शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वे ठप्प; मेट्रो सेवा सुरळीत, प्रवाशांना अल्प दिलासा
2
'नेहरूंनी पाकिस्तानला मदत केली होती', 'सिंधू जल' करारावरुन पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
3
पाकिस्तानची खोटी बडबड! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये गुडघे टेकले, आता परदेशात जाऊन मारतायत थापा
4
उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी विरोधकांकडून उमेदवार जाहीर; सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती रिंगणात
5
ऑटो कंपन्यांवरील अरिष्ट टळले...! चीनने दरवाजे उघडले; रेअर अर्थ मेटलसह दोन वस्तूंवरील निर्बंध हटविले
6
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधू बाजी मारणार की महायुती मात देणार? निकालाची उत्सुकता शिगेला
7
GST बदलाच्या घोषणेनंतर 'या' ५ शेअर्समध्ये होणार मोठी वाढ? ब्रोकरेजकडून खरेदीचा सल्ला!
8
दिलीप प्रभावळकरांचा रोमांचक 'दशावतार'; कोकणातल्या मातीत घडणाऱ्या सिनेमाचा अंगावर काटा आणणारा ट्रेलर
9
"साहेब माझी आई हरवली"; तक्रार नोंदवण्यासाठी मुलगा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला, तपास सुरू होताच सगळ्यांना धक्का बसला!
10
१९४६ च्या कलकत्ता दंगलीत हजारो हिंदूंचे प्राण वाचवणारे गोपाल पाठा कोण होते? कोण मानतं हिरो, तर कुणी म्हणतं व्हिलन  
11
पापा की परी... सावधान! स्कुटरच्या हँडलमधून साप निघाला साप, तरुणीने उडीच मारली...
12
इंडियन ऑइलने अमेरिकेला दाखवला 'ठेंगा', रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी सुरुच राहणार...
13
VIDEO : किन्नरच्या सौंदर्यावर नेटकरी 'फिदा'! व्हिडिओ पाहून युजर्स म्हणतायत...; तुम्हीही थक्क व्हाल!
14
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता
15
Mangalagauri 2025: मंगळगौरीचे पावित्र्य आणि माधुर्य दर्शवणारे दीनानाथ दलाल यांचे चित्र; पहा बारकावे!
16
ऋतुराजनं बॉलिंगमध्ये आजमावला हात; सिक्सर मारल्यावर विकेट्स घेत हिशोब केला चुकता (VIDEO)
17
ती गुढ आग... ज्यात भारताचं सेमीकंडक्टर बनवण्याचं स्वप्न झालं होतं जळून खाक, ७ फेब्रुवारी १९८९ रोजी नेमकं काय झालं होतं?
18
सावधान! अनोळखी व्यक्तीला कॅशच्या बदल्यात पैसे ट्रान्सफर करताय? 'या' एका चुकीमुळे जावं लागेल थेट तुरुंगात
19
Himachal Pradesh: हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटी; अनेक घरे, गाड्या गेल्या वाहून, ४०० रस्ते बंद!
20
Miss Universe India: २२ वर्षांच्या मनिका विश्वकर्माने जिंकला 'मिस युनिव्हर्स इंडिया २०२५' चा खिताब, कोण आहे ही सुंदरी?

आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शाळेतील विद्यार्थ्यांचे भवितव्य संकटात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2020 00:23 IST

शासनाच्या निर्णयामुळे संकट; खर्डीत पालकांनी केला निषेध

ठाणे / खर्डी : राज्यभरात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या १३ शाळांचा समावेश आहे. त्यात ठाणे जिल्ह्यातील खर्डी येथे आंतरराष्ट्रीय दर्जाची शाळा आहे. यामध्ये ३८० विद्यार्थी इयत्ता चौथी ते सातवीच्या वर्गांत शिक्षण घेत आहेत. पण, आंतरराष्ट्रीय बोर्ड बंद करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यामुळे या इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात सापडल्याने येथील पालकांनी शाळेच्या प्रांगणात एकत्र येऊन शासनाच्या निर्णयाचा गुरुवारी निषेध केला.ठाणे जिल्हा परिषदेच्या या खर्डी शाळेला आंतरराष्ट्रीय बोर्डामध्ये समावेश करून शाळेला आंतरराष्ट्रीय दर्जा गेल्या दोन वर्षांपासून दिला आहे. यानुसार, या ३८० विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या अभ्यासक्रमाचे शिक्षण दिले जात आहे. अन्य शाळांमधील पाचवीच्या विद्यार्थ्याचा अभ्यासक्रम या शाळेच्या दुसरीच्या वर्गामधील विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जानुसार शिकवला जात आहे. या दर्जेदार शिक्षणामुळे शाळेचा पट १२० विद्यार्थ्यांचा झाला आहे. याशिवाय, पहिलीच्या वर्गाचे प्रवेश आधीच झाले आहे. त्यामुळे तीन वर्षांसाठी पहिलीच्या वर्गाचे प्रवेश बंद झाले आहेत. नर्सरीच्या वर्गाचे प्रवेश तेवढे सुरू आहेत. त्यासाठी दोन महिन्यांपासून रांगा लावण्यात आलेल्या आहेत. प्रवेशासाठी पालकांकडून अधिकारी, लोकप्रतिनिधीच्या शिफारशी आणल्या जात असल्याचे मुख्याध्यापक सुधीर भोईर यांनी लोकमतच्या निदर्शनात आणून दिले.शिक्षकही झाले हवालदिलशाळेच्या शिक्षकांची आंतरराष्ट्रीय निवड मंडळाकडून झालेली आहे. त्यांच्याव्दारे या विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण दिले जात आहे. पण, राज्य शासनाच्या निर्णयामुळे या विद्यार्थ्यांना आता राज्य शिक्षण मंडळाचा अभ्यासक्रम शिकवला जाणार आहे. विद्यार्थ्यांच्या दर्जेदार शिक्षणासाठी परिश्रम घेणाऱ्या १५ शिक्षकांचेदेखील भवितव्य संकटात आहे. पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी सहा सेविकांकडून शिक्षण दिले जात आहे. काही मदतनिसांची भरती केलेली आहे. त्यांचे वेतन शाळेकडून केले जाते. इंग्रजी माध्यमातून आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण घेऊन उंच भरारी घेणाºया या आदिवासी, दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना पुन्हा राज्य शासनाच्या अभ्यासक्रमाचे धडे घ्यावे लागणार आहे. यामुळे पालक विद्यार्थ्यांना अन्य शाळांमध्ये हलवण्याचा प्रयत्न करतील. तत्पूर्वी त्यांनी आंदोलन करून निर्णयाचा निषेध केला आणि शाळेचा दर्जा कायम ठेवण्यासाठी मुख्यमंत्र्यांसाठी निवेदन दिल्याचे भोईर यांनी सांगितले.

टॅग्स :Studentविद्यार्थीEducationशिक्षणSchoolशाळा