शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

राष्ट्रवादीच्या चार नेत्यांची, चार दिशेला तोंडे

By नारायण जाधव | Updated: September 5, 2022 11:03 IST

गेल्या काही वर्षांत थातूरमातूर आंदोलने वगळता पक्षाचा एकही मोठा कार्यक्रम झालेला नाही. श्रेष्ठींतील अजित पवार यांची सिडकोतील शासकीय बैठक वगळता एकही मोठा नेता शहरात फिरकला नाही.

नारायण जाधव, उप-वृत्तसंपादक

ज्येष्ठ नेते गणेश नाईक यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकल्यापासून पक्षाची नवी मुंबईतील ताकद अगदीच तोळामासा झाली आहे. एकेकाळी पक्षाचे महापालिकेवर एकहाती वर्चस्व होते. मात्र, त्यात गणेश नाईक यांच्या ताकदीचा प्रभाव होता. परंतु, पाच-सहा नगरसेवक वगळता पक्षाचे सर्वच नगरसेवक नाईक यांच्यासाेबत भाजपमध्ये गेल्याने पक्षाला लागलेली घरघर आजही कायम आहे. गेल्या आठवड्यात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांनी ठाणे जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची एक महत्त्वपूर्ण बैठक माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत घेतली. तिला नवी मुंबईतील पक्षाचे सर्व नेते उपस्थित होते. परंतु, या सर्वांनी या बैठकीत पक्षाची नवी मुंबईत नेमकी ताकद काय, याची वेगवेगळी मते मांडून सावळागोंधळ असल्याचे दाखवून दिले. एवढेच नाही तर या बैठकीनंतर दोन-तीन दिवसांनी पक्षाचे जिल्हाध्यक्ष अशोक गावडे हे एकनाथ शिंदे सेनेत जाणार असल्याची पुडी कुणी तरी सोडली. यामुळे पक्षात किती बेशिस्त आहे, याचाही प्रत्यय कार्यकर्त्यांनी आणून दिला आहे. 

वास्तविक पाहता, गणेश नाईक यांच्या टीमने राष्ट्रवादी सोडल्यानंतर सुरुवातीला जितेंद्र आव्हाड यांनी माथाडी कामगारांची मोठी व्होट बँक असलेल्या नवी मुंबईत ताकद वाढविण्यासाठी मेहनत घेतली. कार्यकर्त्यांना नैतिक बळ दिले होते. त्यांच्यासोबत माथाडी नेते शशिकांत शिंदे आणि उरणहून नवी मुंबईत ‘बार, बार’ येणारे प्रशांत पाटील यांना निरीक्षक नेमले. नंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत दिलीप वळसे-पाटील समर्थक अशोक गावडे यांना विधानसभेसाठी उभे केले. त्यांचा पराभव झाला असला तरी त्यांनी बऱ्यापैकी मते घेतली होती. यामुळेच नंतर त्यांच्यावरच नवी मुंबई जिल्हा अध्यक्षपदाची धुरा सोपविली. मात्र, श्रेष्ठींनी यानंतर पक्षबांधणीकडे पाहिजे तसे लक्ष दिल्याचे कधीच दिसले नाही. पक्षाचा नेमका प्रदेशाध्यक्ष कोण, असा प्रश्नही तळागाळातील कार्यकर्ते एकमेकांना विचारताना दिसतात. 

एवढेच नाही तर राज्यात महाविकास आघाडीचा प्रयोग झाल्यानंतर श्रेष्ठी स्थानिक नेत्यांना बळ देतील, अशी आशा होती. परंतु, ती आतापर्यंत फोल ठरली आहे. मधल्या काळात नेरूळमधील शिवसेनेचे नामदेव भगत यांच्यासारख्या जुन्या नेत्यांनी पार्थ पवार यांच्या माध्यमातून अजित पवार यांच्याशी जवळीक साधून राष्ट्रवादीत प्रवेश केला. मात्र, श्रेष्ठींनी त्यांचा भ्रमनिरास केला. 

शशिकांत शिंदे हे पक्षाचे नेते असले तरी त्यांचे मन जास्तीत जास्त आपल्या मूळ सातारा जिल्ह्यातील मतदारसंघात रमते. उरणचे असलेले प्रशांत पाटील हे नवी मुंबईत अधूनमधून येत असले तरी त्यांचा जास्त वेळ सोशल मीडियात रमतो. दुसरे माथाडी नेते नरेंद्र पाटील यांनी पक्षांतर्गत वादाला कंटाळून केव्हाच हातात कमळ घेऊन देवेंद्र फडणवीस यांचे नाव हातावर गोंदवून घेतले. यामुळे एकेकाळी राष्ट्रवादीचे हक्काचे मतदार असलेल्या माथाडी कामगारांत उघड उघड दोन गट पडले आहेत. पक्षाचे आणखी एक नेते चंद्रकांत पाटील अर्थात सी. आर. पाटील यांची माथाडी कामगारांसह स्थानिक आगरी कोळी समाजात ऊठबस असली तरी त्यांनाही पक्षाने बळ दिलेले नाही.  

गेल्या काही वर्षांत थातूरमातूर आंदोलने वगळता पक्षाचा एकही मोठा कार्यक्रम झालेला नाही. श्रेष्ठींतील अजित पवार यांची सिडकोतील शासकीय बैठक वगळता एकही मोठा नेता शहरात फिरकला नाही. वास्तविक, मुंबईनंतर एमएमआरडीए क्षेत्रातील सर्वांत सक्षम महापालिका म्हणून नवी मुंबईकडे पाहिले जाते. आता शरद पवार यांनीच पक्षबांधणीकडे लक्ष घातल्याने काय सकारात्मक बदल होतात, याकडे लक्ष लागले आहे. 

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसNational Congress Partyनॅशनल काँग्रेस पार्टीAjit Pawarअजित पवार