शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन वेळा कार बदलून रुपाली चाकणकर चौकशीला हजर, अशोक खरातप्रकरणी एसआयटीने केली प्रश्नांची सरबत्ती
2
शेतकऱ्याच्या कांद्याला मिळतात ५० पैसे, ग्राहक मोजतो २५ रुपये; उत्पादन खर्चही निघेना, शेतकऱ्यांचा आक्रोश
3
Iran US War Update: युद्धविराम मोठ्या संकटात ! मालवाहू जहाजाला आग, कुवेतवर ड्रोन हल्ला
4
तामिळनाडू 'विजय'पथावर! मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच जनतेला दिले मोफत विजेचे गिफ्ट
5
सोनेखरेदी टाळा, पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करा, 'वर्क फ्रॉम होम' सुरू करा; पंतप्रधान मोदींचे भारतीयांना आवाहन
6
"इराणचं हसणं आता कायमचं बंद होईल"; ट्रम्प यांचा थेट इशारा; ओबामांनी विमानाने पैसे दिल्याचा आरोप
7
RCB साठी जीव तोडून खेळला; मग MI च्या जखमेवर फुंकर घालत क्रुणाल म्हणाला, "तो काळ माझ्यासाठी…"
8
"आपल्याकडे परिस्थिती नियंत्रणात पण..."; मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं इंधन आणि गॅस बचतीचं आवाहन
9
IPL 2026 : ट्विस्टवर ट्विस्ट! शेवटच्या चेंडूवर RCB नं जिंकली मॅच; MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT
10
"...त्यामुळे, माझ्यासोबत येणंच उत्तम!"; पंतप्रधान मोदींची तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना खास ऑफर; बघा नेमकं काय घडलं?
11
पुणे-नाशिक महामार्ग सलग दुसऱ्या दिवशी 'जाम'; लग्नसराई आणि विकेंडमुळे प्रवाशांचे प्रचंड हाल
12
"चर्चा म्हणजे शरणागती नाही!" इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला थेट इशारा; मोज्तबा खामेनीही अ‍ॅक्शन मोडमध्ये!
13
कुटुंबासाठी धोकादायक ठरू शकतात 'या' ५ लोकप्रिय कार! क्रॅश टेस्टमध्ये केवळ ० ते १ रेटिंग; तुमची कार सुरक्षित आहे का?
14
"...तर ममता बॅनर्जी यांना जेलमध्ये जावे लागेल!" बंगाल पराभवानंतर का भडकले TMC चे निलंबित नेते रिजू दत्ता? साधला थेट निशाणा
15
उर्विल पटेलची विक्रमी खेळी! अशक्यप्राय लक्ष्याचा पाठलाग करत CSK नं LSG ला स्पर्धेबाहेर काढलं
16
IPL All Time Records : कमालीचा योगायोग! विराट-रोहितनं एकाच सामन्यात केली धोनीच्या विक्रमाशी बरोबरी
17
मातृदिनाचा दिवस काळरात्र ठरला! रील बनवण्याच्या नादात काळजाचे चार तुकडे हरपले; अमरावतीत शोककळा
18
Travel : मे महिन्याच्या उन्हात मिळेल डिसेंबरसारखी थंडी! 'या' ५ ठिकाणांना भेट देऊन सुट्टी करा कूल
19
सुवेंदू अधिकारी नसते तर ५,००० कार्यकर्त्यांची हत्या झाली असती; ममतांच्या प्रवक्त्याचा खळबळजनक दावा
20
"पेट्रोल-डिझेल वाचवा... 'वर्क फ्रॉम होम' पुन्हा सुरू करा!"; असं का म्हणताहेत पंतप्रधान मोदी? सोनं खरेदी न करण्याचंही आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

आता चारचाकी वाहनांची वाहतूक रेल्वेच्या माध्यमातून होणार; भारतीय रेल्वेचा नवा उपक्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2020 16:55 IST

वस्तू / पार्सल क्षेत्रातील रेल्वेचा वाटा वाढविण्यासाठी तयार केलेल्या 'व्यवसाय विकास युनिट्स'  ने उद्योग आणि क्षेत्रनिहाय दोन्ही आवक आणि जावक साहित्याचा डेटा संकलित केला आहे. 

डोंबिवली - भारतीय रेल्वेवर नव्या संकल्पनांची सुरुवात झाली आहे, कारण उर्जेच्या गरजेसाठी स्वावलंबी होण्याचा रेल्वे प्रयत्न करीत आहे, रेल्वेने २०३० पर्यंत 'शून्य' कार्बन उत्सर्जनाचे  मोठ्या प्रमाणातील  परिवहन नेटवर्क साध्य करण्यासाठी निर्णायक पावले उचलली आहेत. या अभियानाचा एक भाग म्हणून, मध्य रेल्वेच्या समन्वयामुळे मेसर्स महिंद्रा अँड महिंद्रासारख्या ऑटोमोबाईल कंपन्यांनी भारतातील काही भागांत पाठविण्यासाठी कार रेल्वेने पाठविणे सुरू केले आहे. त्याद्वारे मौल्यवान इंधनाची बचत होते आणि कार्बन फूटप्रिंट मिळविता  येते.

