलीतील मनसेचा मतदार राष्ट्रवादीला साथ देतो का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
>मोदी आणि शहा यांना विरोध करा, असे आवाहन राज ठाकरे यांनी केले आहे. हे जर पुन्हा निवडून आले, तर सध्याची निवडणूक ही शेवटची ठरेल. पुढे आपल्याला हुकूमशाहीला सामोरे जावे लागेल. गेल्या पाच वर्षांतील भाजपचा कारभार पाहता नागरिक नाराज असून ठाकरे यांनी केलेल्या आवाहनाला मतदार नक्कीच साथ देतील. त्याचा फायदा राष्ट्रवादीच्या बाबाजी पाटील यांना होईल, यात शंका नाही.- प्रल्हाद म्हात्रे, डोंबिवली शहरसंघटक, मनसे

टॅग्स :MNSमनसेMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019kalyan-pcकल्याण