शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

सदोष मनुष्यवधाच्या आरोपातून ठाण्यातील चार डॉक्टरांची निर्दोष सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2018 19:20 IST

ठाणे : प्रसुतीनंतर आजारी पडलेल्या महिलेच्या मृत्यूसाठी जबाबदार असल्याच्या आरोपातून शहरातील चार डॉक्टरांना मंगळवारी ठाणे न्यायालयाने निर्दोष मुक्त केले. जवळपास १२ वर्षे या प्रकरणाचा खटला चालला.२00३ साली ठाण्यातील पोखरण रोड क्रमांक २ च्या रहिवासी शशिकला विचारे (२५) या गरोदर होत्या. वर्तकनगरातील डॉ. जोग नर्सिंग होममध्ये त्यांच्यावर नियमित उपचार सुरू होते. ...

ठळक मुद्देठाणे न्यायालयाचा निकालमहिलेचे मृत्यू प्रकरण१२ वर्षे चालला खटला

ठाणे : प्रसुतीनंतर आजारी पडलेल्या महिलेच्या मृत्यूसाठी जबाबदार असल्याच्या आरोपातून शहरातील चार डॉक्टरांना मंगळवारी ठाणे न्यायालयाने निर्दोष मुक्त केले. जवळपास १२ वर्षे या प्रकरणाचा खटला चालला.२00३ साली ठाण्यातील पोखरण रोड क्रमांक २ च्या रहिवासी शशिकला विचारे (२५) या गरोदर होत्या. वर्तकनगरातील डॉ. जोग नर्सिंग होममध्ये त्यांच्यावर नियमित उपचार सुरू होते. ७ जुलै २00३ रोजी महिला रोग तज्ज्ञ डॉ. सुजाता राठोड त्यांच्यावर प्रसुतीसाठी शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यासाठी भूलतज्ज्ञ डॉ. वसंत जोग यांनी त्यांना भूल दिली. प्रसुतीनंतर बाळ आणि बाळंतीण दोन्ही सुखरूप होते. दोन दिवसांनी शशिकला यांना न्युमोनियाचा त्रास सुरू झाला. त्रास वाढल्याने त्यांना पोखरण रोड क्रमांक २ वरील लोक हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. या हॉस्पिटलमध्ये डॉ. आनंद भावे आणि डॉ. गणेश महाजन यांनी त्यांच्यावर उपचार केले. ३ आॅगस्ट २00३ रोजी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांचे पती शशिकांत विचारे यांनी उपचारातील हलगर्जीमुळे पत्नीचा मृत्यू झाल्याचा डॉक्टरांवर आरोप केल्यानंतर वर्तकनगर पोलिसांनी याप्रकरणी डॉ. सुजाता राठोड, डॉ. वसंत जोग, डॉ. आनंद भावे आणि डॉ. गणेश महाजन यांच्याविरूद्ध खून, फसवणूक आणि पुरावे नष्ट केल्याचे गुन्हे दाखल केले. काही दिवसांनी पोलिसांनी खुनाचे कलम रद्द करून सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वाढवला. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करून आरोपींविरूद्ध गुन्हे सिद्ध होत नसल्याचा अहवाल न्यायालयासमोर सादर केला. न्यायालयाने तो अमान्य करून आरोपपत्र दाखल करण्याचे आदेश पोलिसांना दिले. दरम्यानच्या काळात शशिकांत विचारे यांनीही न्यायालयामध्ये वैयक्तिक तक्रार दाखल केली. विचारे यांची तक्रार आणि वर्तकनगर पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यावर अतिरिक्त सत्र न्यायाधिश ए.एस. भैसारे यांच्या न्यायालयामध्ये एकत्रित सुनावणी झाली.शशिकला विचारे यांचा मृत्यू नैसर्गिक असल्याचा दावा आरोपींचे वकील शैलेष सडेकर यांनी केला. शशिकांत विचारे यांनी लोक हॉस्पिटलमध्ये पत्नीवर केलेल्या उपचाराचा खर्च आजतागायत दिला नसून, डॉक्टरांवर दबाव आणण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचा आरोप अ‍ॅड. सडेकर यांनी केला. शशिकांत विचारेंसह इतर साक्षीदारही उलटतपासणीमध्ये टिकाव धरू शकले नाही. शशिकला यांचे शवविच्छेदनच डॉक्टरांनी केले नसल्याचा युक्तिवाद सरकारी पक्षाच्या वतीने यावेळी करण्यात आला. मात्र शवविच्छेदन कोणत्या प्रकरणांमध्ये करायचे, याचे काही निकष असतात. इत:पर मृत्यूनंतर काही तास शशिकला यांचा मृतदेह शासकीय रूग्णालयामध्येच होता. त्यावेळी त्यांच्या पतीने शवविच्छेदनाची मागणीच केली नसल्याचेही बचाव पक्षाने न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. जवळपास १२ वर्षे या प्रकरणाचा खटला चालल्यानंतर मंगळवारी न्यायालयाने चारही डॉक्टरांना निर्दोष मुक्त केले.बालरोग तज्ज्ञही निदोषशशिकला विचारे यांना कन्यारत्न प्राप्त झाले होते. प्रसुतीनंतर महिनाभरात शशिकला यांचा मृत्यू झाला. त्या न्युमोनियाने ग्रस्त असताना एका बालरोग तज्ज्ञाने त्यांच्या नवजात कन्येची सुश्रुषा केली. त्यांची कन्या सुखरूप असताना विचारे यांनी बालरोग तज्ज्ञालाही या प्रकरणामध्ये आरोपी केले होते. बचाव पक्षाने यावर न्यायालयात आक्षेप नोंदवला होता. जवळपास दोन वर्षानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार या बालरोग तज्ज्ञाचे नाव खटल्यातून वगळण्यात आले होते.

टॅग्स :thaneठाणेCourtन्यायालयdoctorडॉक्टर