शहरं
Join us  
Trending Stories
1
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
2
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
3
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
4
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
5
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
6
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
7
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
8
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ
9
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा
10
ENG vs IND : ३ शतकवीर अन् मग ४१ धावांत ७ विकेट्स! टीम इंडिया पहिल्या डावात ४७१ धावांवर All Out
11
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
12
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
13
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
14
"डियर क्रिकेट गिव्ह मी वन मोअर चान्स" वाल्या करुण नायरच्या पदरी भोपळा! (VIDEO)
15
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
16
Yogini Ekadashi 2025: योगिनी एकादशीला विष्णुकृपा; त्रिपुष्कर योगात ५ राशींना धनलाभाची संधी
17
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
18
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
19
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
20
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...

मीरारोड: स्वातंत्र्य सैनिक आगुस्तिन कोळी यांचे वयाच्या १०२ व्या वर्षी निधन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2022 18:55 IST

स्वातंत्र्याच्या लढ्यात योगदान देणारे भाईंदरच्या उत्तन येथील स्वातंत्र्य सैनिक आगुस्तिन मानवेल बांड्या - कोळी यांचे निधन झाले.

लोकमत न्यूज नेटवर्क 

मीरारोड -  स्वातंत्र्याच्या लढ्यात योगदान देणारे भाईंदरच्या उत्तन येथील स्वातंत्र्य सैनिक आगुस्तिन मानवेल बांड्या - कोळी यांचे रविवारी पहाटे दिड च्या सुमारास निधन झाले . ते १०२ वर्षांचे होते . उत्तनचर्च येथील दफनभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले . 

१ जानेवारी १९२० रोजी आगुस्तिन यांचा जन्म उत्तन गावात झाला . त्यांचे प्राथमिक शिक्षण त्याकाळच्या लोकल बोर्डाच्या मराठी शाळेत झाले . पुढील शिक्षण त्यांनी वसई व मुंबईत केले . ७ वी ते ११ वी मॅट्रिक पर्यंतचे शिक्षण त्यांनी वसईच्या पापडी येथील त्या काळच्या नालंदा विद्यालय  मध्ये पूर्ण केले . त्याकाळच्या बॉम्बे -  बरोडा भारतीय रेल्वेत त्यांना नोकरी मिळाली . परंतु स्वातंत्र्याची चळवळ जोर धरू लागली तसे ते सुद्धा सरकारी नोकरी मुळे स्वातंत्र्य लढ्यात सहभागी होता येत नसल्याने अस्वस्थ होऊ लागले . देशासाठी स्वतःच्या सरकारी नोकरी व चांगल्या पगारासह कुटुंबीयांचा विचार न करता १९४० साली आगुस्तिन यांनी सरकारी नोकरीचा राजीनामा देऊन ते उघडपणे स्वातंत्र्य चळवळीत सामील झाले . 

अरबी समुद्र किनारी वसलेले मच्छिमार व शेतकऱ्यांचे गावखेडे असलेले उत्तन व परिसर १५ व्या शतकात पोर्तुगिझांच्या व त्या नंतर १६ व्या शतका पासून इंग्रजांच्या प्रभावा खाली होते .  यामुळे उत्तन गावातून स्वातंत्र्याचा लढा सुरु करणे सहज सोपे नसल्याने त्यांनी मुंबई , दहिसर , पाणजू बेट, वसई भागातून स्वातंत्र्याचा लढा चालवला.  १५ जानेवारी १९४१ रोजी उत्तन तलाठी कार्यालय जवळ देशाच्या स्वातंत्र्यासाठी पहिली उत्स्फूर्त जाहीर सभा झाली . आगुस्तिन यांना अटक व कारावास सुद्धा भोगावा लागला . 

स्वातंत्र्य मिळाल्या नंतर त्यांनी उत्तन सारख्या गावखेड्यात शिक्षणाची पाळेमुळे रुजवण्यास सुरवात केली . ते स्वतः ३० वर्ष उत्तनच्या संत जोसेफ शाळेत शिक्षक म्हणून सक्रिय राहिले . ते शाळेत संस्कृत आदी विषय शिकवत असत . मच्छिमारांनी शिक्षण व वाचना कडे वळावे म्हणून त्यांनी तरंगते वाचनालय अशी संकल्पना राबवली . मासेमारी साठी समुद्रात जाणाऱ्या मच्छीमारांना वाचण्यासाठी ते विविध पुस्तके एका पेटीतून देत असत . उत्तन गावचे ते तब्बल १७ वर्ष सरपंच म्हणून ते कार्यरत होते . १० वर्ष ठाणे तालुका पंचायत समिती चे ते उपसभापती होते . दुर्बल घटकांचे प्रतिनिधी म्हणून १० वर्षे ते सिटीझन बँकेचे संचालक राहिले . वासरू लघु उधोग संस्थेच्या स्थापनेत त्यांचा देखील पुढाकार होता . उत्तन परिसराच्या विकासासह त्यांनी मच्छिमार - शेतकऱ्यांना  शिक्षण , स्वयंरोजगारा कडे प्रोत्साहित करण्यासाठी सतत प्रयत्न केले . 

गेल्यावर्षी जानेवारी महिन्यात त्यांच्या वयाचा शतक महोत्सव साजरा करण्यात आला होता .  त्यावेळी देखील त्यांनी खणखणीत आवाजात उपस्थितांना मार्गदर्शन केले होते . 

गेले दोन दिवस त्यांना कफ झाला होता . शनिवारी ते गुणगुणत होते व नेहमी प्रमाणेच त्यांची दिनचर्या होती . कफ मुळे प्रकृती काहीशी बिघडली होती . रविवार ३० जानेवारीच्या पहाटे दिड च्या सुमारास त्यांना अस्वस्थ वाटू लागले आणि त्यांची प्राणज्योत मालवली . त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच शोकाकुल वातावरण झाले . त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी मोठ्या संख्येने लोक त्यांच्या घरी आणि दुपारी उत्तन चर्च येथे जमले होते . उत्तन पोलिसांनी त्यांना मानवंदना दिली . आमदार गीता जैन , माजी खासदार मिठालाल जैन , मच्छिमार नेते लिओ कोलासो , नगरसेविका शर्मिला गंडोली , एलायस बांड्या , एड . शफिक खान , काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रमोद सामंत , आदींसह विविध क्षेत्रातील अनेकांनी त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेत आदरांजली वाहिली . त्यांच्या पश्चात त्यांचा मोठा परिवार आहे . 

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदर