शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
3
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
4
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
5
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
6
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
7
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
8
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
9
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
10
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
11
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
12
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
13
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
14
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
15
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
16
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
17
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
18
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
19
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
20
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली

ठाणे, पालघरमध्ये चार बळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2019 03:52 IST

मुसळधार पाऊस जीवावर बेतला

भिवंडी / मीरा रोड : भिवंडीत पुराच्या पाण्यात टेम्पोचालक व कामगार असे दोघे जण वाहून गेल्याच्या दोन वेगवेगळ्या घटना रविवारी दुपारी घडल्या. याशिवाय, मीरा रोड येथे एका अनोळखी वृद्धाचा मृतदेह नाल्यात सापडला. तर वसईत एक चौदा वर्षांचा मुलगा वाहून गेला.भिवंडीतील धापसीपाड्यातील ३0 वर्षीय मोहम्मद सलाम शेख हा टेम्पोचालक भिवंडीतील वडपे बायपास येथील गोदामातून माल भरून त्याची डिलिव्हरी देण्यासाठी वसई येथे जात होता. तो पारोळफाटा येथील पेट्रोलपंपालगतच्या रोडवरील मोरीवर असताना, तुंगारेश्वर डोंगराच्या नाल्याचा प्रवाह मोरीवरून वाहू लागल्याने त्या प्रवाहात मो. सलाम हा ओढला गेला. त्याचा पाय टेम्पोत अडकल्याने नाकातोंडात पाणी गेल्याने त्याचा गुदमरून मृत्यू झाला.दुसरी घटना सरवली एमआयडीसी रोडवरील गोविंदनगर येथे घडली. पुराचे पाणी रस्त्यावरून वाहत असताना घर गाठण्यासाठी तीन कामगार पाण्यातून रस्ता काढत होते. त्यातील एक जण वाहून गेला. त्याचा शोध भिवंडी तालुका महसूल व कोनगाव पोलीस घेत आहेत.तिसरी घटना मीरा रोड येथे घडली. येथील काशिमीरा भागातील नाल्यात एका वृद्धाचा मृतदेह रविवारी सापडला. नाल्यातून या व्यक्तीचा मृतदेह काढण्यात आला. त्याची ओळख पटलेली नाही. तर चौथ्या घटनेत पालघर जिल्ह्यातील वसईत पावन प्रजापती (१४) हा मुलगा पुराच्या पाण्यात वाहून गेला.

टॅग्स :Rainपाऊस