शहरं
Join us  
Trending Stories
1
"तर मी फडणवीसांना या जन्मी माफ करणार नाही", अंजली दमानियांची पोस्ट, 'तो' फोटोही केला शेअर
2
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
3
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
4
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
5
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
6
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
7
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
8
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
9
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
10
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
11
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
12
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
13
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
14
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
15
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
16
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
17
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
18
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
19
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
20
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
Daily Top 2Weekly Top 5

जवाहरबाग स्मशानभूमीत १०२२ कोरोना मृतांवर अंत्यसंस्कार?, महापालिकेने जाहीर केले ५८९ मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2020 20:23 IST

ठाणे : महापालिका क्षेत्रात कोरोनाने ५८९ नागरिकांचा मृत्यू झाला असल्याचे प्रशासनाने जाहीर केले असताना, केवळ जवाहरबाग स्मशानभूमीत कोरोनाच्या संसर्गाने ...

ठाणे : महापालिका क्षेत्रात कोरोनाने ५८९ नागरिकांचा मृत्यू झाला असल्याचे प्रशासनाने जाहीर केले असताना, केवळ जवाहरबाग स्मशानभूमीत कोरोनाच्या संसर्गाने मृत झालेल्या १०२२ नागरिकांवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत, असा आरोप भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार यांनी केला आहे. तसेच या प्रकरणी चौकशी करून जनतेपुढे खरी संख्या जाहीर करण्याची मागणी केली आहे.ठाणे शहराला कोरोनाने विळखा घातला असून, ठाणे शहरात कोरोनामुळे दररोज बळी पडणाऱ्या नागरिकांची संख्या लक्षणीय आहे. सुरुवातीपासून कोरोना मृतांवर जवाहरबाग स्मशानभूमीतील विद्युतदाहिनीत अंत्यसंस्कार केले जातात. कालांतराने शहरातील अन्य स्मशानभूमीत ही व्यवस्था करण्यात आली. या ठिकाणी कोरोना मृतांचे दहन करण्यासाठी पाच ते सहा तासांची प्रतिक्षा करावी लागत होती, याकडे नारायण पवार यांनी लक्ष वेधले.जवाहरबाग स्मशानभूमीतील नोंदीवरून घेतलेल्या माहितीत २० मार्चपासून २८ जुलैपर्यंत १०२२ रुग्णांवर अंत्यसंस्कार झाल्याची नोंद आहे. महापालिकेने २८ जुलै रोजी जाहीर केलेल्या पत्रकात ठाणे महापालिका क्षेत्रात आतापर्यंत १७ हजार ६० नागरिकांना कोरोनाचा संसर्ग झाला. त्यातील १२ हजार ५१५ नागरिक उपचार घेऊन घरी परतले. तर ५ हजार ४५ रुग्णांवर अजून उपचार सुरू आहेत. तसेच आतापर्यंत ५८९ जणांचा मृत्यू झाला असल्याचे म्हटले आहे. मात्र, जवाहरबागमध्ये कोरोनासाठी राखीव असलेल्या रुग्णालयातून १०२२ मृतदेह आल्याची नोंद आहे. त्याव्यतिरिक्त मुस्लिम धर्मियांची संख्या वेगळी असल्याचे समजते, असे नगरसेवक नारायण पवार यांनी पत्रात म्हटले आहे. या प्रकरणी प्रशासनाने चौकशी करून कोरोनाने बळी पडलेल्या नागरिकांची खरी संख्या जाहीर करावी, अशी मागणी नारायण पवार यांनी आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांना पाठविलेल्या पत्रात केली आहे.-------------------------------------------------राज्य सरकार, महापालिकेत कोरोना रुग्ण आकड्यांमध्ये तफावत राज्य सरकार व महापालिकेकडून कोरोना मृतांची संख्या व एकूण रुग्णांच्या संख्येत तफावत कायम आहे. याबाबत गेल्या चार महिन्यांत महापालिका प्रशासनाकडून खुलासा केलेला नाही. सध्याही राज्य सरकारकडून मृतांची संख्या ६८१ जाहीर करण्यात आली. तर महापालिकेकडून ५८९ जणांचा बळी गेल्याचे म्हटले आहे. एकूण रुग्णांच्या संख्येतही सुमारे दोन हजार रुग्णांची तफावत आहे, याकडे नारायण पवार यांनी लक्ष वेधले आहे.