शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

नोंदणीअभावी मंडळाकडील निधी पडून

By admin | Updated: November 16, 2015 02:12 IST

खाजगी तसेच सार्वजनिक क्षेत्रातील बांधकाम मजूर व कुटुंबियांच्या कल्याणासाठी स्थापन झालेल्या महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाकडे आजमितीस

मीरारोड : खाजगी तसेच सार्वजनिक क्षेत्रातील बांधकाम मजूर व कुटुंबियांच्या कल्याणासाठी स्थापन झालेल्या महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाकडे आजमितीस ३ हजार कोटी रुपयांचा निधी जमा असतानाही बहुतांश कष्टकरी कामगारांची नोंदणी झालेली नसल्याने या निधीचा त्या कामगारांना लाभ मिळत नसल्याने नगरविकास विभागाने नाका कामगारांची नोंदणी करून त्यांना प्रमाणपत्र देण्याचे फर्मान काढले आहे.बांधकाम प्रकल्पांच्या एकूण खर्चाच्या एक टक्के रक्कम याप्रमाणे गेल्या चार वर्षात ३ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी मंडळाकडे जमा झाला आहे. कामगारांच्या घामातून कोटी कोटी उड्डाणे घेणाऱ्या या श्रीमंत मंडळाकडे मात्र लक्षावधी कष्टकरी कामगारांची नोंदणीच नसल्याने कामगारांऐवजी विमा कंपनीसह ठेकेदारांचेच कल्याण होत आहे. कामगार विभागाने गेल्या वर्षी अधिसूचना काढूनही मनपा, नगरपालिकांनी दाद न दिल्याने नगरविकास विभागाने परिपत्रक काढून डिसेंबर २०१५ पर्यंत नाका कामगारांना प्रमाणपत्र देण्याचे आदेश दिले आहेत. राज्यातील मोठ्या संख्येने असंघटीत असलेल्या इमारत बांधकाम व अन्य कामगारांच्या कल्याणासाठी २०११ साली राज्य शासनाने महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ स्थापन केले. राज्यातील सर्व खाजगी वा सार्वजनिक इमारतींचे बांधकाम तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग, पाणीपुरवठा विभाग आदी बांधकाम प्रकल्पाच्या खर्चाच्या एक टक्के उपकर आकारुन ती रक्कम या मंडळाकडे जमा केली गेली. या रकमेतून कामगार व त्यांच्या कुटुंबियांकरीता विविध विमा सुरक्षा, शिक्षण, आरोग्य, प्रसूती तसेच मुलींसाठी अनामत ठेव रक्कम आदी प्रकारच्या १६ योजना मंडळाकडून राबवण्यात येतात. गेल्या ४ वर्षात मंडळाच्या खात्यात तब्बल ३ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम उपकराच्या रुपाने जमा झाली आहे. परंतु प्रत्यक्षात कामगारांच्या कल्याणासाठी जेमतेम २०० कोटी रुपये खर्च केले गेले. कामगाराची मंडळाकडे नोंदणी करण्यासाठी किमान ९० दिवस काम करणे आवश्यक आहे. परंतु खाजगी इमारती बांधणारे विकासक व सार्वजनिक बांधकामाचे ठेके घेणारे ठेकेदार हे मजुरांची कामगार विभाग वा मंडळाकडे माहिती देणे टाळतात. त्यातच लाखो नाका कामगार रोजंदारीवर काम करीत असले तरी त्यांची नोंदणीच शक्य होत नाही. यामुळे लाखो बांधकाम कामगार व त्यांचे कुटुंबिय विविध योजनांपासून वंचित आहेत. काम करताना अनेकांचे जीव गेले तर अनेकांना अपंगत्व आले. त्यांना उपचासाठीचा खर्च देखील पोटाला चिमटा काढून करावा लागतोय. मुलांचे शिक्षण तर दूरच राहिले आहे.छत्तीसगडसारख्या लहानशा राज्यात ३६ लाख कामगारांची नोंदणी झालेली असताना महाराष्ट्रात मात्र जेमतेम ३ लाख कामगारांची देखील नोंदणी होत नाही. राज्यात सुमारे ५० लाख बांधकाम कामगार कार्यरत असल्याचा अंदाज आहे. मागील पावसाळी अधिवेशनात कामगार मंत्री प्रकाश मेहता यांनी देखील कामगारांची नोंदणी व पर्यायाने त्यांच्यासाठी होणारा खर्च तुटपुंजा असल्याचे मान्य करत नोंदणीसाठी विशेष मोहीम राबविणार असल्याचे म्हटले होते. ग्रामसेवक प्रमाणपत्र देण्यास उदासीन१३ आॅगस्ट २०१४ रोजी कामगार खात्याने अधिसूचना प्रसिध्द केली. रोजंदारी वा अस्थायी स्वरुपाचे काम असल्याने कामगारांना एकापेक्षा जास्त मालकांकडे काम करावे लागते. अशा इमारत व बांधकाम कामगाराला ग्रा.पं.मध्ये ग्रामसेवकाने तर महापालिका वा नगरपालिकेत आयुक्त वा मुख्याधिकाऱ्यांनी नियुक्त केलेल्या प्राधिकृत अधिकाऱ्याने बांधकाम कामगार असल्याचे प्रमाणपत्र देण्याचे स्पष्ट केले होते. परंतु त्याची अमंलबजावणी होते आहे तरी कुठे ?