शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

गणेशोत्सवातून जगण्याची ऊर्जा मिळते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2019 23:30 IST

माझा जन्म घाटकोपरचा, पण बालपण भांडुपमध्ये गेले. चौथी इयत्तेत असताना भांडुपला राहायला आलो.

संदीप सामंतमाझा जन्म घाटकोपरचा, पण बालपण भांडुपमध्ये गेले. चौथी इयत्तेत असताना भांडुपला राहायला आलो. समाजकार्याचे वेड लहानपणापासूनच होते. आईवडील आणि मामांकडून समाजकार्याचा वसा मिळाला. वडील प्रभाकर सामंत यांची आयुर्वेद औषधांची फॅक्टरी होती तसेच ते एका औषधांच्या कंपनीत कामालादेखील होते. कामावरून घरी आल्यावर परिसरातील गरजू लोकांच्या वैद्यकीय मदतीला ते धावून जात. आई सुहासिनी गृहिणी होती. तिचाही वडिलांच्या समाजकार्याला हातभार लागायचा. आमच्या सुर्वे निवास चाळीच्या समोरच उत्कर्षनगर विकास मंडळाचा गणेशोत्सव साजरा व्हायचा. गणेशोत्सवासह होळी, महाशिवरात्र, गोकुळाष्टमी, शिवजयंती आदी उत्सव साजरे व्हायचे, पण गणेशोत्सव ११ दिवस साजरा होत असल्याने या सणाचे विशेष आकर्षण असायचे. मंडळाचे कबड्डी पथक होते, त्या पथकाचा मोठा नावलौकिक होता. मला आधीच सामाजिक कार्याची ओढ होती. पाचवीपासूनच मंडळाचे काम सुरू केले. त्यावेळी छोटा कार्यकर्ता म्हणून खारीचा वाटा उचलला. तेव्हा चलचित्रांना विशेष महत्त्व होते. कालांतराने १९९० साली डोंबिवलीत राहायला आलो. मुंबईत गणेशोत्सवाची धामधूम वेगळीच असायची. त्यामुळे डोंबिवलीत आल्यावर पहिल्या वर्षी गणपती कधी आले आणि कधी गेले, हे कळलेच नाही. हळूहळू मुंबईवरून कोकणातील बरीच मंडळी डोंबिवलीत वास्तव्याला आली आणि मुंबईच्या गणेशोत्सवाची झलक पाहायला मिळाली. डोंबिवलीत कार्यकर्ता म्हणून अचानक मित्र मंडळाच्या गणेशोत्सवापासून सुरुवात झाली. पश्चिमेतील हे एकमेव मंडळ ज्याठिकाणी गणपतीचे दर्शन खुले ठेवण्यात येते. त्यानंतर, भरत भोईरनगरमधील शिवराज मित्र मंडळात सक्रिय झालो. आज या मंडळाचे चोविसावे वर्ष आहे. तसेच शिवराज मित्र मंडळाने लहान मुले, तरुणांना व्यासपीठ मिळवून दिले. माघी गणेशोत्सव साजरा करणाऱ्या श्री साईनाथ मित्र मंडळाचा कार्यकर्ता म्हणूनही कार्यरत आहे. ‘समाजाचे आपण काही देणे लागतो’ या उक्तीनुसार शैक्षणिक आणि आरोग्य शिबिरासारख्या कार्यक्रमांमधून सामाजिक कार्याचा वसा जपता येतो, हे देखील तितकेच खरे.(कार्यकर्ता, शिवराज गणेशोत्सव मित्र मंडळ, डोंबिवली)- शब्दांकन : प्रशांत मानेआपल्या रूढी, प्रथा, परंपरा सणांमधून जपल्या जातात. अनेकतेतून एकतेचे रूप सणांच्या माध्यमातून पाहायला मिळते आणि खूप नवनवीन गोष्टी शिकायला मिळतात. सण कुठलाही असो, त्याचे महत्त्व फार मोठे असते. दरवर्षी साजरा होणारा भाद्रपद महिन्यातील गणेशोत्सव असो अथवा माघी गणपतीचा उत्सव, याला जीवनात अनन्यसाधारण महत्त्व आहे. या उत्सवातून कलागुणांना वाव मिळण्याबरोबरच वर्षभरातील ऊर्जा मिळत असते. वयाच्या नवव्या वर्षापासून मुंबई असो अथवा डोंबिवलीतील गणेश मंडळांच्या माध्यमातून जी नाळ जोडली, ती आज वयाची पन्नाशी उलटून गेली तरी कायम राहिली आहे.

टॅग्स :thaneठाणेGanesh Mandal 2019गणेश मंडळ 2019