शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

सिनेसृष्टीला जीएसटीच्या जाचातून सोडवा - अभिनेते मंगेश देसाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2017 06:47 IST

१८ टक्के जीएसटी लागल्याने मराठी चित्रपटांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. गेल्या काही महिन्यात जीएसटीच्या अनेक जाचक अटी बदलल्या. फेररचना झाली, पण चित्रपटसृष्टीवरील

अंबरनाथ : १८ टक्के जीएसटी लागल्याने मराठी चित्रपटांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. गेल्या काही महिन्यात जीएसटीच्या अनेक जाचक अटी बदलल्या. फेररचना झाली, पण चित्रपटसृष्टीवरील जीएसटी कमी झाला नाही. तो शासनाने कमी करावा, असे आवाहन अभिनेते मंगेश देसाई यांनी रविवारी संध्याकाळी अंबरनाथ मराठी चित्रपट महोत्सवाच्या पारितोषिक वितरण सोहळ््यात केले.अंबर भरारी आणि अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळातर्फे आयोजित तिसºया अंबरनाथ चित्रपट महोत्सवातील पारितोषिक वितरण सोहळ््याप्रसंगी ते बोलत होते. वेगळे विषय ताकदीने मांडून सध्याच्या मराठी चित्रपटांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर वेगळा ठसा उमटविला असला, तरी अजूनही महाराष्ट्रात सिनेमांना थिएटर मिळणे अवघड बनले आहे. अनेक चांगले मराठी चित्रपट केवळ थिएटर मिळत नसल्याने प्रेक्षकांपर्यंत पोहोचू शकत नाहीत. त्यात जीएसटीने अडचणीत वाढ झाली आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.सुप्रसिद्ध सतारवादक भूपाल पणशीकर यांच्या सादरीकरणाने महोत्सवाची सुरूवात झाली. त्यानंतर नर्तक रमेश कोळी आणि त्यांच्या विद्यार्थ्यांनी समूह नृत्ये सादर केली.महोत्सवात ‘कॉपी’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट म्हणून गौरविले गेले. खा. डॉ. श्रीकांत शिंदे, महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, आ. डॉ. बालाजी किणीकर, नगराध्यक्षा मनीषा वाळेकर, शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, शहरप्रमुख अरविंद वाळेकर आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते. माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी, महेंद्र पाटील, जगदीश हडप, गिरीश पंडित, डॉ. राहुल चौधरी, डॉ. कुणाल चौधरी, अभय शिंदे आदींनी महोत्सवाच्या आयोजनात पुढाकार घेतला.ज्येष्ठ अभिनेते विजय चव्हाण यांना यंदाचा जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. तब्येत बरी नसतानाही विजय चव्हाण हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी हजर होते. आपल्या मनोगतात त्यांनी समस्त रसिकांचे आभार मानले. दिवंगत अभिनेते आनंद अभ्यंकर यांना विशेष स्मृती पुरस्कार देण्यात आला.ज्येष्ठ सिनेपत्रकार दिलीप ठाकूर यांचाही यावेळी गौरव करण्यात आला. अभिनेते संतोष जुवेकर, सुनील तावडे, अभिनेत्री प्रेमाकिरण, प्रिया गमरे, विशाखा सुभेदार, दिग्दर्शक गिरीश मोहिते, अजित शिरोळे आदी मान्यवर उपस्थित होते.अंबरनाथसारख्या शहरात मराठी चित्रपट महोत्सव भरवून गुणवंतांना पारितोषिके देण्याचा हा उपक्र म स्तुत्य असल्याचे अनेक कलावंतांनी नमूद केले. अमेय रानडे आणि अभिनेत्री इरावती लागू यांनी सूत्रसंचालन केले.

टॅग्स :marathiमराठीcinemaसिनेमा