शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात आजपासून आचारसंहिता? निवडणूक आयोग दुपारी ४ वाजता घोषणा करणार
2
'घराणेशाहीचे राजकारण लोकशाहीसाठी घातक', गांधी कुटुंबाचे नाव घेत शशी थरुरांचे मोठे वक्तव्य
3
आता सरकारी कार्यालयात खेटे घालण्याची गरज नाही; घरबसल्या मिळेल जीवन प्रमाणपत्र
4
Sandeep Deshpande : "खास अशिशुद्दीन यांच्यासाठी..."; भाजपा नेत्यांचा फोटो शेअर करत मनसेचं 'व्होट जिहाद'ला प्रत्युत्तर
5
MHADA Lottery: पुणेकरांसाठी सुवर्णसंधी! 'म्हाडा'च्या लॉटरीत वाकड-हिंजवडीत फक्त २८ लाखांत घर; ६० लाखांची थेट बचत!
6
त्रिपुरी पौर्णिमा २०२५: त्रिपुरी पौर्णिमेला 'या' राशींवर लक्ष्मीकृपा; व्यापारात लाभ; मालमत्ता खरेदीचे योग
7
रोहित आर्या प्रकरणावर अभिनेता आस्ताद काळेने व्यक्त केला संशय, पोस्ट करत म्हणाला...
8
आता त्यांचे मोजकेच दिवस उरलेत, या देशाच्या राष्ट्रपतींना ट्रम्प यांची उघड धमकी   
9
हवाई प्रवाशांसाठी मोठी बातमी; अतिरिक्त शुल्काशिवाय विमान तिकिटे रद्द करता येणार, कंपन्यांची मनमानी थांबणार!
10
Harmanpreet Kaur: "हरमनप्रीत कौरला कर्णधारपदाच्या ओझ्यातून मुक्त करा", माजी क्रिकेटपटूची मागणी चर्चेत!
11
कारच्या बंद दरवाजात गुदमरले जीव, ५ जणांचा मृत्यू; Tesla कारविरोधात खटला दाखल, काय आहे प्रकरण?
12
Ladki Bahin Yojana: मेसेजची रिंग वाजली? लाडकी बहीण योजनेचे आज पैसे येणार; eKYC न केलेल्या महिलांचे काय?
13
लाडकी बहीण योजना ज्यांनी राबविली, ते म्हणाले 'आम्ही कर्जात आहोत'; MSP वेळी हात वर केले, केंद्राला पत्र
14
"सांगा, ही मतचोरी आहे की व्होट जिहाद?"; भाजपाचा विरोधी पक्षांना खोचक सवाल, दिली आकडेवारी
15
शनी ग्रहाच्या चंद्राने केमिस्ट्रीला देखील फेल केले; तेल आणि पाणी...
16
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
17
वर्षभरापासून सेलिनाचा भाऊ दुबईच्या तुरुंगात कैद, भारत सरकारकडे मागितली मदत; प्रकरण काय?
18
हर'मन' जीत लिया! Will to Win मुळे जगज्जेतेपदाचं स्वप्न साकार, आता थांबायचं नाय...
19
५० लाखांचं पॅकेज असूनही दुःखी; कितीही कमावले तरी 'ते पुरेसे' का वाटत नाही? चार्टर्ड अकाउंटंटची पोस्ट Viral!
20
Tejashwi Yadav : "प्रत्येक महिलेला ३० हजार, शेतकऱ्यांना बोनस, मोफत वीज..."; तेजस्वी यादव यांच्या मोठ्या घोषणा

भाईंदरच्या धारावी किल्ल्यावर मद्यपान-धुम्रपानासह अनैतिक प्रकार होत असल्याचे गडप्रेमींकडून उघडकीस 

By धीरज परब | Updated: December 1, 2022 14:30 IST

Dharavi Fort : राज्य मानवी हक्क आयोगाने दखल घेतल्या नंतर देखील भाईंदर येथील चौक समुद्र किनारी असलेल्या धारावी किल्ल्यात मद्यपान - धुम्रपानासह अनैतिक प्रकार सुद्धा होत असल्याचा आरोप गडप्रेमींनी केला आहे .

