शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
2
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
3
'काँग्रेसचा अजेंडा; पण तुम्ही ना कलम 370, ना CAA...', पीएम मोदींचे काँग्रेसला ओपन चॅलेंज
4
"...तर काँग्रेसनं सांगावं, 'याचा' अर्थ काय?" मनमोहन सिंगांच्या वक्तव्यावरून अमित शाह यांचा हल्लाबोल
5
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
6
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
7
India's T20 World Cup Squad Press Conference - शिवम दुबेची निवड का केली? रोहित शर्माने कारण सांगितलं, पण प्लेइंग इलेव्हनबाबत मोठं विधान 
8
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
9
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
10
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
11
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
12
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
13
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
14
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
15
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
16
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
17
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
18
चेन्नईतील श्रीदेवीचं आलिशान घर! जिथे जान्हवीचं गेलं बालपण, आता राहता येणार रेन्टवर
19
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
20
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश

डोंगराच्या तीव्र उतारावरील तब्बल १२०० घरांवर वनविभाग फिरवणार बुल्डोझर! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 6:20 PM

Thane : वनविभागाने केलेल्या सव्र्हेत अतिक्रमणांची यादी आता पुढे आली आहे. त्यानुसार आता कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करुन ही कारवाई केली जाणार असल्याचे वनविभागाने स्पष्ट केले.

ठाणे : घोलाई नगर भागात दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू झाल्यानंतर आता घोलाई नगरसह पारसिक, इंदिरानगर, आतकोनेश्वर नगर, भास्करनगर, पौंडपाडा, कारगिल खोंडा आदींसह इतर भागातील डोंगराच्या अतितीव्र उतारावर असलेल्या तब्बल १२०० अतिक्रमणांवर आता वनविभाग बुल्डोजर फिरविणार असल्याची माहिती समोर आली आहे. वनविभागाने केलेल्या सव्र्हेत अतिक्रमणांची यादी आता पुढे आली आहे. त्यानुसार आता कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करुन ही कारवाई केली जाणार असल्याचे वनविभागाने स्पष्ट केले.

कळव्यातील घोलाईनगर भागात १९ जुलै रोजी झालेल्या पावसात दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील पाच जणांचा बळी गेला होता. त्यानंतर डोंगरावरील बांधकामांची समस्या पुढे आली. या घटनेनंतर वनविभागावर टिका झाल्यानंतर त्यांनी मागील काही दिवसापासून डोगंरावरील तीव्र उतारांच्या अतिक्रमणांचा सव्र्हे सुरु केला होता. त्यानंतर आता त्याचा अहवाल समोर आला आहे. या अहवालानुसार डोंगराच्या तीव्र उतारावर तब्बल १२०० अतिक्रमण असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

यामध्ये आतकोनेश्वरनगर, भास्करनगर, इंदिरानगर, घोलाई नगर, पौंडपाडा, वाघोबा नगर आणि कारगिल खोंड या भागात हा सर्व्हे करण्यात आला होता. त्यानुसार आता जो अहवाल प्राप्त झाला आहे. या अहवालानुसार आता याठिकाणाच्या अतिक्रमणाना घरपट्टी केव्हा लावली गेली, पाणी केव्हा दिले गेले, वीज केव्हा दिली गेली याची माहिती आता वनविभागाकडून गोळा केली जात आहे. त्यातील किती अतिक्रमणो जुनी आणि नवीन आहेत, याचाही अभ्यास केला जाणार आहे. त्याच अनुषंगाने महापालिका आणि महावितरणला पत्रव्यवहार करण्यात आला असल्याचेही वनविभागाने स्पष्ट केले आहे.

वनविभागाच्या माध्यमातून आता या डोंगरावरील तीव्र उतारावरील अतिक्रमणांवर कारवाई करतांना कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. त्यानुसार येथील बांधकामधारकांकडून देखील सोमवार पासून माहिती मागविली जाणार असल्याचे वनविभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

अतिक्रमण हटवून संरक्षक भिंत बांधणारवनविभागाच्या माध्यमातून तीव्र उतारावील १२०० बांधकामे येत्या ऑगस्ट महिन्यात हटविणार आहे. यासाठी पोलीस बंदोबस्त घेऊन कारवाई केली जाणार आहे. त्यानंतर अशा घटना टाळण्यासाठी किंबहुना अतिक्रमणांना आळा घालण्यासाठी या भागात ८ कोटींचा निधी खर्च करुन संरक्षक भिंत बांधली जाणार असल्याचे वनविभागाने स्पष्ट केले आहे.

मागील काही दिवसापासून आमच्या विभागाकडून डोंगराच्या तीव्र उतारावरील अतिक्रमणांचा सव्र्हे सुरु होता. त्यानंतर त्याचा अहवाल तयार झाला असून याठिकाणची १२०० अतिक्रमण आता हटविली जाणार आहे. त्यानंतर येथे संरक्षक भिंत उभारली जाणार आहे.(नरेंद्र मुठे - वनक्षेत्र अधिकारी, ठाणे)

टॅग्स :thaneठाणे