शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

गणेशोत्सवातून जगण्याची ऊर्जा मिळते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2019 23:30 IST

माझा जन्म घाटकोपरचा, पण बालपण भांडुपमध्ये गेले. चौथी इयत्तेत असताना भांडुपला राहायला आलो.

संदीप सामंतमाझा जन्म घाटकोपरचा, पण बालपण भांडुपमध्ये गेले. चौथी इयत्तेत असताना भांडुपला राहायला आलो. समाजकार्याचे वेड लहानपणापासूनच होते. आईवडील आणि मामांकडून समाजकार्याचा वसा मिळाला. वडील प्रभाकर सामंत यांची आयुर्वेद औषधांची फॅक्टरी होती तसेच ते एका औषधांच्या कंपनीत कामालादेखील होते. कामावरून घरी आल्यावर परिसरातील गरजू लोकांच्या वैद्यकीय मदतीला ते धावून जात. आई सुहासिनी गृहिणी होती. तिचाही वडिलांच्या समाजकार्याला हातभार लागायचा. आमच्या सुर्वे निवास चाळीच्या समोरच उत्कर्षनगर विकास मंडळाचा गणेशोत्सव साजरा व्हायचा. गणेशोत्सवासह होळी, महाशिवरात्र, गोकुळाष्टमी, शिवजयंती आदी उत्सव साजरे व्हायचे, पण गणेशोत्सव ११ दिवस साजरा होत असल्याने या सणाचे विशेष आकर्षण असायचे. मंडळाचे कबड्डी पथक होते, त्या पथकाचा मोठा नावलौकिक होता. मला आधीच सामाजिक कार्याची ओढ होती. पाचवीपासूनच मंडळाचे काम सुरू केले. त्यावेळी छोटा कार्यकर्ता म्हणून खारीचा वाटा उचलला. तेव्हा चलचित्रांना विशेष महत्त्व होते. कालांतराने १९९० साली डोंबिवलीत राहायला आलो. मुंबईत गणेशोत्सवाची धामधूम वेगळीच असायची. त्यामुळे डोंबिवलीत आल्यावर पहिल्या वर्षी गणपती कधी आले आणि कधी गेले, हे कळलेच नाही. हळूहळू मुंबईवरून कोकणातील बरीच मंडळी डोंबिवलीत वास्तव्याला आली आणि मुंबईच्या गणेशोत्सवाची झलक पाहायला मिळाली. डोंबिवलीत कार्यकर्ता म्हणून अचानक मित्र मंडळाच्या गणेशोत्सवापासून सुरुवात झाली. पश्चिमेतील हे एकमेव मंडळ ज्याठिकाणी गणपतीचे दर्शन खुले ठेवण्यात येते. त्यानंतर, भरत भोईरनगरमधील शिवराज मित्र मंडळात सक्रिय झालो. आज या मंडळाचे चोविसावे वर्ष आहे. तसेच शिवराज मित्र मंडळाने लहान मुले, तरुणांना व्यासपीठ मिळवून दिले. माघी गणेशोत्सव साजरा करणाऱ्या श्री साईनाथ मित्र मंडळाचा कार्यकर्ता म्हणूनही कार्यरत आहे. ‘समाजाचे आपण काही देणे लागतो’ या उक्तीनुसार शैक्षणिक आणि आरोग्य शिबिरासारख्या कार्यक्रमांमधून सामाजिक कार्याचा वसा जपता येतो, हे देखील तितकेच खरे.(कार्यकर्ता, शिवराज गणेशोत्सव मित्र मंडळ, डोंबिवली)- शब्दांकन : प्रशांत मानेआपल्या रूढी, प्रथा, परंपरा सणांमधून जपल्या जातात. अनेकतेतून एकतेचे रूप सणांच्या माध्यमातून पाहायला मिळते आणि खूप नवनवीन गोष्टी शिकायला मिळतात. सण कुठलाही असो, त्याचे महत्त्व फार मोठे असते. दरवर्षी साजरा होणारा भाद्रपद महिन्यातील गणेशोत्सव असो अथवा माघी गणपतीचा उत्सव, याला जीवनात अनन्यसाधारण महत्त्व आहे. या उत्सवातून कलागुणांना वाव मिळण्याबरोबरच वर्षभरातील ऊर्जा मिळत असते. वयाच्या नवव्या वर्षापासून मुंबई असो अथवा डोंबिवलीतील गणेश मंडळांच्या माध्यमातून जी नाळ जोडली, ती आज वयाची पन्नाशी उलटून गेली तरी कायम राहिली आहे.

टॅग्स :thaneठाणेGanesh Mandal 2019गणेश मंडळ 2019