शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय दलित तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
7
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
10
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
11
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
12
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
13
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
14
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
15
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
16
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
17
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
18
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
19
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
20
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
Daily Top 2Weekly Top 5

जवाहरबाग स्मशानभूमीत १०२२ कोरोना मृतांवर अंत्यसंस्कार?, महापालिकेने जाहीर केले ५८९ मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2020 20:23 IST

ठाणे : महापालिका क्षेत्रात कोरोनाने ५८९ नागरिकांचा मृत्यू झाला असल्याचे प्रशासनाने जाहीर केले असताना, केवळ जवाहरबाग स्मशानभूमीत कोरोनाच्या संसर्गाने ...

ठाणे : महापालिका क्षेत्रात कोरोनाने ५८९ नागरिकांचा मृत्यू झाला असल्याचे प्रशासनाने जाहीर केले असताना, केवळ जवाहरबाग स्मशानभूमीत कोरोनाच्या संसर्गाने मृत झालेल्या १०२२ नागरिकांवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत, असा आरोप भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार यांनी केला आहे. तसेच या प्रकरणी चौकशी करून जनतेपुढे खरी संख्या जाहीर करण्याची मागणी केली आहे.ठाणे शहराला कोरोनाने विळखा घातला असून, ठाणे शहरात कोरोनामुळे दररोज बळी पडणाऱ्या नागरिकांची संख्या लक्षणीय आहे. सुरुवातीपासून कोरोना मृतांवर जवाहरबाग स्मशानभूमीतील विद्युतदाहिनीत अंत्यसंस्कार केले जातात. कालांतराने शहरातील अन्य स्मशानभूमीत ही व्यवस्था करण्यात आली. या ठिकाणी कोरोना मृतांचे दहन करण्यासाठी पाच ते सहा तासांची प्रतिक्षा करावी लागत होती, याकडे नारायण पवार यांनी लक्ष वेधले.जवाहरबाग स्मशानभूमीतील नोंदीवरून घेतलेल्या माहितीत २० मार्चपासून २८ जुलैपर्यंत १०२२ रुग्णांवर अंत्यसंस्कार झाल्याची नोंद आहे. महापालिकेने २८ जुलै रोजी जाहीर केलेल्या पत्रकात ठाणे महापालिका क्षेत्रात आतापर्यंत १७ हजार ६० नागरिकांना कोरोनाचा संसर्ग झाला. त्यातील १२ हजार ५१५ नागरिक उपचार घेऊन घरी परतले. तर ५ हजार ४५ रुग्णांवर अजून उपचार सुरू आहेत. तसेच आतापर्यंत ५८९ जणांचा मृत्यू झाला असल्याचे म्हटले आहे. मात्र, जवाहरबागमध्ये कोरोनासाठी राखीव असलेल्या रुग्णालयातून १०२२ मृतदेह आल्याची नोंद आहे. त्याव्यतिरिक्त मुस्लिम धर्मियांची संख्या वेगळी असल्याचे समजते, असे नगरसेवक नारायण पवार यांनी पत्रात म्हटले आहे. या प्रकरणी प्रशासनाने चौकशी करून कोरोनाने बळी पडलेल्या नागरिकांची खरी संख्या जाहीर करावी, अशी मागणी नारायण पवार यांनी आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांना पाठविलेल्या पत्रात केली आहे.-------------------------------------------------राज्य सरकार, महापालिकेत कोरोना रुग्ण आकड्यांमध्ये तफावत राज्य सरकार व महापालिकेकडून कोरोना मृतांची संख्या व एकूण रुग्णांच्या संख्येत तफावत कायम आहे. याबाबत गेल्या चार महिन्यांत महापालिका प्रशासनाकडून खुलासा केलेला नाही. सध्याही राज्य सरकारकडून मृतांची संख्या ६८१ जाहीर करण्यात आली. तर महापालिकेकडून ५८९ जणांचा बळी गेल्याचे म्हटले आहे. एकूण रुग्णांच्या संख्येतही सुमारे दोन हजार रुग्णांची तफावत आहे, याकडे नारायण पवार यांनी लक्ष वेधले आहे.