मीरारोड - राज्य मानवी हक्क आयोगाने दखल घेतल्या नंतर देखील भाईंदर येथील चौक समुद्र किनारी असलेल्या धारावी किल्ल्यात मद्यपान - धुम्रपानासह अनैतिक प्रकार सुद्धा होत असल्याचा आरोप गडप्रेमींनी केला आहे . किल्ल्याच्या साफसफाई दरम्यान दारूच्या बाटल्या , सिगारेटची पाकिटे तसेच निरोध सुद्धा सापडल्याने संताप व्यक्त होत आहे . दरम्यान आयोगाने पोलीस आयुक्तालय , जिल्हाधिकारी याना त्यांचे म्हणणे मांडण्याचे निर्देश दिले असून महापालिकेने देखील वेळ मागितली आहे.

धारावी किल्ला हा पुरातन असून पुरातत्व विभागाच्या अखत्यारीत येतो . या ठिकाणी महापालिकेने किल्ल्याच्या काही भागात चिमाजी अप्पा यांचा पुतळा , उद्यान आदी विकसित केले आहे .  गेल्या काही वर्षां पासून शिवप्रेमी व गडप्रेमी यांनी धारावी किल्ल्याच्या स्वच्छतेची नियमितपणे मोहीम चालवली आहे . किल्ल्याच्या संवर्धन व संरक्षणाचौ मागणी सातत्याने गडप्रेमींनी चालवली आहे.

महापालिकेने किल्ला दत्तक घेण्याची तयारी दर्शवली असून निधीची तरतूद केली आहे . खासदार राजन विचारे व आमदार गीता जैन यांच्या पाठपुराव्याने शासनाने देखील किल्ल्याचा पुनर्विकास साठी निधी मंजूर केला . महापालिकेचे आयुक्त दिलीप ढोले यांनी किल्ल्याचे पावित्र्य राखले जावे म्हणून नागरिकांना आवाहन करणारे सूचना फलक सुद्धा या ठिकाणी लावून घेतले आहेत.

किल्ल्यावरील मद्यपान , धूम्रपान आदी प्रकार सातत्याने घडत असल्याची दखल नुकतीच राज्य मानवी हक्क आयोगाने स्वतःहून घेतली आहे . आयोगाने दखल घेतल्या नंतर देखील  रविवार २७ नोव्हेम्बर रोजी श्रेयश सावंत, राहुल पानपट्टे, विनोद देसाई, शुभम ढोके, निखिल पाटील आदी गडप्रेमींना किल्ल्यात साफसफाई करताना दारूच्या बाटल्या, सिगरेट- गुटखा ची रिकामी पाकिटे व थोटके तर नेहमी प्रमाणे सापडलीच पण निरोधाची पॅकिट तसेच वापरलेले निरोध सुद्धा सापडले.  धारावी सारख्या मराठ्यांच्या पराक्रमाची साक्ष देणाऱ्या किल्ल्यावर मद्यपान , धूम्रपान पासून अनैतिक प्रकार होणे संतापजनक असल्याचे गडप्रेमींनी म्हटले आहे.

पोलीस व महानगरपालिकेचे अक्षम्य दुर्लक्ष किल्ल्याचे पावित्र्य नष्ट करण्यास कारणीभूत असून या पुढे गडप्रेमींना असे गैर कृत्य करताना कोणीही आढळून आल्यास त्याला चांगलाच चोप देण्यात येईल व पुढे काही झाल्यास त्याची जबाबदारी पोलीस आणि पालिकेची असणार आहे असा इशारा श्रेयस सावंत यांनी दिला आहे .

दरम्यान बुधवार ३० नोव्हेम्बर रोजी राज्य मानवी हक्क आयोगा समोर महापालिकेने माहिती दिली असली तरी सविस्तर माहिती देण्यासाठी पालिकेने वेळ मागितली . आयोगाने या प्रकरणी मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालय व ठाणे जिल्हाधीकारी यांना सुद्धा त्यांचे म्हणणे सादर करण्याचे आदेश दिले आहेत . येत्या १३ डिसेम्बर रोजी त्यावर सुनावणी होणार आहे . 

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरbhayandarभाइंदर