शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

गणेशोत्सवासाठी मंडळांना एकाच ठिकाणी सर्व परवानग्या मिळणार - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

By नितीन पंडित | Updated: August 20, 2022 01:34 IST

केंद्रीय पंचायतराज्यमंत्री कपिल पाटील यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या उत्सवात भेट देण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे रात्री साडेदहा वाजता उपस्थित झाले होते.

भिवंडी - सध्या राज्यात सर्वसामान्य नागरिकांचे सरकार अस्तित्वात आले असून यापुढे सर्व सण उत्सव हे उत्साहात व जोमाने साजरे करण्यात येणार आहेत. गणेशोत्सव हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यासाठी सर्व गणेशोत्सव मंडळांना त्यांची अडचण लक्षात घेत, एकाच ठिकाणी सर्व परवानग्या देण्यात येतील. यामुळे गणेशोत्सव मंडळांना सतरा ठिकाणी हेलपाटे घालण्याची गरज पडणार नाही, असे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी भिवंडीत जाहीर केले.

केंद्रीय पंचायतराज्यमंत्री कपिल पाटील यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या उत्सवात भेट देण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे रात्री साडेदहा वाजता उपस्थित झाले होते. त्यावेळी मुंबई पोलीस आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबईत ७८ गोविंदा जखमी झाले असून सर्वांची परिस्थिती व्यवस्थित असून सर्व जखमी गोविंदांवर मोफत उपचार करण्याचे निर्देश राज्य शासनाने संबंधित यंत्रणांना दिले आहेत. त्याचबरोबर भविष्यात कुठल्याही गोविंदाला व त्याच्या कुटुंबाला त्रास होणार नाही, यासाठी शासनाने दहीहंडीला खेळाचा दर्जा दिला असून जखमी गोविंदांसाठी विमा कवच दिले आहे. त्यामुळे भविष्यात संस्कृती जतनाबरोबरच खेळातील उत्सव गोविंदा पथकांना साजरा करता येईल, असेही शिंदे यांनी यावेळी सांगितले. 

तर दीड महिन्यापूर्वी आम्ही ५० थरांची हंडी फोडली असून मुंबई सुरत गुवाहाटी असा प्रवास करत राज्यात सर्वसामान्यांचे सरकार अस्तित्वात आले असून हे सरकार सर्व सामान्यांना न्याय देण्याचे काम करेल असेही शिंदे यांनी यावेळी सांगितले. 

टॅग्स :Dahi HandiदहीहंडीEknath Shindeएकनाथ शिंदेGaneshotsavगणेशोत्सव