शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

उल्हासनगरातील जीन्स कंपन्यांच्या बाबत तोडगा काढा, खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांचे राज्य सरकारला साकडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2017 20:23 IST

उल्हासनगर येथील जीन्स कंपन्यांच्या संदर्भात तातडीने तोडगा काढण्याची मागणी कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि आमदार डॉ. बालाजी किणिकर यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे, उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्याकडे केली आहे.

ठाणे - उल्हासनगर येथील जीन्स कंपन्यांच्या संदर्भात तातडीने तोडगा काढण्याची मागणी कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि आमदार डॉ. बालाजी किणिकर यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे, उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्याकडे केली आहे. तसेच, पालकमंत्री शिंदे यांनी मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीतही हा मुद्दा उपस्थित करून तातडीने निर्णय घेण्याची गरज व्यक्त केली असता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पर्यावरण खाते, प्रदूषण नियंत्रण मंडळ, एमआयडीसी यांचे सचिव आणि ठाण्याचे जिल्हाधिकारी यांची बैठक आयोजित करून तोडगा काढण्याचे निर्देश मुख्य सचिवांना दिले.

उल्हासनगर येथील जीन्स कारखान्यांमुळे वालधुनी आणि उल्हास या नद्यांचे होत असलेले प्रदूषण आणि हे कारखाने बंद होण्यामुळे सुमारे अडिल लाख लोकांवर कोसळणारी बेरोजगारीची कुऱ्हाड या दोन्हीचा विचार करून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा अवमान होणार नाही, अशा प्रकारे या प्रश्नातून तोडगा काढण्याची मागणी खा. डॉ. शिंदे आणि आमदार डॉ. किणिकर यांनी केली. खा. डॉ. शिंदे यांच्या विनंतीनुसार उद्योगमंत्री  देसाई आणि पर्यावरण मंत्री कदम यांच्या मंत्रालयातील दालनांत मंगळवारी दोन स्वतंत्र बैठकांचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत विविध पर्यायांवर चर्चा करण्यात आली. जीन्स कारखान्यांच्या वॉशिंग युनिट्सनाअॅडिशनल अंबरनाथ एमआयडीसीमध्ये जागा उपलब्ध करून देणे, या युनिट्समधील सांडपाण्यावर तेथील सीईटीपीमध्ये प्रक्रिया करणे, ज्या ठिकाणी जीन्स कारखाने मोठ्या संख्येने आहेत, तिथे कारखान्यांचे गट करून त्यांच्यासाठी ईटीपी उभारणे आदी पर्यायांची चाचपणी करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. राज्य शासन याबाबत सकारात्मक असल्याचे  देसाई आणि कदम यांनी स्पष्ट केले.

या बैठकीला पालकमंत्री एकनाथ शिंदे, आमदार डॉ. बालाजी किणिकर, उल्हासनगर महानगरपालिकेचे आयुक्त राजेंद्र निंबाळकर, पर्यावरण विभागाचे अप्पर मुख्य सचिव गवई, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव डॉ. अल्बनगण, उल्हासनगर जीन्स वॉश वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष परशुराम पाटील, ‘आमा’चे अध्यक्ष उमेश तायडे, औद्योगिक विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र केंद्रे,अॅडिशनल अंबरनाथ मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे (आमा) अध्यक्ष उमेश तायडे, तसेच ‘एमआयडीसी’ आणि‘एमपीसीबी’चे अधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :Ramdas Kadamरामदास कदमBJPभाजपाulhasnagarउल्हासनगर