शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
2
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
3
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
4
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
5
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
6
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
7
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
8
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
9
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
10
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
11
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
12
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
13
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
14
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
15
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी कर्णधार सूर्याने टीम इंडियाला दिला असा सल्ला, म्हणाला फोन बंद करा आणि...  
16
Scuba Diving : १०, २० की ३० मीटर? पाण्यात नेमके किती खोलवर जातात स्कूबा डायव्हर्स?
17
Navratri 2025: नवरात्रीत का घ्यावा सात्त्विक आहार? त्यामुळे शरीराला कोणते लाभ होतात?
18
VIDEO: माकडाने अचानक महिलेच्या डोक्यावरून हिसकावला गॉगल.. पुढे जे झालं ते पाहून व्हाल थक्क
19
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
20
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!

गणेशोत्सवातून जगण्याची ऊर्जा मिळते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2019 23:30 IST

माझा जन्म घाटकोपरचा, पण बालपण भांडुपमध्ये गेले. चौथी इयत्तेत असताना भांडुपला राहायला आलो.

संदीप सामंतमाझा जन्म घाटकोपरचा, पण बालपण भांडुपमध्ये गेले. चौथी इयत्तेत असताना भांडुपला राहायला आलो. समाजकार्याचे वेड लहानपणापासूनच होते. आईवडील आणि मामांकडून समाजकार्याचा वसा मिळाला. वडील प्रभाकर सामंत यांची आयुर्वेद औषधांची फॅक्टरी होती तसेच ते एका औषधांच्या कंपनीत कामालादेखील होते. कामावरून घरी आल्यावर परिसरातील गरजू लोकांच्या वैद्यकीय मदतीला ते धावून जात. आई सुहासिनी गृहिणी होती. तिचाही वडिलांच्या समाजकार्याला हातभार लागायचा. आमच्या सुर्वे निवास चाळीच्या समोरच उत्कर्षनगर विकास मंडळाचा गणेशोत्सव साजरा व्हायचा. गणेशोत्सवासह होळी, महाशिवरात्र, गोकुळाष्टमी, शिवजयंती आदी उत्सव साजरे व्हायचे, पण गणेशोत्सव ११ दिवस साजरा होत असल्याने या सणाचे विशेष आकर्षण असायचे. मंडळाचे कबड्डी पथक होते, त्या पथकाचा मोठा नावलौकिक होता. मला आधीच सामाजिक कार्याची ओढ होती. पाचवीपासूनच मंडळाचे काम सुरू केले. त्यावेळी छोटा कार्यकर्ता म्हणून खारीचा वाटा उचलला. तेव्हा चलचित्रांना विशेष महत्त्व होते. कालांतराने १९९० साली डोंबिवलीत राहायला आलो. मुंबईत गणेशोत्सवाची धामधूम वेगळीच असायची. त्यामुळे डोंबिवलीत आल्यावर पहिल्या वर्षी गणपती कधी आले आणि कधी गेले, हे कळलेच नाही. हळूहळू मुंबईवरून कोकणातील बरीच मंडळी डोंबिवलीत वास्तव्याला आली आणि मुंबईच्या गणेशोत्सवाची झलक पाहायला मिळाली. डोंबिवलीत कार्यकर्ता म्हणून अचानक मित्र मंडळाच्या गणेशोत्सवापासून सुरुवात झाली. पश्चिमेतील हे एकमेव मंडळ ज्याठिकाणी गणपतीचे दर्शन खुले ठेवण्यात येते. त्यानंतर, भरत भोईरनगरमधील शिवराज मित्र मंडळात सक्रिय झालो. आज या मंडळाचे चोविसावे वर्ष आहे. तसेच शिवराज मित्र मंडळाने लहान मुले, तरुणांना व्यासपीठ मिळवून दिले. माघी गणेशोत्सव साजरा करणाऱ्या श्री साईनाथ मित्र मंडळाचा कार्यकर्ता म्हणूनही कार्यरत आहे. ‘समाजाचे आपण काही देणे लागतो’ या उक्तीनुसार शैक्षणिक आणि आरोग्य शिबिरासारख्या कार्यक्रमांमधून सामाजिक कार्याचा वसा जपता येतो, हे देखील तितकेच खरे.(कार्यकर्ता, शिवराज गणेशोत्सव मित्र मंडळ, डोंबिवली)- शब्दांकन : प्रशांत मानेआपल्या रूढी, प्रथा, परंपरा सणांमधून जपल्या जातात. अनेकतेतून एकतेचे रूप सणांच्या माध्यमातून पाहायला मिळते आणि खूप नवनवीन गोष्टी शिकायला मिळतात. सण कुठलाही असो, त्याचे महत्त्व फार मोठे असते. दरवर्षी साजरा होणारा भाद्रपद महिन्यातील गणेशोत्सव असो अथवा माघी गणपतीचा उत्सव, याला जीवनात अनन्यसाधारण महत्त्व आहे. या उत्सवातून कलागुणांना वाव मिळण्याबरोबरच वर्षभरातील ऊर्जा मिळत असते. वयाच्या नवव्या वर्षापासून मुंबई असो अथवा डोंबिवलीतील गणेश मंडळांच्या माध्यमातून जी नाळ जोडली, ती आज वयाची पन्नाशी उलटून गेली तरी कायम राहिली आहे.

टॅग्स :thaneठाणेGanesh Mandal 2019गणेश मंडळ 2019