शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

कचरावाहू वाहनांचा थेट भिवंडी मनपा मुख्यालयालाच विळखा

By नितीन पंडित | Updated: December 7, 2022 18:25 IST

भिवंडी महापालिकेची कचरा-कोंडी

नितीन पंडित, लोकमत न्यूज नेटवर्क, भिवंडी: शहर महानगरपालिकेत कचरा कोंडीची समस्या नेहमीचीच बाब झाली असून बुधवारी चावींद्रा येथील डम्पिंग ग्राउंडवर कचरा मोठ्या प्रमाणात साचल्याने सकाळपासून डंपिंग ग्राउंडवर कचरा टाकण्यासाठी गेलेल्या वाहनांची लांबच लांब रांग लागली होती.या कचरावाहू वाहनांच्या रांगा लागल्याने परिसरात मोठी दुर्गंधी पसरली होती.या दुर्गंधीने स्थानिक नागरिक हैराण झाले होते.सकाळपासून डंपिंगग्राऊंडवर झालेल्या कचरा कोंडीच्या दुर्गंधीमुळे हैराण झालेल्या नागरिकांनी सायंकाळी अखेर रांगेत उभे असलेल्या कचरा वाहू वाहनांना अक्षरशः पिटाळून लावले.त्यामुळे भयभीत झालेल्या कचरा वाहू वाहन चालकांनी आपली कचरा भरलेली वाहने थेट मनपा मुख्यालयासमोर उभी केली.

कचरा वाहू वाहने मनपा मुख्यालयासमोर उभी राहिल्याने मुख्यालय परिसरात एकच गोंधळ उडाला होता.त्यातच या कचरा भरलेल्या वाहनांमुळे मनपा मुख्यालय परिसरात मोठी दुर्गंधी पसरली होती.त्यामुळे प्रवाशांसह मनपा मुख्यालयात कामासाठी येणाऱ्या अभ्यंगतांना नाक मुठीत धरूनच मुख्यालय प्रवेश करण्याची नामुष्की ओढवली होती.

भिवंडी महापालिका हद्दीत कचराकोंडीची समस्या नित्याची बाब झाली असल्याने शहरात स्वच्छ भारत अभियानाचादेखील बोजवारा उडाला असल्याचे चित्र आज समोर आले आहे. डंपिंग ग्राऊंडवर काही समस्या निर्माण झाल्याने कचरा वाहू वाहने मनपा मुख्यालयासमोर आली असून चावींद्रा डंपिंग ग्राऊंड परिसरातील नागरिकांची बैठक घेऊन लवकरच हि समस्या सुटेल अशी प्रतिक्रिया मनपा उपायुक्त दीपक झिंजाड यांनी दिली आहे.

 

टॅग्स :BhiwandiभिवंडीGarbage Disposal Issueकचरा प्रश्न