शहरं
Join us  
Trending Stories
1
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
2
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
3
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
4
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
5
काँग्रेसचा 'हात' सोडला, आता 'धनुष्यबाण' उचलणार; निरुपमांच्या शिवसेना प्रवेशाचा मुहूर्त ठरला!
6
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
7
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
8
“TMCला मतदान करण्यापेक्षा BJPला मत देणे चांगले”; काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरींचे विधान
9
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
10
Kirit Somaiya: "याला मी आयुष्यात कधीच..."; यामिनी जाधव, रवींद्र वायकरांच्या उमेदवारीवरील प्रश्नावर किरीट सोमय्या गरजले!
11
BANW vs INDW: मालिका एकतर्फी जिंकण्याची टीम इंडियाला सुवर्णसंधी; बांगलादेशात भारताचा दबदबा
12
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम
13
पाकिस्तानला करायचीय भारताची बरोबरी, या दिवशी लॉन्च करणार 'चंद्रयान'! असं असेल संपूर्ण मिशन
14
मुंबई लोकलमधून पडून आणखी एका तरुणाचा बळी; सात दिवसात तिघांचा मृत्यू
15
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
16
मराठमोळ्या अभिनेत्रीचा तुतारीला पाठिंबा, शरद पवारांसोबत स्टेजवर येत केला प्रचार
17
बाळासाहेब रागावले तर माँसाहेब जवळ करायच्या, याउलट उद्धव ठाकरेंकडे...; शिंदेचे शिलेदार थेटच बोलले
18
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
19
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
20
“मोदींना सहन होत नाही, महाराष्ट्रात येऊन माझ्यावर, उद्धव ठाकरेंवर बोलतात”: शरद पवार

आता चारचाकी वाहनांची वाहतूक रेल्वेच्या माध्यमातून होणार; भारतीय रेल्वेचा नवा उपक्रम

By ऑनलाइन लोकमत | Published: August 03, 2020 4:55 PM

वस्तू / पार्सल क्षेत्रातील रेल्वेचा वाटा वाढविण्यासाठी तयार केलेल्या 'व्यवसाय विकास युनिट्स'  ने उद्योग आणि क्षेत्रनिहाय दोन्ही आवक आणि जावक साहित्याचा डेटा संकलित केला आहे. 

डोंबिवली - भारतीय रेल्वेवर नव्या संकल्पनांची सुरुवात झाली आहे, कारण उर्जेच्या गरजेसाठी स्वावलंबी होण्याचा रेल्वे प्रयत्न करीत आहे, रेल्वेने २०३० पर्यंत 'शून्य' कार्बन उत्सर्जनाचे  मोठ्या प्रमाणातील  परिवहन नेटवर्क साध्य करण्यासाठी निर्णायक पावले उचलली आहेत. या अभियानाचा एक भाग म्हणून, मध्य रेल्वेच्या समन्वयामुळे मेसर्स महिंद्रा अँड महिंद्रासारख्या ऑटोमोबाईल कंपन्यांनी भारतातील काही भागांत पाठविण्यासाठी कार रेल्वेने पाठविणे सुरू केले आहे. त्याद्वारे मौल्यवान इंधनाची बचत होते आणि कार्बन फूटप्रिंट मिळविता  येते.

वस्तू / पार्सल क्षेत्रातील रेल्वेचा वाटा वाढविण्यासाठी तयार केलेल्या 'व्यवसाय विकास युनिट्स'  ने उद्योग आणि क्षेत्रनिहाय दोन्ही आवक आणि जावक साहित्याचा डेटा संकलित केला आहे.  मेसर्स महिंद्रा आणि महिंद्रा यांच्याशी समोरासमोर झालेल्या एकत्रित बैठकीमुळे वाहने जास्त प्रमाणात लोड झाली.  त्यांची वाहने पोचविण्यासाठी प्रथम पासून शेवटपर्यंत कनेक्टिव्हिटी देखील आहे.  या माध्यमामुळे आपल्या प्लांटमध्ये तयार झालेल्या नवीन वाहनांना देशातील विविध शहरांमधील डिलर्सकडे नेण्यासाठी लागणारा  वेळ कमी होतो.

विशिष्ट  रॅकमधून वाहने पाठवली जातात.  अशा एका रेकमध्ये ११८ वाहने नेऊ शकतात तर  नवीन उच्च क्षमता असलेली बीसीएसीबीएम रेल्वे वाघिणीची  रेक अंदाजे ३०० वाहने वाहून नेऊ शकते.  सध्या, रेल्वे ऑटोमोबाईल वाहतुकीसाठी न्यू मॉडिफाइड गुड्स (एनएमजी) रॅक आणि खाजगी मालकीचे बीसीएसीबीएम रॅकचा वापर करते.  वाहूकीची वेळ कमी करण्यासाठी या रॅक्सच्या वाहतुकी वर बारीक नजर ठेवली जात आहे आणि त्यानंतर पुढील लोडिंगसाठी हे रॅक्स उपलब्ध करून दिल्याने ग्राहकांचे समाधान होत आहे. 

महाराष्ट्र हे एक मोठे ऑटोमोबाईल वाहन केंद्र आहे, जिथे महिंद्र, टाटा, फोर्ड, पियाजिओ, बजाज इत्यादी कंपन्या मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर आणि औरंगाबाद भागात वाहने तयार करतात.  महाराष्ट्रात उत्पादित वाहने (ऑटोमोबाईल) देशाच्या विविध भागात नेण्याची बरीच क्षमता आहे. मेसर्स टाटा मोटर्स व इतर वाहन कंपन्यांसमवेत 'व्यवसाय विकास युनिट्स'च्या  बैठका घेतल्या गेल्या आहेत आणि वाहतुकीसाठी स्पर्धा वाढण्याची शक्यता आहे.  मेसर्स मारुतीनेही या आर्थिक वर्षात फ्रेट ट्रेनचा वापर करून देशभरातून १.७८ लाख मोटारींची वाहतूक ५ लोडिंग टर्मिनल्सवरून नागपूर व मुंबईसह १३ गंतव्य टर्मिनलवर केली आहे.

 जुलै २०२० मध्ये मध्य रेल्वेने १८ रेकद्वारे  मोटारींची  वाहतूक केली आहे, तेही कमी खर्चाने. त्याचप्रमाणे मध्य रेल्वेने  दौंडहून प्रथमच मोलॅसेस अल्कोहोल कचर्‍यापासून निर्मित अ‍ॅग्रो बेस्ड खताची (पोटाश) वाहतूक केली आहे.  नागपूर विभागातील बैतूल व मुलताई स्थानकांवरून नव्याने  गव्हाची  वाहतूक, खंडवा व पारस येथून मका;  भुसावळ विभागातील चाळीसगाव येथून भुसा  वाहतूक सुरू झाला आहे.  मध्य रेल्वेचे इतर लक्ष्यित वस्तू फ्लाय- अ‍ॅश, कापूस इत्यादी आहेत. बांगलादेशला  निर्यातीसह कांदा लोडिंगमध्येही बरीच वाढ झाली आहे.  कार्बन फूटप्रिंट वाचविण्यात सहभागी होण्यासाठी  ग्राहकांनी मध्य रेल्वेशी  हातमिळवणी करण्याचे रेल्वेने आवाहन केले असल्याचे जनसंपर्क अधिकारी डॉ ए के सिंग यांनी सांगितले.

टॅग्स :railwayरेल्वे