शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

पाणी कपात रद्द करण्यासह माजी खा. नाईक यांनी आयुक्तांकडे केल्या विविध मागण्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2018 15:03 IST

पाणी कपात रद्द करा, भुयारी मार्गाचे काम पुर्ण करा, उत्तन वासियांची कचऱ्यातून सुटका करा आदी विविध मागण्यांवर माजी खासदार संजीव नाईक यांनी महापालिका आयुक्त बळीराम पवार यांना भेटुन चर्चा केली.

मीरारोड - पाणी कपात रद्द करा, भुयारी मार्गाचे काम पुर्ण करा, उत्तन वासियांची कचऱ्यातून सुटका करा आदी विविध मागण्यांवर माजी खासदार संजीव नाईक यांनी महापालिका आयुक्त बळीराम पवार यांना भेटुन चर्चा केली. या वेळी पक्षाच्या वतीने ११ मागण्यांचे निवेदन दिले.बुधवारी मीरा भार्इंदर महापालिकेत आयुक्त दालनात माजी खासदार नाईक यांनी पक्षाचे माजी नगरसेवक प्रकाश दुबोले, पोर्णिमा काटकर, नरेंद्र भाटिया, संतोष गोळे, साजिद पटेल, शिल्पा सावंत, रमेश गायकवाड, भिलारे, साळुंके आदि पदाधिकारी - कार्यकर्ते सोबत आयुक्त पवार यांच्या सोबत चर्चा केली. या वेळी दुबोले यांनी केलेल्या ११ मागण्यांचे निवेदन नाईक यांनी आयुक्तांना दिले.शहरात पाणी कपात सुरु झाल्याने पाणी पुरवठा ३६ तासांच्या वर पोहचला असुन या आधी आम्ही प्रत्येकवेळी मीरा भार्इंदरला पाणी कपातीतुन वगळत नागरकिांना दिलासा दिला होता. पाणी कपात रद्द करा असे नाईक म्हणाले.भुमिगत गटार योजनेच्या कामाचा खर्च ५०० कोटींच्या वर गेला असताना काम रखडले आहे. त्यामुळे ठेकेदारावर कारवाई करा. उत्तन व परिसरातील रहिवाशी कचरा डंपींग मुळे त्रस्त असुन त्यांना दिलासा द्या. शहरात फेरीवाले व अनधिकृत बांधकामे वाढत असताना त्यावर नियंत्रण न ठेवणारया अधिकारयांवर कारवाई करा. टिडीआर घोटाळे, विकास आराखडा, पालिके कडुन केली जाणारी अनावश्यक व निकृष्ट दर्जाची बांधकामे , रखडलेले रस्ते, परिवहन सेवेची दुरावस्था आदी अनेक मुद्यांवर नाईक यांनी आयुक्तां कडे कारवाईची मागणी केली.मुख्यमंत्र्यांसह अनेक मंत्री गेल्या दोन वर्षात शहरात सतत येत असुन विविध भुमपुजनं, उद्घाटनं करत आहेत. पण या कार्यक्रमांसाठी होणारा लाखो रुपयांचा खर्चाची कुठुन केला ? असा सावाल करत चौकशी करुन कारवाई करा असं निवेदनात म्हटलं आहे.आयुक्तांनी या वेळी पाणी कपात रद्द करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. उत्तन कचरा प्रकल्प सुरु करुन दुर्गंधी येणार नाही याची खबरदारी घेऊ तसेच निवेदनातील मागण्यांवर आवश्यक कार्यवाही करण्याचं आश्वासन आयुक्तांनी दिलं . काशिमीरा नाका येथील शिवाजी महाराजांचा पुतळा उंच करणं किंवा उड्डाण पुला पेक्षा उंच नविन पुतळा बसवण्यावर समिती विचार करत असल्याचे आयुक्तांनी सांगीतले. 

टॅग्स :Mira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुक