शहरं
Join us  
Trending Stories
1
इसकी टोपी उसके सर और उसकी...; कोकाटे आणि दत्तात्रय भरणे यांच्यातील मंत्रि‍पदाची आदलाबदली!
2
प्रांजल खेवलकरच्या लॅपटॉपमध्ये अनेक महिलांचे पार्टी अन् त्यानंतरचे आक्षेपार्ह व्हिडिओ!
3
IND vs ENG 5th Test Day 1 Stumps: नायर-वॉशिंग्टन जोडी जमली अन् टीम इंडियावरील मोठं संकट टळलं!
4
विधानसभेच्या निकालांमध्ये तफावत नाही; ईव्हीएम तपासणीनंतर निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण
5
माल चाहिए क्या? xxx वाला? विचारल्यानंतर खेवलकर म्हणाले होते, 'ठेवून घ्या'! चॅटिंग आलं समोर
6
Karun Nair Fifty : 'त्रिशतकवीर' करुण नायरच्या भात्यातून ३१४६ दिवसांनी आली 'फिफ्टी'!
7
Nashik Crime: भयंकर! पत्नीला गुंगीचे औषध पाजून नग्नावस्थेत बनवले व्हिडिओ, दोन वर्ष डान्स बारमध्ये नाचायला लावले
8
उत्तर प्रदेशमधील मंत्र्यांनी आपल्याच सेक्रेटरीला पाठवलं तुरुंगात, कारण वाचून तुम्ही म्हणाल...
9
सरकारी नोकरी शोधणाऱ्यांसाठी उत्तम संधी, लवकरच ओआयसीएलमध्ये मोठी भरती!
10
IND vs ENG: टीम इंडियासोबत पाचव्या कसोटीत 'चिटींग'? पंच कुमार धर्मसेना यांच्यावर नेटकऱ्यांचा आरोप
11
"भगवा नाही, सनातनी किंवा हिंदुत्ववादी दहशतवाद म्हणा"; अमित शाहांचा उल्लेख करत पृथ्वीराज चव्हाणांचे गंभीर विधान
12
सात वर्षांत ४२ वेळा तिने दिला नकार, अखेर ४३व्यावेळी त्यानं केलं असं काही, नकारच देऊ शकली नाही ती
13
Shubman Gill Run Out : साईला कॉल देत गिलनं उगाच केली घाई! इंग्लंडला फुकटात मिळाली विकेट (VIDEO)
14
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजपची रणनीती! माजी खासदार-आमदारांवर सोपवली मोठी जबाबदारी
15
IND vs ENG : 'ती' साथ देणार अशा परिस्थितीत त्यानं विश्रांती घेतली; सोशल मीडियावर बुमराह झाला ट्रोल
16
आमदाराच्या कारची दुचाकीला धडक, रेल्वे पुलावरून खाली कोसळून तरुणाचा मृत्यू, मृत तरुण भाजपा नेत्याचा भाऊ  
17
बांगलादेशी मॉडेलला भारतात अटक! पोलिसांनी राहत्या घरावर टाकली धाड अन् आत जे सापडलं...
18
Anilkumar Pawar ED Raid: अनिलकुमार पवार यांना त्यांच्या आईने गिफ्ट केलेला नाशिकमधील प्लॉट जप्त
19
कृषीखातं पुन्हा धनंजय मुंडेंकडे? सह्याद्री अतिथीगृहावर भेटीगाठींना वेग!
20
निवडणूक जिंकणं कठीण की पत्नीचं मन? राघव चड्डांनी दिलं असं उत्तर, परिणीतीही झाली अवाक्

जवाहरबाग स्मशानभूमीत १०२२ कोरोना मृतांवर अंत्यसंस्कार?, महापालिकेने जाहीर केले ५८९ मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2020 20:23 IST

ठाणे : महापालिका क्षेत्रात कोरोनाने ५८९ नागरिकांचा मृत्यू झाला असल्याचे प्रशासनाने जाहीर केले असताना, केवळ जवाहरबाग स्मशानभूमीत कोरोनाच्या संसर्गाने ...

ठाणे : महापालिका क्षेत्रात कोरोनाने ५८९ नागरिकांचा मृत्यू झाला असल्याचे प्रशासनाने जाहीर केले असताना, केवळ जवाहरबाग स्मशानभूमीत कोरोनाच्या संसर्गाने मृत झालेल्या १०२२ नागरिकांवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत, असा आरोप भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार यांनी केला आहे. तसेच या प्रकरणी चौकशी करून जनतेपुढे खरी संख्या जाहीर करण्याची मागणी केली आहे.ठाणे शहराला कोरोनाने विळखा घातला असून, ठाणे शहरात कोरोनामुळे दररोज बळी पडणाऱ्या नागरिकांची संख्या लक्षणीय आहे. सुरुवातीपासून कोरोना मृतांवर जवाहरबाग स्मशानभूमीतील विद्युतदाहिनीत अंत्यसंस्कार केले जातात. कालांतराने शहरातील अन्य स्मशानभूमीत ही व्यवस्था करण्यात आली. या ठिकाणी कोरोना मृतांचे दहन करण्यासाठी पाच ते सहा तासांची प्रतिक्षा करावी लागत होती, याकडे नारायण पवार यांनी लक्ष वेधले.जवाहरबाग स्मशानभूमीतील नोंदीवरून घेतलेल्या माहितीत २० मार्चपासून २८ जुलैपर्यंत १०२२ रुग्णांवर अंत्यसंस्कार झाल्याची नोंद आहे. महापालिकेने २८ जुलै रोजी जाहीर केलेल्या पत्रकात ठाणे महापालिका क्षेत्रात आतापर्यंत १७ हजार ६० नागरिकांना कोरोनाचा संसर्ग झाला. त्यातील १२ हजार ५१५ नागरिक उपचार घेऊन घरी परतले. तर ५ हजार ४५ रुग्णांवर अजून उपचार सुरू आहेत. तसेच आतापर्यंत ५८९ जणांचा मृत्यू झाला असल्याचे म्हटले आहे. मात्र, जवाहरबागमध्ये कोरोनासाठी राखीव असलेल्या रुग्णालयातून १०२२ मृतदेह आल्याची नोंद आहे. त्याव्यतिरिक्त मुस्लिम धर्मियांची संख्या वेगळी असल्याचे समजते, असे नगरसेवक नारायण पवार यांनी पत्रात म्हटले आहे. या प्रकरणी प्रशासनाने चौकशी करून कोरोनाने बळी पडलेल्या नागरिकांची खरी संख्या जाहीर करावी, अशी मागणी नारायण पवार यांनी आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांना पाठविलेल्या पत्रात केली आहे.-------------------------------------------------राज्य सरकार, महापालिकेत कोरोना रुग्ण आकड्यांमध्ये तफावत राज्य सरकार व महापालिकेकडून कोरोना मृतांची संख्या व एकूण रुग्णांच्या संख्येत तफावत कायम आहे. याबाबत गेल्या चार महिन्यांत महापालिका प्रशासनाकडून खुलासा केलेला नाही. सध्याही राज्य सरकारकडून मृतांची संख्या ६८१ जाहीर करण्यात आली. तर महापालिकेकडून ५८९ जणांचा बळी गेल्याचे म्हटले आहे. एकूण रुग्णांच्या संख्येतही सुमारे दोन हजार रुग्णांची तफावत आहे, याकडे नारायण पवार यांनी लक्ष वेधले आहे.