शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
2
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
3
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
4
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
5
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
6
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
7
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
8
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
9
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
10
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
11
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
12
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
13
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
14
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
15
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
16
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
17
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
18
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
19
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस

पाणी कपात रद्द करण्यासह माजी खा. नाईक यांनी आयुक्तांकडे केल्या विविध मागण्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2018 15:03 IST

पाणी कपात रद्द करा, भुयारी मार्गाचे काम पुर्ण करा, उत्तन वासियांची कचऱ्यातून सुटका करा आदी विविध मागण्यांवर माजी खासदार संजीव नाईक यांनी महापालिका आयुक्त बळीराम पवार यांना भेटुन चर्चा केली.

मीरारोड - पाणी कपात रद्द करा, भुयारी मार्गाचे काम पुर्ण करा, उत्तन वासियांची कचऱ्यातून सुटका करा आदी विविध मागण्यांवर माजी खासदार संजीव नाईक यांनी महापालिका आयुक्त बळीराम पवार यांना भेटुन चर्चा केली. या वेळी पक्षाच्या वतीने ११ मागण्यांचे निवेदन दिले.बुधवारी मीरा भार्इंदर महापालिकेत आयुक्त दालनात माजी खासदार नाईक यांनी पक्षाचे माजी नगरसेवक प्रकाश दुबोले, पोर्णिमा काटकर, नरेंद्र भाटिया, संतोष गोळे, साजिद पटेल, शिल्पा सावंत, रमेश गायकवाड, भिलारे, साळुंके आदि पदाधिकारी - कार्यकर्ते सोबत आयुक्त पवार यांच्या सोबत चर्चा केली. या वेळी दुबोले यांनी केलेल्या ११ मागण्यांचे निवेदन नाईक यांनी आयुक्तांना दिले.शहरात पाणी कपात सुरु झाल्याने पाणी पुरवठा ३६ तासांच्या वर पोहचला असुन या आधी आम्ही प्रत्येकवेळी मीरा भार्इंदरला पाणी कपातीतुन वगळत नागरकिांना दिलासा दिला होता. पाणी कपात रद्द करा असे नाईक म्हणाले.भुमिगत गटार योजनेच्या कामाचा खर्च ५०० कोटींच्या वर गेला असताना काम रखडले आहे. त्यामुळे ठेकेदारावर कारवाई करा. उत्तन व परिसरातील रहिवाशी कचरा डंपींग मुळे त्रस्त असुन त्यांना दिलासा द्या. शहरात फेरीवाले व अनधिकृत बांधकामे वाढत असताना त्यावर नियंत्रण न ठेवणारया अधिकारयांवर कारवाई करा. टिडीआर घोटाळे, विकास आराखडा, पालिके कडुन केली जाणारी अनावश्यक व निकृष्ट दर्जाची बांधकामे , रखडलेले रस्ते, परिवहन सेवेची दुरावस्था आदी अनेक मुद्यांवर नाईक यांनी आयुक्तां कडे कारवाईची मागणी केली.मुख्यमंत्र्यांसह अनेक मंत्री गेल्या दोन वर्षात शहरात सतत येत असुन विविध भुमपुजनं, उद्घाटनं करत आहेत. पण या कार्यक्रमांसाठी होणारा लाखो रुपयांचा खर्चाची कुठुन केला ? असा सावाल करत चौकशी करुन कारवाई करा असं निवेदनात म्हटलं आहे.आयुक्तांनी या वेळी पाणी कपात रद्द करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. उत्तन कचरा प्रकल्प सुरु करुन दुर्गंधी येणार नाही याची खबरदारी घेऊ तसेच निवेदनातील मागण्यांवर आवश्यक कार्यवाही करण्याचं आश्वासन आयुक्तांनी दिलं . काशिमीरा नाका येथील शिवाजी महाराजांचा पुतळा उंच करणं किंवा उड्डाण पुला पेक्षा उंच नविन पुतळा बसवण्यावर समिती विचार करत असल्याचे आयुक्तांनी सांगीतले. 

टॅग्स :Mira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुक