शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
2
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
3
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
4
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
5
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
6
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
7
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
8
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
9
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
10
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
11
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
12
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
13
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
14
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
15
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
16
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
17
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
18
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
19
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
20
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?

भाईंदरच्या धारावी किल्ल्यावर मद्यपान-धुम्रपानासह अनैतिक प्रकार होत असल्याचे गडप्रेमींकडून उघडकीस 

By धीरज परब | Updated: December 1, 2022 14:30 IST

Dharavi Fort : राज्य मानवी हक्क आयोगाने दखल घेतल्या नंतर देखील भाईंदर येथील चौक समुद्र किनारी असलेल्या धारावी किल्ल्यात मद्यपान - धुम्रपानासह अनैतिक प्रकार सुद्धा होत असल्याचा आरोप गडप्रेमींनी केला आहे .

मीरारोड - राज्य मानवी हक्क आयोगाने दखल घेतल्या नंतर देखील भाईंदर येथील चौक समुद्र किनारी असलेल्या धारावी किल्ल्यात मद्यपान - धुम्रपानासह अनैतिक प्रकार सुद्धा होत असल्याचा आरोप गडप्रेमींनी केला आहे . किल्ल्याच्या साफसफाई दरम्यान दारूच्या बाटल्या , सिगारेटची पाकिटे तसेच निरोध सुद्धा सापडल्याने संताप व्यक्त होत आहे . दरम्यान आयोगाने पोलीस आयुक्तालय , जिल्हाधिकारी याना त्यांचे म्हणणे मांडण्याचे निर्देश दिले असून महापालिकेने देखील वेळ मागितली आहे.

धारावी किल्ला हा पुरातन असून पुरातत्व विभागाच्या अखत्यारीत येतो . या ठिकाणी महापालिकेने किल्ल्याच्या काही भागात चिमाजी अप्पा यांचा पुतळा , उद्यान आदी विकसित केले आहे .  गेल्या काही वर्षां पासून शिवप्रेमी व गडप्रेमी यांनी धारावी किल्ल्याच्या स्वच्छतेची नियमितपणे मोहीम चालवली आहे . किल्ल्याच्या संवर्धन व संरक्षणाचौ मागणी सातत्याने गडप्रेमींनी चालवली आहे.

महापालिकेने किल्ला दत्तक घेण्याची तयारी दर्शवली असून निधीची तरतूद केली आहे . खासदार राजन विचारे व आमदार गीता जैन यांच्या पाठपुराव्याने शासनाने देखील किल्ल्याचा पुनर्विकास साठी निधी मंजूर केला . महापालिकेचे आयुक्त दिलीप ढोले यांनी किल्ल्याचे पावित्र्य राखले जावे म्हणून नागरिकांना आवाहन करणारे सूचना फलक सुद्धा या ठिकाणी लावून घेतले आहेत.

किल्ल्यावरील मद्यपान , धूम्रपान आदी प्रकार सातत्याने घडत असल्याची दखल नुकतीच राज्य मानवी हक्क आयोगाने स्वतःहून घेतली आहे . आयोगाने दखल घेतल्या नंतर देखील  रविवार २७ नोव्हेम्बर रोजी श्रेयश सावंत, राहुल पानपट्टे, विनोद देसाई, शुभम ढोके, निखिल पाटील आदी गडप्रेमींना किल्ल्यात साफसफाई करताना दारूच्या बाटल्या, सिगरेट- गुटखा ची रिकामी पाकिटे व थोटके तर नेहमी प्रमाणे सापडलीच पण निरोधाची पॅकिट तसेच वापरलेले निरोध सुद्धा सापडले.  धारावी सारख्या मराठ्यांच्या पराक्रमाची साक्ष देणाऱ्या किल्ल्यावर मद्यपान , धूम्रपान पासून अनैतिक प्रकार होणे संतापजनक असल्याचे गडप्रेमींनी म्हटले आहे.

पोलीस व महानगरपालिकेचे अक्षम्य दुर्लक्ष किल्ल्याचे पावित्र्य नष्ट करण्यास कारणीभूत असून या पुढे गडप्रेमींना असे गैर कृत्य करताना कोणीही आढळून आल्यास त्याला चांगलाच चोप देण्यात येईल व पुढे काही झाल्यास त्याची जबाबदारी पोलीस आणि पालिकेची असणार आहे असा इशारा श्रेयस सावंत यांनी दिला आहे .

दरम्यान बुधवार ३० नोव्हेम्बर रोजी राज्य मानवी हक्क आयोगा समोर महापालिकेने माहिती दिली असली तरी सविस्तर माहिती देण्यासाठी पालिकेने वेळ मागितली . आयोगाने या प्रकरणी मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालय व ठाणे जिल्हाधीकारी यांना सुद्धा त्यांचे म्हणणे सादर करण्याचे आदेश दिले आहेत . येत्या १३ डिसेम्बर रोजी त्यावर सुनावणी होणार आहे . 

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरbhayandarभाइंदर