शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
2
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
3
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
4
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
5
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
6
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
7
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
8
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
9
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
10
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
11
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
12
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
13
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
14
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
15
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
16
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
17
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
18
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

मीरारोड: स्वातंत्र्य सैनिक आगुस्तिन कोळी यांचे वयाच्या १०२ व्या वर्षी निधन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2022 18:55 IST

स्वातंत्र्याच्या लढ्यात योगदान देणारे भाईंदरच्या उत्तन येथील स्वातंत्र्य सैनिक आगुस्तिन मानवेल बांड्या - कोळी यांचे निधन झाले.

लोकमत न्यूज नेटवर्क 

मीरारोड -  स्वातंत्र्याच्या लढ्यात योगदान देणारे भाईंदरच्या उत्तन येथील स्वातंत्र्य सैनिक आगुस्तिन मानवेल बांड्या - कोळी यांचे रविवारी पहाटे दिड च्या सुमारास निधन झाले . ते १०२ वर्षांचे होते . उत्तनचर्च येथील दफनभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले . 

१ जानेवारी १९२० रोजी आगुस्तिन यांचा जन्म उत्तन गावात झाला . त्यांचे प्राथमिक शिक्षण त्याकाळच्या लोकल बोर्डाच्या मराठी शाळेत झाले . पुढील शिक्षण त्यांनी वसई व मुंबईत केले . ७ वी ते ११ वी मॅट्रिक पर्यंतचे शिक्षण त्यांनी वसईच्या पापडी येथील त्या काळच्या नालंदा विद्यालय  मध्ये पूर्ण केले . त्याकाळच्या बॉम्बे -  बरोडा भारतीय रेल्वेत त्यांना नोकरी मिळाली . परंतु स्वातंत्र्याची चळवळ जोर धरू लागली तसे ते सुद्धा सरकारी नोकरी मुळे स्वातंत्र्य लढ्यात सहभागी होता येत नसल्याने अस्वस्थ होऊ लागले . देशासाठी स्वतःच्या सरकारी नोकरी व चांगल्या पगारासह कुटुंबीयांचा विचार न करता १९४० साली आगुस्तिन यांनी सरकारी नोकरीचा राजीनामा देऊन ते उघडपणे स्वातंत्र्य चळवळीत सामील झाले . 

अरबी समुद्र किनारी वसलेले मच्छिमार व शेतकऱ्यांचे गावखेडे असलेले उत्तन व परिसर १५ व्या शतकात पोर्तुगिझांच्या व त्या नंतर १६ व्या शतका पासून इंग्रजांच्या प्रभावा खाली होते .  यामुळे उत्तन गावातून स्वातंत्र्याचा लढा सुरु करणे सहज सोपे नसल्याने त्यांनी मुंबई , दहिसर , पाणजू बेट, वसई भागातून स्वातंत्र्याचा लढा चालवला.  १५ जानेवारी १९४१ रोजी उत्तन तलाठी कार्यालय जवळ देशाच्या स्वातंत्र्यासाठी पहिली उत्स्फूर्त जाहीर सभा झाली . आगुस्तिन यांना अटक व कारावास सुद्धा भोगावा लागला . 

स्वातंत्र्य मिळाल्या नंतर त्यांनी उत्तन सारख्या गावखेड्यात शिक्षणाची पाळेमुळे रुजवण्यास सुरवात केली . ते स्वतः ३० वर्ष उत्तनच्या संत जोसेफ शाळेत शिक्षक म्हणून सक्रिय राहिले . ते शाळेत संस्कृत आदी विषय शिकवत असत . मच्छिमारांनी शिक्षण व वाचना कडे वळावे म्हणून त्यांनी तरंगते वाचनालय अशी संकल्पना राबवली . मासेमारी साठी समुद्रात जाणाऱ्या मच्छीमारांना वाचण्यासाठी ते विविध पुस्तके एका पेटीतून देत असत . उत्तन गावचे ते तब्बल १७ वर्ष सरपंच म्हणून ते कार्यरत होते . १० वर्ष ठाणे तालुका पंचायत समिती चे ते उपसभापती होते . दुर्बल घटकांचे प्रतिनिधी म्हणून १० वर्षे ते सिटीझन बँकेचे संचालक राहिले . वासरू लघु उधोग संस्थेच्या स्थापनेत त्यांचा देखील पुढाकार होता . उत्तन परिसराच्या विकासासह त्यांनी मच्छिमार - शेतकऱ्यांना  शिक्षण , स्वयंरोजगारा कडे प्रोत्साहित करण्यासाठी सतत प्रयत्न केले . 

गेल्यावर्षी जानेवारी महिन्यात त्यांच्या वयाचा शतक महोत्सव साजरा करण्यात आला होता .  त्यावेळी देखील त्यांनी खणखणीत आवाजात उपस्थितांना मार्गदर्शन केले होते . 

गेले दोन दिवस त्यांना कफ झाला होता . शनिवारी ते गुणगुणत होते व नेहमी प्रमाणेच त्यांची दिनचर्या होती . कफ मुळे प्रकृती काहीशी बिघडली होती . रविवार ३० जानेवारीच्या पहाटे दिड च्या सुमारास त्यांना अस्वस्थ वाटू लागले आणि त्यांची प्राणज्योत मालवली . त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच शोकाकुल वातावरण झाले . त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी मोठ्या संख्येने लोक त्यांच्या घरी आणि दुपारी उत्तन चर्च येथे जमले होते . उत्तन पोलिसांनी त्यांना मानवंदना दिली . आमदार गीता जैन , माजी खासदार मिठालाल जैन , मच्छिमार नेते लिओ कोलासो , नगरसेविका शर्मिला गंडोली , एलायस बांड्या , एड . शफिक खान , काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रमोद सामंत , आदींसह विविध क्षेत्रातील अनेकांनी त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेत आदरांजली वाहिली . त्यांच्या पश्चात त्यांचा मोठा परिवार आहे . 

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदर