शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
3
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
4
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
5
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
6
'आरक्षणाची मर्यादा वाढवणार की नाही?', काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट सवाल
7
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
8
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
9
"प्रभू श्रीराम हृदयात आहेत, पण राम मंदिर..."; मेनका गांधी यांचे निवडणूक प्रचारादरम्यान विधान
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

फ्युनिक्युलर रेल्वेला आणखी १० महिने?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 03, 2018 6:51 AM

मलंग गडावरील प्रदीर्घ काळ रखडलेल्या फ्युनिक्युलर रेल्वेचे काम पूर्ण होण्यास अजून दहा महिने लागण्याची आणि डिसेंबरमध्ये तो खुला होण्याची शक्यता आहे. या रेल्वेच्या रुळांच्या नऊ पिलरपैकी अवघ्या तीनचे काम पूर्ण झाले आहे.

- अनिकेत घमंडीडोंबिवली - मलंग गडावरील प्रदीर्घ काळ रखडलेल्या फ्युनिक्युलर रेल्वेचे काम पूर्ण होण्यास अजून दहा महिने लागण्याची आणि डिसेंबरमध्ये तो खुला होण्याची शक्यता आहे. या रेल्वेच्या रुळांच्या नऊ पिलरपैकी अवघ्या तीनचे काम पूर्ण झाले आहे. उरलेल्या पिलरपैकी त्यापैकी तीन अवघड, तर अन्य तीन तुलनेने उभारण्यास सोपे असल्याची माहिती रुळांचे काम करणारे तज्ज्ञ सल्लागार, सह ठेकेदार वसंत जोशी यांनी दिली.रूळांच्या पिलरच्या कामाला आणखी तीन-चार महिन्यांचा कालावधी लागणार असून ते मे महिन्यात पूर्ण करण्याचा प्रयत्न असेल, असे जोशी यांनी स्पष्ट केले. त्यानंतर रुळांची उभारणी, डबे, त्यांची रितसर चाचणी, तपासण्या कराव्या लागतील. पावसाळ््यात धुके, पावसाच्या सरींमुळे तेथे काम करणे फारसे शक्य होत नाही. त्यामुळे सप्टेंबर-आॅक्टोबरमध्ये अन्य तांत्रिक कामे होतील. तसेच वरच्या भागातील स्टेशनची बांधणी होईल. ही कामे पूर्ण होण्यास दिवाळी उजाडेल, असा अंदाज त्यांनी वर्तवला.खासदार डॉ. श्रीकांत शिंदेंच्या पाठपुराव्यामुळे २२ एप्रिलपासून या प्रकल्पाला पुन्हा गती मिळाली. पण तेव्हाही ठेकेदाराने दिलेली मुदत टळली. त्यामुळे ‘लोकमत’ने पाठपुरावा केला असता ही माहिती समोर आली. गेल्यावर्षीच्या भेटीवेळी जोशी यांच्यासह शिवसेनेचे कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, सार्वजनिक बांधकाम खात्याचे कार्यकारी अभियंता दिनेश महाजन, गटविकास अधिकारी आणि शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.२००८ पासून सुप्रीम कंपनीने सुरु केलेले काम आर्थिक मुद्द्यांमुळे बंद पडले होते. ते सुरू होत नसल्याने कंपनीला काळ््या यादीत का टाकण्यात येऊ नये, असा सवाल खासदार शिंदेंनी केली होता. त्याची नोंद घेत पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी कंपनीला तंबी देत संधी दिली. पण अजून काम पूर्ण झालेले नाही. मध्यंतरी पालकमंत्री शिंदेंच्या दालनात बैठका झाल्या आणि पुन्हा कामास सुरुवात झाली. मात्र काम पूर्ण होण्यास साधारणत: डिसेंबर उजाडणार असल्याचे स्पष्ट झाले. प्रकल्पाचे ८० टक्क्यांहून अधिक काम पूर्ण झाले आहे. उर्वरित २० टक्के काम सुरू आहे. प्रकल्प ८० कोटींचा असून त्यातील सुमारे १० कोटींचा निधी मिळणे शिल्लक होते. आताही नऊ कोटींचे काम बाकी आहे. गेल्या दहा महिन्यात अवघ्या एक कोटींच्या खर्चाचे काम झाले आहे. त्यामुळे मे महिन्यापूर्वी रूळांसह महत्वाचे काम झाले, तरच पावसाळ््यानंतर स्टशन तांत्रिक कामे पूर्ण करून रेल्वेच्या चाचण्या सुरू करता येतील आणि वर्षअखेरीस ही रेल्वे धावेल, असा अंदाज आहे.सुप्रीम कंपनीने हे काम हाती घेतले. पण निधी वेळेवर न मिळाल्याने ते वेळोवेळी रखडले. हा प्रकल्प वेळेत पूर्ण न होण्यास केवळ कंपनी जबाबदार आहे. पालकमंत्री एकनाथ शिंदेंच्या दालनात त्यासंदर्भात वेळोवेळी बैठका झाल्या. त्यात त्यांना काळया यादीत टाकण्याचा प्रस्ताव आला होता. पण त्यांना एक संधी देण्यात आली असून आता काम सुरु झाले आहे. ते मे महिन्यात पूर्ण होऊन पावसाळ््यानंतर पर्यटकांसह मलंग भक्तांना रेल्वेची सुविधा मिळेल.- श्रीकांत शिंदे, खासदार

टॅग्स :thaneठाणेkalyanकल्याण