वस्तू / पार्सल क्षेत्रातील रेल्वेचा वाटा वाढविण्यासाठी तयार केलेल्या 'व्यवसाय विकास युनिट्स'  ने उद्योग आणि क्षेत्रनिहाय दोन्ही आवक आणि जावक साहित्याचा डेटा संकलित केला आहे.  मेसर्स महिंद्रा आणि महिंद्रा यांच्याशी समोरासमोर झालेल्या एकत्रित बैठकीमुळे वाहने जास्त प्रमाणात लोड झाली.  त्यांची वाहने पोचविण्यासाठी प्रथम पासून शेवटपर्यंत कनेक्टिव्हिटी देखील आहे.  या माध्यमामुळे आपल्या प्लांटमध्ये तयार झालेल्या नवीन वाहनांना देशातील विविध शहरांमधील डिलर्सकडे नेण्यासाठी लागणारा  वेळ कमी होतो.

विशिष्ट  रॅकमधून वाहने पाठवली जातात.  अशा एका रेकमध्ये ११८ वाहने नेऊ शकतात तर  नवीन उच्च क्षमता असलेली बीसीएसीबीएम रेल्वे वाघिणीची  रेक अंदाजे ३०० वाहने वाहून नेऊ शकते.  सध्या, रेल्वे ऑटोमोबाईल वाहतुकीसाठी न्यू मॉडिफाइड गुड्स (एनएमजी) रॅक आणि खाजगी मालकीचे बीसीएसीबीएम रॅकचा वापर करते.  वाहूकीची वेळ कमी करण्यासाठी या रॅक्सच्या वाहतुकी वर बारीक नजर ठेवली जात आहे आणि त्यानंतर पुढील लोडिंगसाठी हे रॅक्स उपलब्ध करून दिल्याने ग्राहकांचे समाधान होत आहे. 

महाराष्ट्र हे एक मोठे ऑटोमोबाईल वाहन केंद्र आहे, जिथे महिंद्र, टाटा, फोर्ड, पियाजिओ, बजाज इत्यादी कंपन्या मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर आणि औरंगाबाद भागात वाहने तयार करतात.  महाराष्ट्रात उत्पादित वाहने (ऑटोमोबाईल) देशाच्या विविध भागात नेण्याची बरीच क्षमता आहे. मेसर्स टाटा मोटर्स व इतर वाहन कंपन्यांसमवेत 'व्यवसाय विकास युनिट्स'च्या  बैठका घेतल्या गेल्या आहेत आणि वाहतुकीसाठी स्पर्धा वाढण्याची शक्यता आहे.  मेसर्स मारुतीनेही या आर्थिक वर्षात फ्रेट ट्रेनचा वापर करून देशभरातून १.७८ लाख मोटारींची वाहतूक ५ लोडिंग टर्मिनल्सवरून नागपूर व मुंबईसह १३ गंतव्य टर्मिनलवर केली आहे.

 जुलै २०२० मध्ये मध्य रेल्वेने १८ रेकद्वारे  मोटारींची  वाहतूक केली आहे, तेही कमी खर्चाने. त्याचप्रमाणे मध्य रेल्वेने  दौंडहून प्रथमच मोलॅसेस अल्कोहोल कचर्‍यापासून निर्मित अ‍ॅग्रो बेस्ड खताची (पोटाश) वाहतूक केली आहे.  नागपूर विभागातील बैतूल व मुलताई स्थानकांवरून नव्याने  गव्हाची  वाहतूक, खंडवा व पारस येथून मका;  भुसावळ विभागातील चाळीसगाव येथून भुसा  वाहतूक सुरू झाला आहे.  मध्य रेल्वेचे इतर लक्ष्यित वस्तू फ्लाय- अ‍ॅश, कापूस इत्यादी आहेत. बांगलादेशला  निर्यातीसह कांदा लोडिंगमध्येही बरीच वाढ झाली आहे.  कार्बन फूटप्रिंट वाचविण्यात सहभागी होण्यासाठी  ग्राहकांनी मध्य रेल्वेशी  हातमिळवणी करण्याचे रेल्वेने आवाहन केले असल्याचे जनसंपर्क अधिकारी डॉ ए के सिंग यांनी सांगितले.

टॅग्स :railwayरेल्वे