शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
4
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
5
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
6
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
7
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
8
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
9
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
10
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
11
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
12
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
13
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
14
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
15
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
16
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
17
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
18
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
19
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
20
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

मीरारोड: स्वातंत्र्य सैनिक आगुस्तिन कोळी यांचे वयाच्या १०२ व्या वर्षी निधन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2022 18:55 IST

स्वातंत्र्याच्या लढ्यात योगदान देणारे भाईंदरच्या उत्तन येथील स्वातंत्र्य सैनिक आगुस्तिन मानवेल बांड्या - कोळी यांचे निधन झाले.

लोकमत न्यूज नेटवर्क 

मीरारोड -  स्वातंत्र्याच्या लढ्यात योगदान देणारे भाईंदरच्या उत्तन येथील स्वातंत्र्य सैनिक आगुस्तिन मानवेल बांड्या - कोळी यांचे रविवारी पहाटे दिड च्या सुमारास निधन झाले . ते १०२ वर्षांचे होते . उत्तनचर्च येथील दफनभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले . 

१ जानेवारी १९२० रोजी आगुस्तिन यांचा जन्म उत्तन गावात झाला . त्यांचे प्राथमिक शिक्षण त्याकाळच्या लोकल बोर्डाच्या मराठी शाळेत झाले . पुढील शिक्षण त्यांनी वसई व मुंबईत केले . ७ वी ते ११ वी मॅट्रिक पर्यंतचे शिक्षण त्यांनी वसईच्या पापडी येथील त्या काळच्या नालंदा विद्यालय  मध्ये पूर्ण केले . त्याकाळच्या बॉम्बे -  बरोडा भारतीय रेल्वेत त्यांना नोकरी मिळाली . परंतु स्वातंत्र्याची चळवळ जोर धरू लागली तसे ते सुद्धा सरकारी नोकरी मुळे स्वातंत्र्य लढ्यात सहभागी होता येत नसल्याने अस्वस्थ होऊ लागले . देशासाठी स्वतःच्या सरकारी नोकरी व चांगल्या पगारासह कुटुंबीयांचा विचार न करता १९४० साली आगुस्तिन यांनी सरकारी नोकरीचा राजीनामा देऊन ते उघडपणे स्वातंत्र्य चळवळीत सामील झाले . 

अरबी समुद्र किनारी वसलेले मच्छिमार व शेतकऱ्यांचे गावखेडे असलेले उत्तन व परिसर १५ व्या शतकात पोर्तुगिझांच्या व त्या नंतर १६ व्या शतका पासून इंग्रजांच्या प्रभावा खाली होते .  यामुळे उत्तन गावातून स्वातंत्र्याचा लढा सुरु करणे सहज सोपे नसल्याने त्यांनी मुंबई , दहिसर , पाणजू बेट, वसई भागातून स्वातंत्र्याचा लढा चालवला.  १५ जानेवारी १९४१ रोजी उत्तन तलाठी कार्यालय जवळ देशाच्या स्वातंत्र्यासाठी पहिली उत्स्फूर्त जाहीर सभा झाली . आगुस्तिन यांना अटक व कारावास सुद्धा भोगावा लागला . 

स्वातंत्र्य मिळाल्या नंतर त्यांनी उत्तन सारख्या गावखेड्यात शिक्षणाची पाळेमुळे रुजवण्यास सुरवात केली . ते स्वतः ३० वर्ष उत्तनच्या संत जोसेफ शाळेत शिक्षक म्हणून सक्रिय राहिले . ते शाळेत संस्कृत आदी विषय शिकवत असत . मच्छिमारांनी शिक्षण व वाचना कडे वळावे म्हणून त्यांनी तरंगते वाचनालय अशी संकल्पना राबवली . मासेमारी साठी समुद्रात जाणाऱ्या मच्छीमारांना वाचण्यासाठी ते विविध पुस्तके एका पेटीतून देत असत . उत्तन गावचे ते तब्बल १७ वर्ष सरपंच म्हणून ते कार्यरत होते . १० वर्ष ठाणे तालुका पंचायत समिती चे ते उपसभापती होते . दुर्बल घटकांचे प्रतिनिधी म्हणून १० वर्षे ते सिटीझन बँकेचे संचालक राहिले . वासरू लघु उधोग संस्थेच्या स्थापनेत त्यांचा देखील पुढाकार होता . उत्तन परिसराच्या विकासासह त्यांनी मच्छिमार - शेतकऱ्यांना  शिक्षण , स्वयंरोजगारा कडे प्रोत्साहित करण्यासाठी सतत प्रयत्न केले . 

गेल्यावर्षी जानेवारी महिन्यात त्यांच्या वयाचा शतक महोत्सव साजरा करण्यात आला होता .  त्यावेळी देखील त्यांनी खणखणीत आवाजात उपस्थितांना मार्गदर्शन केले होते . 

गेले दोन दिवस त्यांना कफ झाला होता . शनिवारी ते गुणगुणत होते व नेहमी प्रमाणेच त्यांची दिनचर्या होती . कफ मुळे प्रकृती काहीशी बिघडली होती . रविवार ३० जानेवारीच्या पहाटे दिड च्या सुमारास त्यांना अस्वस्थ वाटू लागले आणि त्यांची प्राणज्योत मालवली . त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच शोकाकुल वातावरण झाले . त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी मोठ्या संख्येने लोक त्यांच्या घरी आणि दुपारी उत्तन चर्च येथे जमले होते . उत्तन पोलिसांनी त्यांना मानवंदना दिली . आमदार गीता जैन , माजी खासदार मिठालाल जैन , मच्छिमार नेते लिओ कोलासो , नगरसेविका शर्मिला गंडोली , एलायस बांड्या , एड . शफिक खान , काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रमोद सामंत , आदींसह विविध क्षेत्रातील अनेकांनी त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेत आदरांजली वाहिली . त्यांच्या पश्चात त्यांचा मोठा परिवार आहे . 

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदर