शहरं
Join us  
Trending Stories
1
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
2
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
3
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
4
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
5
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
6
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
7
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
8
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
9
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
10
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
11
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
12
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
13
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
14
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
15
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
16
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
17
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!
18
१४ लाखांचं पॅकेज असलेला तरुण भररस्त्यात मॉडेलसमोर अचानक उभा राहिला, पॅन्टची चेन उघडली अन्...
19
E10 च्या वाहनांमध्ये E20 पेट्रोल वापरू नका, नाहीतर...; टोयोटाचा वाहन मालकांना इशारा...
20
अहो आश्चर्यम्...! ६५० किमी पर्यंतची रेंज असलेल्या या २ कारला जुलै महिन्यात एकही ग्राहक मिळाला नाही! जाणून घ्या किंमत

भाईंदरच्या धारावी किल्ल्यावर मद्यपान-धुम्रपानासह अनैतिक प्रकार होत असल्याचे गडप्रेमींकडून उघडकीस 

By धीरज परब | Updated: December 1, 2022 14:30 IST

Dharavi Fort : राज्य मानवी हक्क आयोगाने दखल घेतल्या नंतर देखील भाईंदर येथील चौक समुद्र किनारी असलेल्या धारावी किल्ल्यात मद्यपान - धुम्रपानासह अनैतिक प्रकार सुद्धा होत असल्याचा आरोप गडप्रेमींनी केला आहे .

मीरारोड - राज्य मानवी हक्क आयोगाने दखल घेतल्या नंतर देखील भाईंदर येथील चौक समुद्र किनारी असलेल्या धारावी किल्ल्यात मद्यपान - धुम्रपानासह अनैतिक प्रकार सुद्धा होत असल्याचा आरोप गडप्रेमींनी केला आहे . किल्ल्याच्या साफसफाई दरम्यान दारूच्या बाटल्या , सिगारेटची पाकिटे तसेच निरोध सुद्धा सापडल्याने संताप व्यक्त होत आहे . दरम्यान आयोगाने पोलीस आयुक्तालय , जिल्हाधिकारी याना त्यांचे म्हणणे मांडण्याचे निर्देश दिले असून महापालिकेने देखील वेळ मागितली आहे.

धारावी किल्ला हा पुरातन असून पुरातत्व विभागाच्या अखत्यारीत येतो . या ठिकाणी महापालिकेने किल्ल्याच्या काही भागात चिमाजी अप्पा यांचा पुतळा , उद्यान आदी विकसित केले आहे .  गेल्या काही वर्षां पासून शिवप्रेमी व गडप्रेमी यांनी धारावी किल्ल्याच्या स्वच्छतेची नियमितपणे मोहीम चालवली आहे . किल्ल्याच्या संवर्धन व संरक्षणाचौ मागणी सातत्याने गडप्रेमींनी चालवली आहे.

महापालिकेने किल्ला दत्तक घेण्याची तयारी दर्शवली असून निधीची तरतूद केली आहे . खासदार राजन विचारे व आमदार गीता जैन यांच्या पाठपुराव्याने शासनाने देखील किल्ल्याचा पुनर्विकास साठी निधी मंजूर केला . महापालिकेचे आयुक्त दिलीप ढोले यांनी किल्ल्याचे पावित्र्य राखले जावे म्हणून नागरिकांना आवाहन करणारे सूचना फलक सुद्धा या ठिकाणी लावून घेतले आहेत.

किल्ल्यावरील मद्यपान , धूम्रपान आदी प्रकार सातत्याने घडत असल्याची दखल नुकतीच राज्य मानवी हक्क आयोगाने स्वतःहून घेतली आहे . आयोगाने दखल घेतल्या नंतर देखील  रविवार २७ नोव्हेम्बर रोजी श्रेयश सावंत, राहुल पानपट्टे, विनोद देसाई, शुभम ढोके, निखिल पाटील आदी गडप्रेमींना किल्ल्यात साफसफाई करताना दारूच्या बाटल्या, सिगरेट- गुटखा ची रिकामी पाकिटे व थोटके तर नेहमी प्रमाणे सापडलीच पण निरोधाची पॅकिट तसेच वापरलेले निरोध सुद्धा सापडले.  धारावी सारख्या मराठ्यांच्या पराक्रमाची साक्ष देणाऱ्या किल्ल्यावर मद्यपान , धूम्रपान पासून अनैतिक प्रकार होणे संतापजनक असल्याचे गडप्रेमींनी म्हटले आहे.

पोलीस व महानगरपालिकेचे अक्षम्य दुर्लक्ष किल्ल्याचे पावित्र्य नष्ट करण्यास कारणीभूत असून या पुढे गडप्रेमींना असे गैर कृत्य करताना कोणीही आढळून आल्यास त्याला चांगलाच चोप देण्यात येईल व पुढे काही झाल्यास त्याची जबाबदारी पोलीस आणि पालिकेची असणार आहे असा इशारा श्रेयस सावंत यांनी दिला आहे .

दरम्यान बुधवार ३० नोव्हेम्बर रोजी राज्य मानवी हक्क आयोगा समोर महापालिकेने माहिती दिली असली तरी सविस्तर माहिती देण्यासाठी पालिकेने वेळ मागितली . आयोगाने या प्रकरणी मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालय व ठाणे जिल्हाधीकारी यांना सुद्धा त्यांचे म्हणणे सादर करण्याचे आदेश दिले आहेत . येत्या १३ डिसेम्बर रोजी त्यावर सुनावणी होणार आहे . 

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरbhayandarभाइंदर